शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

राज्यातील अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 00:15 IST

शेतकरी कर्जमाफीचे खोटे आकडे मुख्यमंत्र्यांकडून सांगितले जात आहेत. आजही अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित असल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बजेटमध्ये कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही.

सिन्नर : शेतकरी कर्जमाफीचे खोटे आकडे मुख्यमंत्र्यांकडून सांगितले जात आहेत. आजही अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित असल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बजेटमध्ये कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. एससी-एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे कर्जमाफीसाठी पळविल्याचा आरोप प्रा. सुषमा अंधारे यांनी केला.  येथील वावीवेस परिसरात महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानप्रसंगी त्या बोलत होत्या.  देशात कॉँग्रेस आणि भाजपा यांनी सत्ता उपभोगली, मात्र दोन्ही पक्षांची विचारधारा भांडवलवादी आहे. त्यामुळे जनतेकडे दुर्लक्ष होते. व्यासपीठावर माजी आमदार माणिकराव कोकाटे, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, अमोल पगारे, नारायण गायकवाड, तालुकाध्यक्ष मंगेश जाधव, डी. डी. गोर्डे, भाजपाचे शहराध्यक्ष पंकज जाधव, कृष्णा कासार, प्रवीण वर्मा, देवा जाधव, आशा जाधव, कल्पना रणशेवरे, महेंद्र उन्हवणे आदी उपस्थित होते. सर्वसामान्यांचे नेतृत्व उभे राहण्यासाठी देशासह राज्याच्या राजकारणात तिसºया पर्यायाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन प्रा. अंधारे यांनी केले.  देशासह राज्यात तीन वर्षं यशस्वी कारभार केल्याचा दावा भाजपा सरकारकडून केला जात आहे. मात्र, सर्वाधिक मोर्चे याच काळात निघाल्याकडे सत्ताधारी डोळेझाक करीत आहेत. शेतकरी संपदेखील भाजपाच्या काळात झाला. मुख्यमंत्र्यांना जनतेचे प्रश्न कळत नसल्याचा टोला प्रा. अंधारे यांनी लगावला.

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती