शहरं
Join us  
Trending Stories
1
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
2
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
3
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
4
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
5
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
6
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
7
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
8
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
9
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?
10
"चीन अमेरिकेला मागे टाकणार, तिसरं महायुद्ध, अन्...!"; 2026 साठी बाबा वेंगाची भविष्यवाणी, भारतासह जागात काय-काय घडणार?
11
बाजारात गेलेल्या सुनेचा २ वर्षांनी विहिरीत सापडला सांगाडा; राँग नंबरवरुन सुरू झालेली लव्हस्टोरी
12
जगात पहिल्यांदा 'ड्रोन वॉल' बनणार; रशियाला घाबरुन २७ देशांनी निर्णय घेतला, जाणून घ्या कसे करणार काम
13
'अनेकदा संघाला संपवण्याचे प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा आहे'- PM नरेंद्र मोदी
14
Pune Viral Video: केस पकडले, कमरेत लाथा मारल्या; पुण्यात भररस्त्यात तरुणीला मारहाण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
15
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
16
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीनिमित्त सरकाने प्रसिद्ध केलं विशेष नाणं आणि टपाल तिकीट, मोदी म्हणाले...
17
Viral Video: मुंबई लोकलमध्ये नवरात्रीचा जल्लोष! 'एक नंबर, तुझी कंबर' गाण्यावर महिलांचा जबरदस्त डान्स
18
'मैत्रीमुळे विचारधारा सोडली, असे होत नाही.. ' संघाच्या निमंत्रण पत्रिकेवर न्यायाधीशांच्या आईचे नाव असल्याने वाद !
19
भोजपुरी अभिनेता पवन सिंह भाजपात; "जीवे मारले तरी मराठी बोलणार नाही", या विधानावरून झाला होता वाद
20
Asia Cup 2025 : ट्रॉफी द्या, अन्यथा..; BCCI ने मोहसिन नकवींना दिला ७२ तासांचा अल्टिमेटम

मराठी साहित्यामधील  व्यवहार मोकळा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 01:19 IST

मराठी साहित्याच्या नवकथेच्या काळात सामाजिक प्रश्नांवर लिखाण करणाऱ्या साहित्यिकांपेक्षा विशिष्ट वर्तुळातील साहित्यिकांच्याच साहित्याची चर्चा घडवून आणली गेली. त्यामुळे पीडितांच्या व्यथा मांडणा-या लेखकचे साहित्य उपेक्षित राहिल्याचे सांगतानाच मराठी साहित्यातील व्यवहार मोकळा आणि चांगला घडत नसल्याचे परखड मत ज्येष्ठ साहित्यिक तथा समीक्षक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केले.

नाशिक : मराठी साहित्याच्या नवकथेच्या काळात सामाजिक प्रश्नांवर लिखाण करणाऱ्या साहित्यिकांपेक्षा विशिष्ट वर्तुळातील साहित्यिकांच्याच साहित्याची चर्चा घडवून आणली गेली. त्यामुळे पीडितांच्या व्यथा मांडणा-या लेखकचे साहित्य उपेक्षित राहिल्याचे सांगतानाच मराठी साहित्यातील व्यवहार मोकळा आणि चांगला घडत नसल्याचे परखड मत ज्येष्ठ साहित्यिक तथा समीक्षक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केले.  कुसुमाग्रज स्मारकात संवाद संस्थेच्या ३८व्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर चैत्र संवाद पुरस्कार, नीलवसंत संवाद पुरस्कार वितरणासह ज्येष्ठ साहित्यिकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर संवाद संस्थेचे अभिमन्यू सूर्यवंशी, बाळासाहेब गुंजाळ, चंद्रकांत महामिने, ज्येष्ठ पत्रकार दत्ता सराफ, संतोष हुदलीकर, चैत्रा हुदलीकर आदी उपस्थित होते. डॉ. नागनाथ कोतापल्ले म्हणाले, मराठी विश्वात सत्यशोधक साहित्याची मोठी परंपरा लाभली आहे. अभिरुची जपणारे धाडसी लेखकांची सध्या फारशी दखल घेतली जात नाही. ज्या साहित्यिकांनी जनमाणसाची जडणघडण केली आहे, अशा साहित्यिकांचा नव्याने लिहिणाºयांनी शोध घ्यायला हवा. साहित्य  क्षेत्रातही भक्तवर्गाचा उदय होत असल्याने सामाजाची व्यथा  मांडणारे साहित्य उपेक्षित राहते. साहित्यात चिकित्सेला, समीक्षेला महत्त्व असते. परंतु मराठी  साहित्यात एका वर्गातील साहित्यिकांचा भक्तवर्ग वाढत पीडितांचे वंचितांचे जीवन मांडणारे महात्मा फुले यांच्यासह ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई यांच्यासारखे साहित्यिक उपेक्षित राहिल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वी धाडसी व निर्भयपणे काम करणारे संपादक होते. परंतु, आता मीडिया भयावह स्थितीतून मार्गक्रमण करीत असल्याचे सांगतानाच माध्यमे ठराविक  लोकांच्या हाती एकवटत चालल्याने समाजाचे दु:ख त्यातून उमटताना दिसत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. सूत्रसंचालन सुरेखा बो-हाडे यांनी केले, आभार डॉ. किरण पिंगळे यांनी मानले.महामिने, सराफ यांचा सत्कारलेखक अशोक जाधव यांच्या ‘भंगार’ या आत्मकथेला व कवी रावसाहेब कुवर यांच्या ‘हरवल्या आवाजाची फिर्याद’ या कविता संग्रहास चैत्रसंवाद पुरस्कार डॉ. श्रीकांत नरुले यांच्या ‘जगदीश खेबूडकरांच्या लावण्या’ या समीक्षेला नीलवसंत संवाद पुरस्काराने सन्मान करण्यात आला. तसेच ज्येष्ठ पत्रकार दत्ता सराफ व चंद्रकांत महामिने यांचा सन्मानपत्र देऊन डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

टॅग्स :literatureसाहित्यNashikनाशिक