शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

रस्ता दुरुस्तीकडे मनपाचा कानाडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 01:18 IST

वडाळागावातील सिद्ध हनुमान मंदिरापासून थेट श्री.श्री. रविशंकर मार्गाला गोपालवाडीमार्गे जोडणाऱ्या रस्त्याची मागील चार महिन्यांपासून दुरवस्था झाली आहे. वारंवार तक्रार करूनदेखील हा रस्ता महापालिकेच्या पूर्व विभागाकडून दुरुस्त केला जात नसल्याने नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

नाशिक : वडाळागावातील सिद्ध हनुमान मंदिरापासून थेट श्री.श्री. रविशंकर मार्गाला गोपालवाडीमार्गे जोडणाऱ्या रस्त्याची मागील चार महिन्यांपासून दुरवस्था झाली आहे. वारंवार तक्रार करूनदेखील हा रस्ता महापालिकेच्या पूर्व विभागाकडून दुरुस्त केला जात नसल्याने नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.गोपालवाडीमार्गे जाणारा हा रस्ता नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण या रस्त्यावरून महेबूबनगर, सादिकनगर, गरीब नवाज कॉलनी या भागांतील रहिवाशांना ये-जा करण्यासाठी हा मुख्य रस्ता आहे. चार महिन्यांपासून रस्त्याची दुरवस्था वाढीस लागली असून, नागरिकांना आपली ‘वाट’ बदलावी लागत आहे. भूमिगत गटारीचे काम पूर्णत्वास येऊन महिनाभराचा कालावधी लोटला आहे; मात्र रस्त्याची अवस्था अद्यापही ‘जैसे-थे’ असल्याने संताप व्यक्त होत आहे. या रस्त्याचे तातडीने खडीकरण-डांबरीकरण करण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे, अन्यथा नागरिक आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. वारंवार महापालिका प्रशासनाच्या पूर्व विभागातील संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनदेखील या रस्त्याची दुर्दशा थांबत नसून रस्ता दुरुस्त केला जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.या रस्त्याची अवस्था बिघडविण्यास महापालिका प्रशासन कारणीभूत आहे, कारण रस्ता भूमिगत गटारीसाठी खोदला गेला त्यानंतर त्याची दुरवस्था अधिक वाढीस लागली. तत्पूर्वी रस्त्यावरून ये-जा करणे सहज शक्य होते. सध्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून, सोमवारी सायंकाळी व रविवारी रात्री आलेल्या बेमोसमी पावसाने रस्त्याची दैनावस्था झाली आहे. महापालिका प्रशासनाकडून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यासंदर्भात विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे यांच्याकडेही तक्रार करण्यात आली आहे; मात्र त्याचाही काहीही उपयोग झालेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाroad safetyरस्ते सुरक्षा