शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
3
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
4
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
5
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
6
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
7
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
8
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
9
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
10
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
11
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
12
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
13
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
14
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
15
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
16
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
17
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
18
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
19
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
20
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

आंबा उत्पादक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:28 IST

गेल्या हंगामात चांगली थंडी व पिकांना पोषक असे वातावरण असल्यामुळे सर्वच पिके चांगली आली आहेत. थंडी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण होत आहे. या थंडीमुळे ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाने शेतीच्या बांधावर पडीत जागेवर आणि घरासमोर लावलेली आंब्याची झाडे हिरवीगार झाली असून, मोहराच्या फुलांनी बहरली असल्यामुळे शेतकरीवर्ग समाधानी झाला आहे.

ठळक मुद्देहवामानात सातत्याने बदल : मोहर गळतीने उत्पादन घटण्याचा अंदाज

वटार : गेल्या हंगामात चांगली थंडी व पिकांना पोषक असे वातावरण असल्यामुळे सर्वच पिके चांगली आली आहेत. थंडी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण होत आहे. या थंडीमुळे ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाने शेतीच्या बांधावर पडीत जागेवर आणि घरासमोर लावलेली आंब्याची झाडे हिरवीगार झाली असून, मोहराच्या फुलांनी बहरली असल्यामुळे शेतकरीवर्ग समाधानी झाला आहे.बागलाणच्या पश्चिम पट्ट्यात गावरान जातीची मोठ्या प्रमाणात आंब्याची झाडे आहेत. त्यात गोट्या, सेंद्र्या, काळ्या, ढवळ्या, दोडी आदी अशी आंब्याची नावे आहेत. तर काही शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीच्या नवीन केसरसारखी आंब्याच्या जाती लावल्या आहेत. थंडीमुळे आंब्याने मोठ्या प्रमाणावर आम्रमोहर बहरल्याचे चित्र दिसत आहे.आंब्यांना पिवळे-केशरी सोन्याच्या अलंकाराप्रमाणे आम्रमोहर बहरल्याने शेतकºयांना चांगल्या उत्पन्नाची आशा बळावली आहे. परिसरात आंबा मोहराच्या सुगंधाने भरून गेला आहे. प्रचंड मोहर आल्याने उच्चांकी पिकाची अपेक्षा आहे; मात्र त्यासाठी निसर्गाची साथ अपेक्षित असून, येत्या पंधरवड्यात थंडीने चंबूगबाळे आवरले तरच मोहराचे चांगले फळ चाखण्यास मिळेल.गेली चार वर्षं लहरी निसर्गाचा फटका बसल्यामुळे सर्वसामान्यांना आवाक्याबाहेर राहिलेला आंबा यंदा सर्वांचे तोंड मनसोक्तपणे गोड करण्याची चिन्हे आहेत. दिवसभर वारगी चालू असल्यामुळे मोहोर झटकला जात आहे. आंब्याला फुलोºयावर आलेला मोहर कुजून गेला असून, असा मोहर काळा पडत असल्याने आंब्याचा भार गळून पडला आहे, त्यामुळे आंबा उत्पादन घटण्याचा अंदाज शेतकºयांकडून व्यक्त केला जात आहे.वातावरणामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाववातावरणात अचानक बदल झाला असून, दिवसभर थंडगार वारे निर्माण झाल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ लागला आहे. सर्दी, पडसे, खोकला यांसारखे आजार उद्भवू लागले आहेत, त्यामुळे परिसरातील दवाखान्यांमध्येरुग्णांची गर्दी वाढल्याचे चित्र दिसत आहे.४गेल्या चार-पाच वर्षांपासून हवामानात सातत्याने बदल जाणवत असल्याने साहजिकच याचा परिणाम आंबा पिकावर होत आहे. कारण या ढगाळ वातावरणामुळे आंब्यावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने आंबा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी