शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
2
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
3
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
4
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
5
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
6
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
7
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
8
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
9
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
10
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
11
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
12
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
13
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
14
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
15
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
16
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
17
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
18
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
19
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
20
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
Daily Top 2Weekly Top 5

‘मनाचे श्लोक’ बनले आयुष्याची ‘बोधवचने’ भावकाव्य : प्रपंच, परमार्थ, तत्त्वज्ञानाच्या ग्रंथाचे नित्य श्रवण-पठण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 01:50 IST

नाशिक : ‘मना सज्जना भक्ति पंथेची जावे’ असो की, ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे’ असो, अगदी एका ओळीत संपूर्ण जीवनाचे सार मांडणारी या बोध वचनांची मोहिनी आबालवृद्धांना होताना दिसते.

ठळक मुद्देमराठी जनमानसाला उभारी देण्याचे कार्यजीवनातील नैराश्य दूर

नाशिक : ‘मना सज्जना भक्ति पंथेची जावे’ असो की, ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे’ असो, अगदी एका ओळीत संपूर्ण जीवनाचे सार मांडणारी या बोध वचनांची मोहिनी आबालवृद्धांना होताना दिसते. अगदी बालवर्गातील मुले समर्थ रामदासांची ही वचने मोठ्या आवडीने पाठांतर करत असतानाच ज्येष्ठ नागरिकदेखील आयुष्याच्या सायंकाळी मनाचे श्लोक वाचन करीत त्यात आपल्या आयुष्याचा आधार शोधतात तेव्हा या भावकाव्याची मराठी वाङ्मयातील मौलिकता आणि सर्वाेच्चता निदर्शनास येते. जीवनात प्रयत्नवाद म्हणजे कर्मवाद आणि सावधानतेची शिकवण देणारे मनाचे श्लोक सुमारे ४५० वर्षांपासून मराठी जनमानसाला उभारी देण्याचे कार्य करीत आहेत. समर्थ रामदासांचे संतत्व जसे अलौकिक आहे तसेच त्यांचे काव्यदेखील उच्चकोटीचे आहे. दासबोध, मनोबोध तथा मनाचे श्लोक, स्फुटकाव्य, अभंग, करुणाष्टके, रामायण, सोळा लघुकाव्य, एकवीस समासी (जुना दासबोध), आत्माराम अशी विपूल ग्रंथरचना समर्थ रामदासांनी केली, परंतु त्यांच्या एकूण प्रकाशित आणि अप्रकाशित वाङ््मयापैकी सर्वाधिक लोकप्रियता दासबोध आणि मनोबोध म्हणजे मनाचे श्लोक या ग्रंथांना लाभली, असे मत संत साहित्याचे संशोधक व अभ्यासक प्रा. डॉ. रमेश आवरगावकर यांनी व्यक्त केले, तर श्री सूर्यस्थान समर्थ विद्यारोग्य केंद्राचे अध्यक्ष व स्वामी समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक सुभाष खर्डेकर म्हणाले की, सदगुरू समर्थ रामदास स्वामींनी ग्रंथराज दासबोधामध्ये आद्य सनातन वैदिक हिंदू धर्म सांगितला असून, ‘पिंडी ते ब्रह्मांडी’ असे त्यातील तत्त्वज्ञान आहे, तर मनाचे श्लोकसारख्या बोधवचनाच्या वाचन-श्रवणाने आपल्याला जीवनातील नैराश्य दूर जाऊन एकप्रकारे नव्याने जगण्याची उभारी मिळते, असेही त्यांनी स्पष्ट केले. साहजिकच आजच्या अत्याधुनिक युगातही रामदास स्वामींची ही बोधवचने म्हणजे मनाच्या श्लोकांचे पाठांतर श्रद्धेने, निष्ठेने, नित्य श्रवण पठण करणारी मंडळी आमच्या कष्टाच्या आणि दु:खाच्या क्षणी आम्हाला मनाचे श्लोकच तारतात, असे ज्येष्ठ नागरिक रामभाऊ पगार आणि काशीनाथ महाजन सांगतात, तेव्हा त्याची प्रचिती येते.