शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मनपाला हवी रॉयल्टी, तर पाटबंधारे खात्याला औद्योगिक दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 00:49 IST

शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पाटबंधारे खात्याने महापालिकेशी तातडीने करार करावा यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आदेश देऊन शनिवारी (दि. ९) महिना पूर्ण होत आहे. परंतु तरीही पाटबंधारे खात्याने टाळाटाळ कायम ठेवली असून आठ वर्षांपासून न झालेला करार अद्यापही होऊ शकलेला नाही. जलसंपदामंत्र्यांच्या आदेशाला खो देण्याची पाटबंधारे खात्याच्या कृतीची मासिकपूर्ती होत असून, हा चर्चेचा विषय ठरला.

ठळक मुद्देवादंग : मंत्र्याच्या आश्वासनाला खो देण्याची मासिकपूर्ती

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पाटबंधारे खात्याने महापालिकेशी तातडीने करार करावा यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आदेश देऊन शनिवारी (दि. ९) महिना पूर्ण होत आहे. परंतु तरीही पाटबंधारे खात्याने टाळाटाळ कायम ठेवली असून आठ वर्षांपासून न झालेला करार अद्यापही होऊ शकलेला नाही. जलसंपदामंत्र्यांच्या आदेशाला खो देण्याची पाटबंधारे खात्याच्या कृतीची मासिकपूर्ती होत असून, हा चर्चेचा विषय ठरला.पाटबंधारे विभाग महापालिकेला पिण्यासाठी पाणी पुरवते परंतु अनेक उद्योग आणि व्यावसायिक शहराच्या हद्दीत असल्याने ते पाण्याचा वापर करतात म्हणून त्याचे वेगळे दर देण्याचा नवाच मुद्दा गेल्या काही वर्षांपासून जलसंपदा विभागाने शोधून काढला आहे आणि शहरातील एकूण जोडण्या किती, त्यातील व्यावसायिक किती औद्योगिक किती अशाप्रकारच्या जोडण्यांची विगतवारी करून माहिती मागितली जात आहे. महापालिका पिण्यासाठी पाणी मागवते आणि प्रत्यक्षात व्यावसायिकांकडून व्यावसायिक, तर काही उद्योगांकडून औद्योगिक दरही आकरते त्यामुळे पाटबंधारे खात्यालाही असे व्यावसायिक दराने ही प्रमाणात वसुली हवी असून, त्यासाठीच हा आटापिटा सुरू आहे, तर दुसरीकडे महापालिकेने शेतीसाठी सोडलेले प्रक्रियायुक्त पाणी हे रतन इंडियाला देऊन त्याची रॉयल्टी पाटबंधारे खाते घेत असल्याने महापालिकेनेदेखील त्यावर दावा सांगितला आहे. महापालिकेला उपसा केलेल्या पाण्यापैकी ६५ टक्के पाणी प्रक्रिया करून शेती क्षेत्रासाठी सोडणे बंधनकारक आहे. त्यानुसार महापालिका पाणी सोडते, परंतु हे पाणी शेतीसाठी न देता औष्णिक वीजनिर्मितीसाठी रतन इंडियाला देऊन रॉयल्टी जलसंपदा विभाग घेते आणि दुसरीकडे बाधित सिंचन क्षेत्रासाठी महापालिकेला भरपाईचा तगादा लावते, अशी पाटबंधारे खात्याची दुहेरी भूमिका असून, त्यावर महापालिकेने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे हा विषय प्रामुख्याने रखडला आहे.नाशिक शहराला गंगापूर तसेच दारणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, त्यासाठी महापालिका आणि पाटबंधारे खाते यांच्यात करार होणे आवश्यक असते. २०११ पासून महापालिकेने मात्र पाणीपुरवठा करण्यासाठी करार करावा म्हणून पाटबंधारे विभागाकडे तगादा लावला इतकेच नव्हे तर मुद्रांकावर मसुदा लिहून पाठविला तरीही त्याचा उपयोग झालेला नाही. महापालिकेने आधी किकवी धरण बांधायचे ठरवले होते. परंतु नंतर ते पाटबंधारे खात्यानेच बांधायचे ठरवले. त्यात साठणारे पाणी महापालिकेस पिण्यासाठी देण्यात येणार असले तरी त्यामुळे बाधित सिंचन क्षेत्रासाठी म्हणून महापालिकेकडे काही कोटी रुपयांची रक्कम देण्याची मागणी होत आहे ती न दिल्याने पाटबंधारे विभाग करार तर करीत नाहीच उलट करार केला नाही म्हणून विनाकरार पाणी पुरवठ्यापोटी दीड ते दोन पट दर आकारत आहे. महापलिका वाढीव दराऐवजी नियमित दरानेच देयक अदा करीत असली तरी पाटबंधारे विभाग हेका सोडण्यास तयार नाही.गेल्या महिन्यात ९ तारखेलाच पालकमंत्री गिरीश महाजन यांनी यासंदर्भात बैठक घेतली त्यावेळी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सर्व माहिती पालकमंत्र्यांना दिली. त्यावेळी पालकमंत्र्यांनी तातडीने करार करण्याचे आदेश पाटबंधारे खात्याला दिले आणि बाधित क्षेत्राच्या पुनवर्सनाचा खर्च कसा वसूल करायचा याबाबत असलेल्या दावे आणि प्रतिदाव्यांबाबत शासन वरिष्ठ स्तरावर निर्णय घेईल असे स्पष्ट केले होते.महापालिकेने या बैठकीनंतर दुसऱ्याच दिवशी पाटबंधारे खात्याला पत्र पाठवून पालकमंत्री तथा जलसंपदामंत्र्यांच्या आदेशानुसार करार करण्याची कार्यवाही करावी, असे पत्र देण्यात आले.त्यावर पाटबंधारे खात्याने अनेकदा मसुदा पाठवूनदेखील त्याबाबत महापालिकेकडे मागणी केल्यानंतर अधिकाºयांनी ती अगोदरच दिली असल्याचे स्पष्ट केले. तथापि, आता शनिवारी (दि. ८) जलसंपदामंत्र्यांनी आदेश देऊन महिना उलटला असला तरी अद्यापही त्यावर कार्यवाही करण्यास पाटबंधारे खाते टाळाटाळ करीत असल्याचे दिसत आहे.किकवी बांधलेच नाही तर खर्च कशासाठी?किकवी धरण हे केवळ पिण्याच्या पाण्यासाठी बांधण्याचा निर्णय २००८ मध्ये झाला आहे. या धरणामुळे सिंचन क्षेत्राचे पाणी कमी होणार असल्याने पाटबंधारे विभाग महापालिकेकडून पुनवर्सन खर्च मागत आहे. परंतु दहा वर्षे झाली तरी अद्याप धरणच बांधून झालेले नसून अशावेळी अशा खर्च देण्याचे दायित्व अद्याप तरी महापालिकेकडे नाही असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे म्हणणे आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMONEYपैसा