शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
2
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
3
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
4
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
5
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
6
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
7
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
8
करिश्माच्या मुलांचा सावत्र आईवर फसवणुकीचा आरोप, संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये मागितला वाटा
9
सामान्य चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...
10
Mhada: पैसे घेतले, पण घर दिलेच नाही; म्हाडाच्या एजन्सीनेच लोकांना फसवले!
11
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
12
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ठेवलेल्या नैवेद्याला कावळा शिवत नाही? नक्कीच हातून घडत असणार 'या' ५ चुका!
13
₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?
14
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?
15
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा जर्मन कंपनीसोबत नवीन व्यवसाय, ६ महिन्यांत शेअरने दिला ४२% परतावा
16
मीच माझ्या रुपाची राणी ग! सेल्फी पाहून लोकांनी उडवली खिल्ली पण 'तिने' डिलीट केला नाही फोटो
17
RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती, १ लाख पगार! कोण करू शकतं अर्ज?
18
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
19
एसीच्या स्फोटाने दिल्ली हादरली; पिझ्झा आउटलेटमध्ये जोरदार स्फोट!
20
E20 पेट्रोलचा सर्वाधिक फटका सीएनजी कारना; खाडकन् डोळे उघडतील, कसा तो पहा...

मानूर ग्रामस्थांना मिळाले पाणी

By admin | Updated: March 1, 2016 23:34 IST

दिलासा : चणकापूर उजव्या कालव्यातून चार दलघफू पाणी

 कळवण : चणकापूर उजव्या कालव्यातून मानूरसाठी बिगर सिंचनासाठी चार दलघफू पाणी देणे शक्य असल्याचा अहवाल गिरणा नदी खोरे प्रकल्प विभाग, नाशिकचे जिल्हाधिकारी कुशावह यांच्याकडे सादर केलेला असताना पाणी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मनमानीला प्रशासकीय यंत्रणेने चाप बसवल्याने मंगळवारी चणकापूर उजव्या कालव्यातून चार दलघफू पाणी मानूरकरांना मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.चणकापूर उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपेंद्र कुशावह यांनी दिल्यानंतर पाटबंधारे विभागाचे सहायक अभियंता पाटील यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झालेल्या गावांना चणकापूर उजव्या कालव्यातून पाणी न पोहोचल्याने आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या उपस्थितीत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होऊन पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना नियोजनाप्रमाणे पाणी वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या.दरवर्षी जिल्हाधिकारी यांच्याकडून मानूर गावासाठी पिण्याच्या पाण्याचे आरक्षण होते. मात्र पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभार व हलगर्जीपणामुळे तीन वर्षांपासून पाणी मिळत नसल्याने गेल्या २५ फेब्रुवारीला मानूरकरांवर आंदोलन करण्याची वेळ आली होती.चार दलघफू पाणी देण्याचा लेखी आदेश असूनही मानूर गावातील बंधारा पाण्याने न भरल्यामुळे मानूर येथील नागरिकांनी पंचायत समितीचे उपसभापती अ‍ॅड. संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार अनिल पुरे यांची भेट घेऊन कैफियत मांडली होती. पोलीस निरीक्षक मधुकर गावित, पाटबंधारे विभाग सहायक अभियंता ए. बी. करनाळे यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत मानूर येथील नागरिकांनी आमचे चार दलघफू पाणी का देत नाहीत व आम्हाला आमच्या हक्काचे पाणी मिळावे म्हणून मागणी केली होती . शिवाय पाटबंधारे विभाग आपली फसवणूक करत असल्याचा आरोप करून मानूरकरांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ््यांच्या मनमानीला कारभाराची चौकशीची मागणी केली होती.यावेळी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाच केराची टोपली दाखविण्याचा प्रकार समोर आला होता. तहसीलदार अनिल पुरे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांना भेंडी येथे पाणी दिले गेले मग मानूर येथे पाणी का दिले जात नाही असा जाब विचारु न यंत्रणेला धारेवर धरले होते यावेळी सहाय्यक अभियंता करनाळे यांनी तो विभाग आपल्या अंतर्गत येत नसल्याचे सांगून मानूरसाठी ४ दशलक्षघनफूट पाणी आरिक्षत करण्यात आल्याचे बैठकीत सांगितले होते.मानूरसाठी गेल्या तीन वर्षांपासून प्रत्येक वेळी पाणी आरक्षित होते. मानूर ग्रामपंचायतीने पाणीपट्टी भरलेली असूनही मानूर गावाला पाणी मिळालेले नाही त्यामुळे पाटबंधारे विभागाने आपली फसवणूक केल्याचे ग्रामस्थांनी बैठकीत सांगितले होते, त्यामुळे पाटबंधारे विभागावरील विश्वास उडाल्याचे सांगून पाणी द्या अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली होती, मानूर येथील नागरिकांनी शासनाचा निषेध नोंदवत वेळ आली तर हक्काच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचे सांगून बैठकीतून काढता पाय घेतला होता व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशीची मागणी केली होती . (वार्ताहर)