शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

एक तपानंतर माळवाडी धरण ओव्हर फ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 15:43 IST

सिन्नर: तालुक्यातील पूर्व भागासाठी वरदान ठरणारे ५५ दलघफू क्षमतेचे माळवाडी धरण तब्बल बारा वर्षांनी पूर्ण भरुन ओव्हर फ्लो झाल्याने परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे.

सिन्नर: तालुक्यातील पूर्व भागासाठी वरदान ठरणारे ५५ दलघफू क्षमतेचे माळवाडी धरण तब्बल बारा वर्षांनी पूर्ण भरुन ओव्हर फ्लो झाल्याने परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे. घोटेवाडी, माळवाडी या दोन गावच्या पाणी योजनांबरोबरच शेती सिंचनासाठीही या जलसाठ्याचा मोठ्या प्रमाणात अप्रत्यक्षरीत्या लाभ होणार आहे.२००६ साली झालेल्या जोरदार पावसाने माळवाडीचे धरण ओव्हरफ्लो झाले होते. त्यानंतर मात्र सातत्याने या भागात पर्जन्यमान घटल्याने धरणात मृतसाठाही होत नसे. गेल्यावर्षी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात जोरदार पाऊस झाल्याने भोजापूरच्या पूर पाण्याने हे धरण निम्मे भरले होते. अत्यल्प पावसामुळे या भागातील नागरिकांना पावसाळ्यातही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. यंदा मात्र प्रारंभीपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे १ सप्टेंबर रोजी धरण ओवर फ्लो झाले. तब्बल १२ वर्षानंतर या भागात पाणी- पाणी झाल्याने माळवाडी, निर्हाळे, मर्हळ, घोटेवाडी, वावी, वल्हेवाडी आदी गावांच्या परिसरात धरणाच्या पाण्याचा पाझर पोहोचला असून तेथील जलस्रोतांना बळकटी आली आहे. दरम्यान गेल्या वर्षभरात समृद्धी महामार्गासाठी या धरणातून मोठ्या प्रमाणात माती, मुरूम काढण्यात आल्याने धरणाची साठवण क्षमता कमालीची वाढली आहे. त्यामुळे किमान पुढचे दोन वर्ष माळवाडी परिसरात पाणीटंचाई जाणवणार नसल्याचे येथील जाणकार शेतकर्यांनी सांगितले. दरम्यान, धरणाच्या सांडव्याची दुरवस्था झाली असून लोकप्रतिनिधींनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन त्याची तातडीने दुरुस्ती करून गळती थांबवावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक