शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

मनमाडकरांना आता महिन्यातून अवघे दोनच दिवस पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 23:56 IST

मनमाड : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणातील पाणीसाठा संपुष्टात आल्याने सध्या बारा दिवसांआड होणारा पाणीपुरवठा आता चौदा ते पंधरा दिवसांआड करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने मनमाडकरांना महिन्यातून अवघे दोनच दिवस पाणीपुरवठा होणार आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. येत्या तीस जून रोजी पालखेडच्या पाण्याचे रोटेशन मिळाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देपाणीबाणी : वागदर्डी धरणातील पाणीसाठा संपुष्टात

मनमाड : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणातीलपाणीसाठा संपुष्टात आल्याने सध्या बारा दिवसांआड होणारा पाणीपुरवठा आता चौदा ते पंधरा दिवसांआड करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने मनमाडकरांना महिन्यातून अवघे दोनच दिवस पाणीपुरवठा होणार आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. येत्या तीस जून रोजी पालखेडच्या पाण्याचे रोटेशन मिळाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत होण्याची शक्यता आहे.गेल्या काही वर्षांपासून पाणीटंचाईमुळे मनमाडकर पुरते हैराण झाले आहेत. यावर्षी मनमाडसह परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने पाणीटंचाईच्या झळा जाणवल्या नाहीत. सध्या शहरात तापमानाने उच्चांकी पातळी गाठली असल्याने वागदर्डी धरणात उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याचे झपाट्याने बाष्पीभवन होत असल्याने त्याचाही काहीसा परिणाम पाणीटंचाईवर झाला आहे. येथील जलशुद्धीकरण केंद्रांना कमी ग्रॅव्हिटीने पाणीपुरवठा होत असल्याच्या अनुषंगाने पालिका प्रशासनामार्फत तरंग विद्युत मोटारींची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्याच्या उपलब्ध पाणीसाठ्याची परिस्थिती पाहता शहराला १२ दिवसांऐवजी चौदा ते पंधरा दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मनमाड शहरासाठी पालखेड डाव्या कालव्याचे आवर्तन येत्या ३० जून रोजी मिळणार असल्याने त्यानंतर पाणीपुरवठ्याच्या दिवसांत कपात होण्याची शक्यता आहे.आवर्तनाची प्रतीक्षापालिकेतर्फे शिवाजीनगर, शिवाजी चौक, कॉलेज भाग, चंदनवाडी, मुरलीधरनगर, कॅम्प भाग अशा सहा ठिकाणी असलेल्या जलकुंभातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. वीजपुरवठा खंडित तसेच तांत्रिक बिघाड झाल्यास पाणीपुरवठ्याच्या दिवसांमध्ये वाढ होत असते. या महिन्यात मिळणारे पाण्याचे आवर्तन वेळेवर मिळाल्यास उन्हाळा पार होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

टॅग्स :WaterपाणीDamधरण