शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूर धरण परिसरात अनेक गावांचा संपर्क खंडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 14:58 IST

नाशिक - गंगापूर धरणाच्या पाण्याच्या पातळीत होत असलेली वाढ यामुळे गोदावरी नदीला हजारो क्यूसेस पाणी सोडण्यात येत असल्याने नदीच्या आजू बाजूच्या गावांना पाण्याने वेढले असून लहान मोठ्या पुलावरून पाणी जात असल्याने वाहतुकीसाठी सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांकडून बंद करण्यात आला आहे. अनेक गावातील दळण वळणाचा संपर्क तुटल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देमोठ्या पुलांवरून पाणीवाहतुकीसाठी मार्ग बंदगंगापूर- जलालपुर संपर्क खंडीत

नाशिक- गंगापूर धरणाच्या पाण्याच्या पातळीत होत असलेली वाढ यामुळे गोदावरी नदीला हजारो क्यूसेस पाणी सोडण्यात येत असल्याने नदीच्या आजू बाजूच्या गावांना पाण्याने वेढले असून लहान मोठ्या पुलावरून पाणी जात असल्याने वाहतुकीसाठी सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांकडून बंद करण्यात आला आहे. अनेक गावातील दळण वळणाचा संपर्क तुटल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

गंगापूर गोवर्धन गिरणारे वरील महादेवपूर जवळील पुलावरून पाणी जात असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव नाशिक तालुका पोलीस ठाण्याकडून बंद करण्यात आला. याठिकाणी रविवारमुळे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी तर दुसरीकडे काही कामानिमित्त ये जा करणार्यांचे हाल झाले.नाशिक - गंगापूर गोवर्धन पासून गिरणारे कडे जाणाऱ्यांना हॉटेल गम्मत जंमतीजवळ थांबविण्यात येत होते तर हरसुल- गिरणारे दुगाव पासून नाशिकच्या दिशेने येतांना महादेवपूर जवळील पाटाच्या जवळ थांबविले जात होते. तसेच गंगापूर आणि जलालपूर ला जोडणार्या पुलावरून पाणी जात असल्याने दोन्ही गावांचा संपर्क व रहदारी बंद करण्यात अली होती. गंगापूर गावातील धबधबा जवळील पूलही पाण्याखाली गेल्याने गंगापूर आंबेडकरनगर जलालपूर यांचा संपर्क व वाहतुकीला बंद झाला होता. आंबेडकर नगर मधील नागरिकांना चांदशी रोड मार्गे आनंदवल्ली वरून नाशिक ला जात येत होते. गंगापूर गावातील धबधब्यावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने पोलिसांना नियंत्रण करण्यासाठी यावे लागले . गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोलिसांनी बॅरेगेंटिंग केली होती.रविवारची सुट्टी असल्याने तसेच पुराचे पाणी पाहण्यासाठी गंगापूर गोवर्धन गावातील नागरिकांनी तसेच नाशिक हुन आलेल्या पर्यटकांनी एकच तोबा गर्दी केली होती. तीनचार दिवसापासून रात्रंदिवस सुरु असलेल्या पावसाने सर्व जण जीवन विस्कळीत झाले. गंगापूर गावातील अमरधाम पूर्ण पाण्याखाली बुडाला असल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावे लागले. जिल्हापरिषदेची रानमळा गोवर्धन येथील अंगणवाडी पाण्याने भरून गेली. संपूर्ण परिसरात पाणीच पाणी झाले होते. जवाहर एजुकेशन ट्रस्ट चे विद्यालय पाण्याखाली गेले. परिसरातील शेतकर्यांच्या शेतात पाणी घुसल्याने तसेच रस्त्यावरून गुडघ्या एवढे पाणी वाहत असल्याने सर्व परिसर जलमय झाल्याचे चित्र दिसत होते. शेतकर्यांचे पिकाचे नुकसान झाल्याचे दिसत होते. हॉटेल गम्मत जम्मत येथील पूल पाण्याखाली गेल्याने काही हौशी पर्यटकांनी सेल्फी काढण्याचा मोह आवरता येत नव्हता तर दुसरी कडे नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने सुरक्षेच्या दृष्टीने पर्यटकांना व त्यांच्या वाहनांना बाजूला करण्याचे काम करीत होते.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊसfloodपूर