शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
2
Video : पॅराग्लायडिंग करण्यासाठी 'तो' धावत गेला अन् दरीत कोसळला! व्हिडीओ बघून चुकेल काळजाचा ठोका
3
BSE Bomb Threat: "बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीत दुपारी ३ वाजता बॉम्ब स्फोट होणार" धमकीचा ईमेल!
4
संतापजनक! ६ मुलं तरी मुखाग्नीसाठी ६ तास थांबले, अंत्यसंस्कारावेळी संपत्तीवरुन स्मशानभूमीत भिडले
5
हत्या की अपघात? रस्त्यावर स्कूटी, शेतात चप्पल... बेपत्ता बँक मॅनेजरचा विहिरीत सापडला मृतदेह
6
जम्मू-काश्मीरमधील दोडामध्ये भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेले वाहन दरीत कोसळले; सात जणांचा मृत्यू
7
Bread Gulabjam: उरलेल्या ब्रेडच्या स्लाईजपासून १० मिनिटात करा मऊ रसरशीत गुलाबजाम! 
8
"मी एक मोठा सिनेमा करतोय...भाऊ कदम अन् 'हा' अभिनेता दिसणार"; निलेश साबळेचा खुलासा
9
टाटाचा 'हा' स्टॉक ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर! गुंतवणूकदार मालामाल, तुम्ही खरेदी केलाय का?
10
'तिला न्याय देण्याऐवजी भाजपच्या व्यवस्थेने आरोपींना वाचवले'; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र
11
कुतुहलापोटी रेल्वे इंजिन बघायला वर चढला, पण हाय पॉवर केबलचा करंट जीवावर बेतला; १६ वर्षीय मुलाचा मृत्यू
12
दोन महिलांपुढे पायलटनेही हात टेकले; विमानात जोरजोरात भांडत बसल्या अन् पुढे असे घडले...
13
१३८ दिवस शनि वक्री: ५ राशींवर शनिची वक्र दृष्टी कायम, ‘हे’ रामबाण उपाय कराच; शनि शुभ करेल!
14
"तो लहान मुलगा म्हणाला मी उंदीर खाल्ला...", 'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम अभिनेत्रीने सांगितला अंगावर शहारे आणणारा अनुभव
15
DMR Stock Price: ५ वर ८ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरची किंमत २०० रुपयांपेक्षाही कमी, स्टॉकमध्ये १४ टक्क्यांपेक्षाही अधिक तेजी
16
टेस्लाची पहिली कार मॉडल Y लाँच, किंमत २३ लाख नाही, तुमचा आमचा श्वास रोखणारी... EMI किती?
17
सोने सांभाळण्याची भीती वाटते? ऑनलाईन पर्यायातून मिळेल जास्त नफा, कशी करायची गुंतवणूक?
18
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?
19
वाहन उद्योग क्षेत्रासाठी आजचा दिवस महत्त्वाचा; एकाचवेळी दोन दिग्गज कंपन्या भारतात एन्ट्री करणार
20
निमिषा प्रियाचा जीव वाचवण्यासाठी आणखी एक आशेचा किरण! येमेनच्या बंद खोलीत चर्चा सुरू

मानूर ग्रामस्थांना मिळाले पाणी

By admin | Updated: March 1, 2016 23:34 IST

दिलासा : चणकापूर उजव्या कालव्यातून चार दलघफू पाणी

 कळवण : चणकापूर उजव्या कालव्यातून मानूरसाठी बिगर सिंचनासाठी चार दलघफू पाणी देणे शक्य असल्याचा अहवाल गिरणा नदी खोरे प्रकल्प विभाग, नाशिकचे जिल्हाधिकारी कुशावह यांच्याकडे सादर केलेला असताना पाणी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मनमानीला प्रशासकीय यंत्रणेने चाप बसवल्याने मंगळवारी चणकापूर उजव्या कालव्यातून चार दलघफू पाणी मानूरकरांना मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.चणकापूर उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपेंद्र कुशावह यांनी दिल्यानंतर पाटबंधारे विभागाचे सहायक अभियंता पाटील यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झालेल्या गावांना चणकापूर उजव्या कालव्यातून पाणी न पोहोचल्याने आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या उपस्थितीत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होऊन पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना नियोजनाप्रमाणे पाणी वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या.दरवर्षी जिल्हाधिकारी यांच्याकडून मानूर गावासाठी पिण्याच्या पाण्याचे आरक्षण होते. मात्र पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभार व हलगर्जीपणामुळे तीन वर्षांपासून पाणी मिळत नसल्याने गेल्या २५ फेब्रुवारीला मानूरकरांवर आंदोलन करण्याची वेळ आली होती.चार दलघफू पाणी देण्याचा लेखी आदेश असूनही मानूर गावातील बंधारा पाण्याने न भरल्यामुळे मानूर येथील नागरिकांनी पंचायत समितीचे उपसभापती अ‍ॅड. संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार अनिल पुरे यांची भेट घेऊन कैफियत मांडली होती. पोलीस निरीक्षक मधुकर गावित, पाटबंधारे विभाग सहायक अभियंता ए. बी. करनाळे यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत मानूर येथील नागरिकांनी आमचे चार दलघफू पाणी का देत नाहीत व आम्हाला आमच्या हक्काचे पाणी मिळावे म्हणून मागणी केली होती . शिवाय पाटबंधारे विभाग आपली फसवणूक करत असल्याचा आरोप करून मानूरकरांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ््यांच्या मनमानीला कारभाराची चौकशीची मागणी केली होती.यावेळी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाच केराची टोपली दाखविण्याचा प्रकार समोर आला होता. तहसीलदार अनिल पुरे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांना भेंडी येथे पाणी दिले गेले मग मानूर येथे पाणी का दिले जात नाही असा जाब विचारु न यंत्रणेला धारेवर धरले होते यावेळी सहाय्यक अभियंता करनाळे यांनी तो विभाग आपल्या अंतर्गत येत नसल्याचे सांगून मानूरसाठी ४ दशलक्षघनफूट पाणी आरिक्षत करण्यात आल्याचे बैठकीत सांगितले होते.मानूरसाठी गेल्या तीन वर्षांपासून प्रत्येक वेळी पाणी आरक्षित होते. मानूर ग्रामपंचायतीने पाणीपट्टी भरलेली असूनही मानूर गावाला पाणी मिळालेले नाही त्यामुळे पाटबंधारे विभागाने आपली फसवणूक केल्याचे ग्रामस्थांनी बैठकीत सांगितले होते, त्यामुळे पाटबंधारे विभागावरील विश्वास उडाल्याचे सांगून पाणी द्या अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली होती, मानूर येथील नागरिकांनी शासनाचा निषेध नोंदवत वेळ आली तर हक्काच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचे सांगून बैठकीतून काढता पाय घेतला होता व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशीची मागणी केली होती . (वार्ताहर)