शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
2
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
3
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
4
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
5
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
6
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
7
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
8
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
9
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
10
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
11
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
12
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
13
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
14
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
15
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
16
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
17
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
18
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
19
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!
20
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू

द्राक्षाचे दर कोसळल्याने उत्पादक चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 23:11 IST

शिरवाडे वणी : निफाड तालुक्यासह शिरवाडे वणी परिसरात ऑक्टोबर महिन्यात छाटणी केलेल्या द्राक्षाच्या काढणीला वेग आला असून, प्रतिवर्षाच्या तुलनेत या वर्षी द्राक्षाचे बाजारभाव कोसळल्याने द्राक्ष उत्पादक चिंताग्रस्त दिसून येत आहे.

ठळक मुद्देशेतीव्यवसायाला घरघर : खते, मजुरीच्या खर्चामुळे आर्थिक पेच

शिरवाडे वणी : निफाड तालुक्यासह शिरवाडे वणी परिसरात ऑक्टोबर महिन्यात छाटणी केलेल्या द्राक्षाच्या काढणीला वेग आला असून, प्रतिवर्षाच्या तुलनेत या वर्षी द्राक्षाचे बाजारभाव कोसळल्याने द्राक्ष उत्पादक चिंताग्रस्त दिसून येत आहे.निफाड तालुक्याचा उत्तर-पूर्व भाग हा द्राक्ष उत्पादन निर्मितीमध्ये अग्रेसर असून, द्राक्षाचे पीक हे प्रमुख नगदी पीक व परकीय चलन मिळवून देणारे एक असले तरी सध्याच्या मिळत असलेल्या कोसळत्या बाजारभावामुळे आता ते भरवशाचे पीक राहिले नाही. परिसरातून स्थानिक बाजारपेठेपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये शेतकरी तसेच व्यापारी द्राक्षे पाठविण्याचे काम करीत असतात. मागील वर्षी कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर खर्च अधिक व उत्पादन शून्य झाले असून, यावर्षीसुद्धा ह्ययेरे माझ्या मागल्याह्ण अशी परिस्थिती निर्माण होऊ पाहत आहे.सद्य:स्थितीत स्थानिक बाजारपेठाअंतर्गत द्राक्षाला २० ते २५ रुपयांपर्यंत भाव मिळत असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठअंतर्गत निर्यातक्षम प्रतीच्या द्राक्षाला ३० ते ४० रुपयांपर्यंत इतकाच भाव मिळत असल्यामुळे त्यापासून मिळणारे उत्पन्न हे खर्च वजा जाता काहीच नसल्यामुळे तसेच द्राक्षपीक हे दिवसेंदिवस मजुरीचे वाढते दर, औषधे व खतांचे खर्च यामुळे अतिशय खर्चिक होत आहे.त्यामुळे खर्चाच्या तुलनेत हे पीक परवडेनासे झाले आहे. गेल्या पाच वर्षांच्या मागील कालखंडाकडे दृष्टिक्षेप टाकला असता द्राक्षांपासून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या भरवशावर बँक, सोसायटी, सावकारी कर्ज, पतपेढी यांचे कर्ज खासगी हातउसने पैसे उचलले असताना ते परतफेडीसाठी भरवशाचे पीक मानले जात होते; परंतु दिवसेंदिवस गारपीट, अवेळी पाऊस, बदलत्या हवामानाचे दुष्परिणाम व कोसळत्या बाजारभावाचा परिणाम यांमुळे आता तरी द्राक्ष उत्पादक हातघाईस आलेला आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांच्या डोक्यावर वाढलेला बोजा वाढतच चालला असून, प्रत्येक वर्षी द्राक्षशेतीमध्ये लाखो रुपये खर्च करून नैराश्य पदरी पडत असल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झालेला आहे.या बाबीतून सावरण्यासाठी तसेच शेतकरी वर्गाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी व शेती व्यवसायाला गतवैभव प्राप्त होण्यासाठी स्थानिक पातळीपासून शासनापर्यंत आर्थिक बळ देणे गरजेचे आहे. परिणामी अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतीव्यवसायाला नित्याचीच घरघर लागली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती