शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

मराठवाड्याला यंदा पाणी नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 00:47 IST

नाशिक : यंदा पाऊस चांगला झाला असल्याने जिल्ह्यातील शेती, पिण्याचे पाणी आणि इतर कामांसाठी पाण्याची कमतरता भासणार नाही. जायकवाडी धरणही भरले आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून दरवर्षीप्रमाणे मराठवाड्याला देण्यात येणारे पाणी यंदा वाचणार असून, जिल्ह्यातील धरणाचे पाणी जिल्ह्यातच वापरण्यासाठी अधिकाऱ्यांनी आकस्मिक पाण्याचेही नियोजन करावे अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केल्या आहेत.

ठळक मुद्देछगन भुजबळ : जिल्ह्यातील धरणांचे पाणी आरक्षण जाहीर

नाशिक : यंदा पाऊस चांगला झाला असल्याने जिल्ह्यातील शेती, पिण्याचे पाणी आणि इतर कामांसाठी पाण्याची कमतरता भासणार नाही. जायकवाडी धरणही भरले आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून दरवर्षीप्रमाणे मराठवाड्याला देण्यात येणारे पाणी यंदा वाचणार असून, जिल्ह्यातील धरणाचे पाणी जिल्ह्यातच वापरण्यासाठी अधिकाऱ्यांनी आकस्मिक पाण्याचेही नियोजन करावे अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केल्या आहेत.जिल्ह्यातील धरणाचे उपलब्ध पाण्याचे सिंचन, पिण्याचे तसेच औद्योगिक वापरण्यासाठी आरक्षण करण्यासाठी शनिवारी ( दि.१०) भुजबळ यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. त्यावेळी भुजबळ पुढे म्हणाले, जिल्ह्यातील धरणाचे दारणा, चणकापूर, गंगापूर आणि पालखेड समूह असे चार विभाग केले जातात. यामध्ये मोठे प्रकल्प एकूण १५, मध्यम प्रकल्प ९, लघु प्रकल्प ७७ तर कोल्हापुर पध्दतीचे १२ बंधारे आहेत. जिल्ह्यासाठी ७५ हजार ८६६ द.ल.घ.फू पाणीसाठ्याची आवश्यकता आहे. सध्या ७२ हजार ५८१ द.ल.घ.फू पाणीसाठा असून गेल्यावर्षी पेक्षा ४.३८ टक्के इतका पाणीसाठी कमी आहे. तसेच आरक्षित पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने व तालुकास्तरावरुन गटविकास अधिकारी यांनी आकस्मिक मागणी लवकरात लवकर कळवावी, अशी सूचनाही त्यांनी केली. महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतीकडून येणारी पाण्याची मागणी नोंदविण्यात यावी. तसेच आलेल्या मागणीनुसार पिण्याचे पाण्याचे आरक्षण करण्यात यावे. कुठेही पाण्याची कमतरता भासता कामा नये, यासाठी पाणी आरक्षणाचे नियोजन योग्यप्रकारे करावे असे आवाहनही त्यांनी केले. बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अधिक्षक अभियंता अलका अहिरराव, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, कार्यकारी अभियंता (पालखेड) राजेश गोवर्धने, मालेगांव कार्यकारी अभियंता एम.एस.चौधरी उपस्थित होते.मनपाला ५,५०० दलघफू पाणीमहापालिकेला साडेपाच हजार दसलक्ष घनफुट पाणी आरक्षित करण्यात आले आहे. त्यात गंगापूर ३ हजार ८०० द.ल.घ.फू, दारणा ४०० द.ल.घ.फू., मुकणे १ हजार ३०० द.ल.घ.फू. असे एकूण ५ हजार ५०० द.ल.घ.फू. इतके पिण्याचे पाणी आरक्षित करण्यात आले आहे. तसेच मालेगाव महानगरपालिकेच्या मागणीनुसार चणकापूर धरणातून १३९९.८९ द.ल.घ.फू.पाणी आरक्षित करण्यात आले आहे.१५ हजार दलघफू एकूण मागणीनाशिक पाटबंधारे विभाग,पालखेड पाटबंधारे विभाग व मालेगांव पाटबंधारे विभाग या तीन विभागांची मिळून शासनमान्य आरक्षणनुसार १५ हजार २२० द.ल.घ.फू मागणी असून आकस्मिक मागणी ४ हजार ८९१ द.ल.घ.फू एवढी आहे. त्यात नाशिक महानगरपालिका, थर्मल पावर स्टेशन एकलहरे, सिन्नर एमआयडीसी, महाराष्ट्र औद्योगिक यांत्रिकी संशोधन केंद्र, येवला वाईन पार्क, पालखेड, मनमाड ग्रामपंचायत, येवला ग्रामपंचायत आणि मनमाड रेल्वेस्टेशन येथे मोठ्या प्रमाणावर पाणी आरक्षित करण्यात येते. चणकापूर मधून मालेगांव महानगरपालिका पाणी पुरवठा, सटाणा नगरपरिषद, दाभाडी ११ गाव पाणी पुरवठा या मुख्य योजना असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईDamधरण