शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

सिन्नरचे पाणी पळविण्याचा मराठवाड्याचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 01:46 IST

: जिल्ह्यातील धरणातील पाणी अन्य जिल्ह्यांना द्यावे लागत असल्याने नाशिककरांवरच आता जलसंकट ओढवले आहे. त्यातून कसाबसा मार्ग काढण्यासाठी दमणगंगा-नार-पार प्रकल्पातील १२ टीएमसी पाणी नाशिक जिल्ह्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असून, सिन्नरसारख्या दुष्काळी तालुक्याला वरदान ठरू शकेल असे १२ टीएमसी पाणी मंजूर झाले असताना आता हे पाणी मराठवाड्यासाठी पळविण्याचे घाटत आहे.

नाशिक : जिल्ह्यातील धरणातील पाणी अन्य जिल्ह्यांना द्यावे लागत असल्याने नाशिककरांवरच आता जलसंकट ओढवले आहे. त्यातून कसाबसा मार्ग काढण्यासाठी दमणगंगा-नार-पार प्रकल्पातील १२ टीएमसी पाणी नाशिक जिल्ह्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असून, सिन्नरसारख्या दुष्काळी तालुक्याला वरदान ठरू शकेल असे १२ टीएमसी पाणी मंजूर झाले असताना आता हे पाणी मराठवाड्यासाठी पळविण्याचे घाटत आहे.गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी तसा प्रस्ताव शासनाला पाठविला असून, शासनानेदेखील बोटचेपी भूमिका घेत जलवितरणाचे अधिकार या कार्यकारी संचालकांनाच प्रदान केले आहेत. राष्टÑवादी जलचिंतन सेलचे अध्यक्ष अभियंता राजेंद्र जाधव यांनी कागदपत्र्याच्या पुराव्यानिशी हा आरोप केला आहे आणि आता नाशिककरांनी या अन्यायाविरुध्द लढण्याचे आवाहनही केले आहे.यासंदर्भात यापूर्वीही खासदार हेमंत गोडसे आणि राजेंद्र जाधव यांनी डीपीआर मंजूर करण्याबाबत बैठक घेतली होती.  या दोन्ही प्रकल्पांचा डीपीआर राष्ट्रीय जलविकास अभिकरणामार्फत करण्यात येत आहे. डीपीआरच्या कामाने वेग घेतला असताना गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक अजय कोहिरकर यांनी २५ जून रोजी शासनास पत्र पाठवून या दोन्ही प्रकल्पांचे बारा हजार दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडी धरणाची तूट भरून काढण्यासाठी वापरावे, अशी शिफारस केली आहे. याबाबतीत शासनानेसुद्धा बोटचेपी भूमिका घेत १७ आॅक्टोबर रोजी पत्र पाठवून सदरचे पाणी वळवण्याचे अधिकार कोहिरकर यांना प्रदान केले आहेत, असा आरोप जाधव यांनी केला आहे.प्रकल्प अहवालाच्या खर्चास मान्यताच्नाशिककरांच्या हक्काचे पाणी पळवले जात असल्याने गेली तीन वर्ष महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाकडून नाशिकच्या ‘दमणगंगा-एकदरे-गंगापूर धरण (क्षमता पाच हजार दशलक्ष घनफूट) आणि सिन्नरच्या दुष्काळी भागास पाणी देण्यासाठी ‘दमणगंगा-गारगाई-वैतरणा-कडवा-देव लिंक (क्षमता ७ हजार दशलक्ष घनफूट) असे दोन प्रकल्प मंजूर केले. या दोन्ही प्रकल्पांचे सविस्तर प्रकल्प अहवाल बनवण्यासाठी लागणाऱ्या४२ कोटींच्या खर्चास मान्यता मिळाली आहे.

टॅग्स :WaterपाणीMarathwadaमराठवाडा