शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

Marathi Sahitya Sammelan: माय सरसोतीचा नाशिक फेस्टिव्हल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 10:15 IST

Marathi Sahitya Sammelan: सालाबादप्रमाणे नाशिकच्याही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात वादाचे रंग भरण्याचा प्रयत्न झालाच. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या नगरीत, जनस्थानात भरणाऱ्या या ९४व्या संमेलनाच्या खरे तर अनेक चांगल्या बाजू आहेत.

- श्रीमंत माने(कार्यकारी संपादक, लोकमत, नागपूर)सालाबादप्रमाणे नाशिकच्याही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात वादाचे रंग भरण्याचा प्रयत्न झालाच. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या नगरीत, जनस्थानात भरणाऱ्या या ९४व्या संमेलनाच्या खरे तर अनेक चांगल्या बाजू आहेत. डॉ. जयंत नारळीकरांच्या रूपाने वादातीत असे, वाचकप्रिय अन् सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शास्त्रज्ञ म्हणून जबाबदारी सांभाळतानाच मराठी साहित्यातही मोठे योगदान दिलेले विज्ञान लेखक गोदावरीकाठी भरणाऱ्या या साहित्यिकांच्या कुंभमेळ्याला संमेलनाध्यक्ष म्हणून लाभलेत. त्यांची किंवा अगदी रामदास भटकळ यांच्यासारख्या दिग्गज प्रकाशकांची मुलाखत बरेच काही देऊन जाईल, असा वाचकांना विश्वास आहे.

कोरोना महामारीच्या संकटाने झाकोळलेले हे संमेलन होईल तरी कधी, असा प्रश्न पडलेला असताना व बहुतेक रद्दच होते, असे वाटत असताना आयोजकांनी पुन्हा कंबर कसल्याने उशिरा का होईना ते पार पडत आहे. तरीदेखील संमेलन व वाद हा पायंडा काही मोडायचे नाव घेत नाही. त्यातही स्वागताध्यक्ष छगन भुजबळ व त्यांचे पुतणे, माजी खासदार समीर भुजबळ यांच्यासह सहकाऱ्यांनी संमेलनासाठी घेतलेल्या पुढाकारामुळे शेवटच्या टप्प्यात थोडे राजकीय आरोपही झाले. हे असे संमेलन असते का, वगैरे विचारणा होऊ लागली. तथापि, जे भुजबळांना ओळखतात त्यांना त्यांच्या शिक्षण संस्थेच्या आवारात मोठ्या थाटामाटात होऊ घातलेल्या साहित्य संमेलनाविषयी फारसे आश्चर्य वाटणार नाही. जे काही करायचे ते जोरात, भव्य-दिव्य ही थोरल्या किंवा धाकट्या भुजबळांच्या कामाची पद्धतच आहे. भुजबळ कुटुंबावर ईडीचे संकट येण्यापूर्वीची चार-सहा वर्षे नाशिककरांना चांगलीच आठवणीत आहेत.

नाशिक फेस्टिव्हल नावाने असेच भव्य-दिव्य आयोजन ते करायचे. बॉलीवूडमधील मोठमोठे कलावंत यायचे, भुजबळांच्या आयोजन कौशल्याबद्दल लोक तोंडात बोटे घालायचे व तरीही हजारोंच्या संख्येने महाेत्सवाचा आनंद लुटायचे. महाराष्ट्र सदन प्रकरणाने भुजबळांवर संकट आले व फेस्टिव्हल बंद पडला. काका-पुतण्याची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर राजकारण रंगले. लोकसभेला पुन्हा अपयश आले, पण विधानसभेत येवला ठाणे फत्ते झाले, नांदगावचा किल्ला मात्र पडला. राज्यात अनपेक्षितपणे महाविकास आघाडीची मोट बांधली गेली. राष्ट्रवादी सत्तेवर आली आणि २०२०च्या २८ नोव्हेंबरला तिन्ही पक्षांच्या दोन-दोनच मंत्र्यांनी शपथ घ्यायची होती तेव्हा जयंत पाटलांसोबत भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. सरकारमधील बडे मंत्री व नाशिकचे पालकमंत्री म्हणून साहित्य संमेलनाच्या रूपाने भुजबळांना नाशिक फेस्टिव्हलच्या आठवणींना उजाळा देण्याची जणू संधी लाभलीय. खुद्द महात्मा जोतिराव फुल्यांनी दीडशे वर्षांपूर्वी घालमोड्या दादांचा मेळावा म्हणून संमेलनाला उपस्थित राहण्यास नकार दिला होता. पण, तो झाला इतिहास. आताचा काळ वेगळा आहे. तेव्हा, लेखक, कवी, समीक्षक, विचारवंत अशी मंडळी एकत्र येत असल्याने नाशिकच्या संमेलनात धीरगंभीर चर्चा होईल खरे. चर्चेत मात्र संमेलनाची भव्यदिव्यताच राहील. त्याचे कारण, संमेलनाच्या रूपात हा खरे तर माय सरसोतीचा नाशिक फेस्टिव्हल आहे.

 

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनNashikनाशिक