शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

मराठी साहित्यामधील  व्यवहार मोकळा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 01:19 IST

मराठी साहित्याच्या नवकथेच्या काळात सामाजिक प्रश्नांवर लिखाण करणाऱ्या साहित्यिकांपेक्षा विशिष्ट वर्तुळातील साहित्यिकांच्याच साहित्याची चर्चा घडवून आणली गेली. त्यामुळे पीडितांच्या व्यथा मांडणा-या लेखकचे साहित्य उपेक्षित राहिल्याचे सांगतानाच मराठी साहित्यातील व्यवहार मोकळा आणि चांगला घडत नसल्याचे परखड मत ज्येष्ठ साहित्यिक तथा समीक्षक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केले.

नाशिक : मराठी साहित्याच्या नवकथेच्या काळात सामाजिक प्रश्नांवर लिखाण करणाऱ्या साहित्यिकांपेक्षा विशिष्ट वर्तुळातील साहित्यिकांच्याच साहित्याची चर्चा घडवून आणली गेली. त्यामुळे पीडितांच्या व्यथा मांडणा-या लेखकचे साहित्य उपेक्षित राहिल्याचे सांगतानाच मराठी साहित्यातील व्यवहार मोकळा आणि चांगला घडत नसल्याचे परखड मत ज्येष्ठ साहित्यिक तथा समीक्षक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केले.  कुसुमाग्रज स्मारकात संवाद संस्थेच्या ३८व्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर चैत्र संवाद पुरस्कार, नीलवसंत संवाद पुरस्कार वितरणासह ज्येष्ठ साहित्यिकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर संवाद संस्थेचे अभिमन्यू सूर्यवंशी, बाळासाहेब गुंजाळ, चंद्रकांत महामिने, ज्येष्ठ पत्रकार दत्ता सराफ, संतोष हुदलीकर, चैत्रा हुदलीकर आदी उपस्थित होते. डॉ. नागनाथ कोतापल्ले म्हणाले, मराठी विश्वात सत्यशोधक साहित्याची मोठी परंपरा लाभली आहे. अभिरुची जपणारे धाडसी लेखकांची सध्या फारशी दखल घेतली जात नाही. ज्या साहित्यिकांनी जनमाणसाची जडणघडण केली आहे, अशा साहित्यिकांचा नव्याने लिहिणाºयांनी शोध घ्यायला हवा. साहित्य  क्षेत्रातही भक्तवर्गाचा उदय होत असल्याने सामाजाची व्यथा  मांडणारे साहित्य उपेक्षित राहते. साहित्यात चिकित्सेला, समीक्षेला महत्त्व असते. परंतु मराठी  साहित्यात एका वर्गातील साहित्यिकांचा भक्तवर्ग वाढत पीडितांचे वंचितांचे जीवन मांडणारे महात्मा फुले यांच्यासह ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई यांच्यासारखे साहित्यिक उपेक्षित राहिल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वी धाडसी व निर्भयपणे काम करणारे संपादक होते. परंतु, आता मीडिया भयावह स्थितीतून मार्गक्रमण करीत असल्याचे सांगतानाच माध्यमे ठराविक  लोकांच्या हाती एकवटत चालल्याने समाजाचे दु:ख त्यातून उमटताना दिसत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. सूत्रसंचालन सुरेखा बो-हाडे यांनी केले, आभार डॉ. किरण पिंगळे यांनी मानले.महामिने, सराफ यांचा सत्कारलेखक अशोक जाधव यांच्या ‘भंगार’ या आत्मकथेला व कवी रावसाहेब कुवर यांच्या ‘हरवल्या आवाजाची फिर्याद’ या कविता संग्रहास चैत्रसंवाद पुरस्कार डॉ. श्रीकांत नरुले यांच्या ‘जगदीश खेबूडकरांच्या लावण्या’ या समीक्षेला नीलवसंत संवाद पुरस्काराने सन्मान करण्यात आला. तसेच ज्येष्ठ पत्रकार दत्ता सराफ व चंद्रकांत महामिने यांचा सन्मानपत्र देऊन डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

टॅग्स :literatureसाहित्यNashikनाशिक