शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
5
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
6
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
8
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
9
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
10
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
11
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
12
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
13
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
14
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
15
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
16
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
17
गोंधळ घालत मनसैनिकांची मुख्याध्यापिकेला मारहाण
18
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
19
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
20
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"

आंबा उत्पादक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:28 IST

गेल्या हंगामात चांगली थंडी व पिकांना पोषक असे वातावरण असल्यामुळे सर्वच पिके चांगली आली आहेत. थंडी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण होत आहे. या थंडीमुळे ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाने शेतीच्या बांधावर पडीत जागेवर आणि घरासमोर लावलेली आंब्याची झाडे हिरवीगार झाली असून, मोहराच्या फुलांनी बहरली असल्यामुळे शेतकरीवर्ग समाधानी झाला आहे.

ठळक मुद्देहवामानात सातत्याने बदल : मोहर गळतीने उत्पादन घटण्याचा अंदाज

वटार : गेल्या हंगामात चांगली थंडी व पिकांना पोषक असे वातावरण असल्यामुळे सर्वच पिके चांगली आली आहेत. थंडी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण होत आहे. या थंडीमुळे ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाने शेतीच्या बांधावर पडीत जागेवर आणि घरासमोर लावलेली आंब्याची झाडे हिरवीगार झाली असून, मोहराच्या फुलांनी बहरली असल्यामुळे शेतकरीवर्ग समाधानी झाला आहे.बागलाणच्या पश्चिम पट्ट्यात गावरान जातीची मोठ्या प्रमाणात आंब्याची झाडे आहेत. त्यात गोट्या, सेंद्र्या, काळ्या, ढवळ्या, दोडी आदी अशी आंब्याची नावे आहेत. तर काही शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीच्या नवीन केसरसारखी आंब्याच्या जाती लावल्या आहेत. थंडीमुळे आंब्याने मोठ्या प्रमाणावर आम्रमोहर बहरल्याचे चित्र दिसत आहे.आंब्यांना पिवळे-केशरी सोन्याच्या अलंकाराप्रमाणे आम्रमोहर बहरल्याने शेतकºयांना चांगल्या उत्पन्नाची आशा बळावली आहे. परिसरात आंबा मोहराच्या सुगंधाने भरून गेला आहे. प्रचंड मोहर आल्याने उच्चांकी पिकाची अपेक्षा आहे; मात्र त्यासाठी निसर्गाची साथ अपेक्षित असून, येत्या पंधरवड्यात थंडीने चंबूगबाळे आवरले तरच मोहराचे चांगले फळ चाखण्यास मिळेल.गेली चार वर्षं लहरी निसर्गाचा फटका बसल्यामुळे सर्वसामान्यांना आवाक्याबाहेर राहिलेला आंबा यंदा सर्वांचे तोंड मनसोक्तपणे गोड करण्याची चिन्हे आहेत. दिवसभर वारगी चालू असल्यामुळे मोहोर झटकला जात आहे. आंब्याला फुलोºयावर आलेला मोहर कुजून गेला असून, असा मोहर काळा पडत असल्याने आंब्याचा भार गळून पडला आहे, त्यामुळे आंबा उत्पादन घटण्याचा अंदाज शेतकºयांकडून व्यक्त केला जात आहे.वातावरणामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाववातावरणात अचानक बदल झाला असून, दिवसभर थंडगार वारे निर्माण झाल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ लागला आहे. सर्दी, पडसे, खोकला यांसारखे आजार उद्भवू लागले आहेत, त्यामुळे परिसरातील दवाखान्यांमध्येरुग्णांची गर्दी वाढल्याचे चित्र दिसत आहे.४गेल्या चार-पाच वर्षांपासून हवामानात सातत्याने बदल जाणवत असल्याने साहजिकच याचा परिणाम आंबा पिकावर होत आहे. कारण या ढगाळ वातावरणामुळे आंब्यावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने आंबा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी