शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
2
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
3
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
4
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
5
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
6
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
7
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
8
इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही...
9
ऑनलाईन गेमचा नाद लय बेकार! ११ लाख गमावल्यानंतर सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
10
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
11
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
12
वाशीच्या दिशेने येणारा ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला, मुंबई-पुणे महामार्गावरील घटना
13
Pitru Paksha 2025: पितृपक्षात कसे केले जाते दशमी श्राद्ध? वाचा महत्त्व, मुहूर्त आणि श्राद्धविधी!
14
दुकानं-बस वाहून गेल्या, सगळीकडे पाणीच पाणी! हिमाचलच्या मंडीमध्ये पावसामुळे हाहाकार; ३ जणांचा मृत्यू
15
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
16
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
17
अभिनेत्री हुमा कुरेशीने गुपचूप उरकला साखरपुडा, खाजगी समारंभातील फोटो आला समोर
18
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
19
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
20
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?

मराठवाड्याला यंदा पाणी नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 00:47 IST

नाशिक : यंदा पाऊस चांगला झाला असल्याने जिल्ह्यातील शेती, पिण्याचे पाणी आणि इतर कामांसाठी पाण्याची कमतरता भासणार नाही. जायकवाडी धरणही भरले आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून दरवर्षीप्रमाणे मराठवाड्याला देण्यात येणारे पाणी यंदा वाचणार असून, जिल्ह्यातील धरणाचे पाणी जिल्ह्यातच वापरण्यासाठी अधिकाऱ्यांनी आकस्मिक पाण्याचेही नियोजन करावे अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केल्या आहेत.

ठळक मुद्देछगन भुजबळ : जिल्ह्यातील धरणांचे पाणी आरक्षण जाहीर

नाशिक : यंदा पाऊस चांगला झाला असल्याने जिल्ह्यातील शेती, पिण्याचे पाणी आणि इतर कामांसाठी पाण्याची कमतरता भासणार नाही. जायकवाडी धरणही भरले आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून दरवर्षीप्रमाणे मराठवाड्याला देण्यात येणारे पाणी यंदा वाचणार असून, जिल्ह्यातील धरणाचे पाणी जिल्ह्यातच वापरण्यासाठी अधिकाऱ्यांनी आकस्मिक पाण्याचेही नियोजन करावे अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केल्या आहेत.जिल्ह्यातील धरणाचे उपलब्ध पाण्याचे सिंचन, पिण्याचे तसेच औद्योगिक वापरण्यासाठी आरक्षण करण्यासाठी शनिवारी ( दि.१०) भुजबळ यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. त्यावेळी भुजबळ पुढे म्हणाले, जिल्ह्यातील धरणाचे दारणा, चणकापूर, गंगापूर आणि पालखेड समूह असे चार विभाग केले जातात. यामध्ये मोठे प्रकल्प एकूण १५, मध्यम प्रकल्प ९, लघु प्रकल्प ७७ तर कोल्हापुर पध्दतीचे १२ बंधारे आहेत. जिल्ह्यासाठी ७५ हजार ८६६ द.ल.घ.फू पाणीसाठ्याची आवश्यकता आहे. सध्या ७२ हजार ५८१ द.ल.घ.फू पाणीसाठा असून गेल्यावर्षी पेक्षा ४.३८ टक्के इतका पाणीसाठी कमी आहे. तसेच आरक्षित पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने व तालुकास्तरावरुन गटविकास अधिकारी यांनी आकस्मिक मागणी लवकरात लवकर कळवावी, अशी सूचनाही त्यांनी केली. महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतीकडून येणारी पाण्याची मागणी नोंदविण्यात यावी. तसेच आलेल्या मागणीनुसार पिण्याचे पाण्याचे आरक्षण करण्यात यावे. कुठेही पाण्याची कमतरता भासता कामा नये, यासाठी पाणी आरक्षणाचे नियोजन योग्यप्रकारे करावे असे आवाहनही त्यांनी केले. बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अधिक्षक अभियंता अलका अहिरराव, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, कार्यकारी अभियंता (पालखेड) राजेश गोवर्धने, मालेगांव कार्यकारी अभियंता एम.एस.चौधरी उपस्थित होते.मनपाला ५,५०० दलघफू पाणीमहापालिकेला साडेपाच हजार दसलक्ष घनफुट पाणी आरक्षित करण्यात आले आहे. त्यात गंगापूर ३ हजार ८०० द.ल.घ.फू, दारणा ४०० द.ल.घ.फू., मुकणे १ हजार ३०० द.ल.घ.फू. असे एकूण ५ हजार ५०० द.ल.घ.फू. इतके पिण्याचे पाणी आरक्षित करण्यात आले आहे. तसेच मालेगाव महानगरपालिकेच्या मागणीनुसार चणकापूर धरणातून १३९९.८९ द.ल.घ.फू.पाणी आरक्षित करण्यात आले आहे.१५ हजार दलघफू एकूण मागणीनाशिक पाटबंधारे विभाग,पालखेड पाटबंधारे विभाग व मालेगांव पाटबंधारे विभाग या तीन विभागांची मिळून शासनमान्य आरक्षणनुसार १५ हजार २२० द.ल.घ.फू मागणी असून आकस्मिक मागणी ४ हजार ८९१ द.ल.घ.फू एवढी आहे. त्यात नाशिक महानगरपालिका, थर्मल पावर स्टेशन एकलहरे, सिन्नर एमआयडीसी, महाराष्ट्र औद्योगिक यांत्रिकी संशोधन केंद्र, येवला वाईन पार्क, पालखेड, मनमाड ग्रामपंचायत, येवला ग्रामपंचायत आणि मनमाड रेल्वेस्टेशन येथे मोठ्या प्रमाणावर पाणी आरक्षित करण्यात येते. चणकापूर मधून मालेगांव महानगरपालिका पाणी पुरवठा, सटाणा नगरपरिषद, दाभाडी ११ गाव पाणी पुरवठा या मुख्य योजना असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईDamधरण