शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

प्रमाणभाषेचा दुराग्रह सोडून सर्वसमावेशक झाल्यासच मराठी समृद्ध : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2021 01:53 IST

बहुजन भाषेतील शब्द मनाची पकड पटकन घेतात. भाषा पांडित्यप्रचुर, क्लिष्ट न राहता ओघवती होते. सध्याच्या संगणक इंटरनेटच्या जमान्यात ‘कॅची वर्ड’ ही संज्ञा पुढे आली आहे. सोपे आणि पकड घेणारे शब्द मराठी साहित्यात आले, तर त्याची नव्या पिढीला गोडी लागेल. त्यामुळे प्रमाण भाषेचा दुराग्रह सोडून स्थानिक बोलीभाषांबाबत मराठी सर्वसमावेशक झाली, तरच ती अधिक समृद्ध होईल, असे माझे ठाम मत असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप सोहळ्यात ते बोलत होते.

ठळक मुद्दे मराठी साहित्य संमेलनाचा समारोप

नाशिक : बहुजन भाषेतील शब्द मनाची पकड पटकन घेतात. भाषा पांडित्यप्रचुर, क्लिष्ट न राहता ओघवती होते. सध्याच्या संगणक इंटरनेटच्या जमान्यात ‘कॅची वर्ड’ ही संज्ञा पुढे आली आहे. सोपे आणि पकड घेणारे शब्द मराठी साहित्यात आले, तर त्याची नव्या पिढीला गोडी लागेल. त्यामुळे प्रमाण भाषेचा दुराग्रह सोडून स्थानिक बोलीभाषांबाबत मराठी सर्वसमावेशक झाली, तरच ती अधिक समृद्ध होईल, असे माझे ठाम मत असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप सोहळ्यात ते बोलत होते.

कुसुमाग्रज नगरीत झालेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सांगता सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, कार्याध्यक्ष हेमंत टकले, निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार हेमंत गोडसे, कार्यवाह दादा गोऱ्हे, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार सुधीर तांबे, आमदार हिरामण खोसकर, पंकज भुजबळ, विश्वास ठाकूर, दीपक चंदे, प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे, मिलिंद कुलकर्णी, प्राचार्य प्रशांत पाटील, दिलीप साळवेकर, संजय करंजकर, सुभाष पाटील, किरण समेळ, प्रतिभा सराफ, प्रशांत देशपांडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना पवार यांनी नव्या पिढीतून आपल्याला रोबो घडवायचे नसून माणसे घडवायची असल्याचे सांगितले. त्यासाठी मराठी मन जपायला हवं आणि मातृभाषेतून जपलं जाऊ शकतं, असा माझा विश्वास असल्याचेही नमूद केले.

इन्फो

मराठीसाठी लवकरच बैठकीचे आयोजन

साहित्य संमेलनाला येण्यापूर्वी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे व काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपण चर्चा करून मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काय करू शकतो, याची माहिती घेतल्याचे सांगितले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी असलेली कमतरता दूर करण्यासाठी किंवा काही दुरुस्त्या असतील, त्या दुरुस्त करण्यासाठी राज्यकर्ते म्हणून यातून मार्ग काढण्यासाठी बैठक घेऊन जे करावे लागेल ते निश्चित करू, असे आश्वासन दिले.

इन्फो

सावरकरांनी मंदिरात पुजारी म्हणून दलिताची केली होती नियुक्ती

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्य चळवळीच्या योगदानावर चर्चाच होऊ शकत नाही. या चळवळीत त्यांचे योगदान, त्याग, सर्वस्व अर्पण करण्याची भूमिका, स्वातंत्र्याची चेतना पेटविणारे व शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचविणारे त्यांचे लिखाण पाहता मराठी भाषा ते कधीही विसरू शकणार नाही. असे असताना वाद कशासाठी? सावरकर हेदेखील विज्ञानवादीच होते. त्यांनी अयोग्य गोष्टींना विरोध केला. गाईंबद्दल सावरकरांचे विचार विज्ञानवादी होते. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात सावरकर रत्नागिरीत राहत होते. तेथे त्यांनी पतितपावन हे छोटे मंदिर बांधले व त्या मंदिराचा पुजारी म्हणून एका दलिताची नेमणूक केली. त्यामुळे सावरकरांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान व त्यांचे विज्ञानवादी विचार पाहता, नाशिककर सावरकरांच्या नावाला विरोध करूच शकत नसल्याचेही पवार यांनी नमूद केले.

टॅग्स :NashikनाशिकSharad Pawarशरद पवारcultureसांस्कृतिक