शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

प्रचारासाठी भाजपाकडे अनेक मुद्दे : श्याम जाजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 00:28 IST

गेल्या साडेचार वर्षांत कधी नव्हे इतके मोठे काम मोदी सरकारने केले आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी पक्षाचा प्रचार करण्यासाठी भाजपाकडे अनेक मुद्दे असून, देशपातळीवर पक्षाची ताकद पाहता, येणाऱ्या निवडणुकीतही भाजपाच्या कुंडलीत सत्तेचा योग असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी केला.

ठळक मुद्देशक्ती केंद्रप्रमुखांच्या संमेलनात दावा

नाशिक : गेल्या साडेचार वर्षांत कधी नव्हे इतके मोठे काम मोदी सरकारने केले आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी पक्षाचा प्रचार करण्यासाठी भाजपाकडे अनेक मुद्दे असून, देशपातळीवर पक्षाची ताकद पाहता, येणाऱ्या निवडणुकीतही भाजपाच्या कुंडलीत सत्तेचा योग असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी केला.नाशिक, दिंडोरी, शिर्डी, अहमदनगर या चार लोकसभा मतदारसंघांतील शक्ती केंद्रप्रमुखांच्या संमेलनात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून गृहराज्यमंत्री राम शिंदे होते. नाईक महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात बोलताना जाजू पुढे म्हणाले, देशातील १७ राज्यांमध्ये भाजपा सत्तेत असून, लोकांचा जनाधार पक्षाला लाभला आहे आणि पक्षाची ताकदच गावोगावी उभी राहिलेली शक्ती केंद्रप्रमुख आहेत. कॉँग्रेसने गेल्या ५० वर्षांत कोणतेही काम न करता निव्वळ डंका पिटला, पण भाजपाने संपूर्ण जगातच भारताची नव्याने ओळख करून दिली असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. राम शिंदे यांनी, विरोधकांकडून खोटे नाटे आरोप केले जात आहेत. त्यामुळे आता कार्यकर्त्यांना जमिनीवर येऊन काम करावे लागणार असून शेवटच्या घटकापर्यंत पक्ष व सरकारने केलेले काम पोहोचविण्याची आपली जबाबदारी असल्याचे सांगितले. खासदार दिलीप गांधी यांनीही यावेळी मार्गदर्शन करताना पक्षाचे कामच विजयाला हातभार लावेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी आमदार रामदास आंबाडकर, प्रकाश मौले, मोहन चौधरी आदींनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक लक्ष्मण सावजी यांनी केले. कार्यक्रमास महापौर रंजना भानसी, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, मोनिका राजोळे, सुनील बागुल, प्रथमेश गिते, दादा जाधव यांच्यासह चारही लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी उपस्थित होते.खासदार अनुपस्थितभाजपाने नाशिक व दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील शक्तीप्रमुखांचे संमेलन भरविले असले तरी, नाशिकच्या जागेबाबत अद्याप भाजपाने ठोस दावा केलेला नाही. एकीकडे सेनेशी युतीची बोलणी सुरू असताना दुसरीकडे भाजपाने नाशिक लोकसभेसाठी शक्तीकेंद्र प्रमुखांची बैठक घेऊन त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे या संमेलनाकडे दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी पाठ फिरविली, तर पालकमंत्री गिरीश महाजन यांनीदेखील येण्याचे टाळले. दिवसभर संमेलन असल्याचे जाहीर करण्यात आले होते, मात्र प्रा. राम शिंदे यांनी अल्पवेळ हजेरी लावून काढता पाय घेतला, तर उपाध्यक्ष श्याम जाजू मार्गदर्शन करून निघून गेल्यावर व्यासपीठही सुनेसुने झाले होते.

टॅग्स :NashikनाशिकPoliticsराजकारणBJPभाजपा