शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

एक तपानंतर माळवाडी धरण ओव्हर फ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 15:43 IST

सिन्नर: तालुक्यातील पूर्व भागासाठी वरदान ठरणारे ५५ दलघफू क्षमतेचे माळवाडी धरण तब्बल बारा वर्षांनी पूर्ण भरुन ओव्हर फ्लो झाल्याने परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे.

सिन्नर: तालुक्यातील पूर्व भागासाठी वरदान ठरणारे ५५ दलघफू क्षमतेचे माळवाडी धरण तब्बल बारा वर्षांनी पूर्ण भरुन ओव्हर फ्लो झाल्याने परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे. घोटेवाडी, माळवाडी या दोन गावच्या पाणी योजनांबरोबरच शेती सिंचनासाठीही या जलसाठ्याचा मोठ्या प्रमाणात अप्रत्यक्षरीत्या लाभ होणार आहे.२००६ साली झालेल्या जोरदार पावसाने माळवाडीचे धरण ओव्हरफ्लो झाले होते. त्यानंतर मात्र सातत्याने या भागात पर्जन्यमान घटल्याने धरणात मृतसाठाही होत नसे. गेल्यावर्षी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात जोरदार पाऊस झाल्याने भोजापूरच्या पूर पाण्याने हे धरण निम्मे भरले होते. अत्यल्प पावसामुळे या भागातील नागरिकांना पावसाळ्यातही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. यंदा मात्र प्रारंभीपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे १ सप्टेंबर रोजी धरण ओवर फ्लो झाले. तब्बल १२ वर्षानंतर या भागात पाणी- पाणी झाल्याने माळवाडी, निर्हाळे, मर्हळ, घोटेवाडी, वावी, वल्हेवाडी आदी गावांच्या परिसरात धरणाच्या पाण्याचा पाझर पोहोचला असून तेथील जलस्रोतांना बळकटी आली आहे. दरम्यान गेल्या वर्षभरात समृद्धी महामार्गासाठी या धरणातून मोठ्या प्रमाणात माती, मुरूम काढण्यात आल्याने धरणाची साठवण क्षमता कमालीची वाढली आहे. त्यामुळे किमान पुढचे दोन वर्ष माळवाडी परिसरात पाणीटंचाई जाणवणार नसल्याचे येथील जाणकार शेतकर्यांनी सांगितले. दरम्यान, धरणाच्या सांडव्याची दुरवस्था झाली असून लोकप्रतिनिधींनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन त्याची तातडीने दुरुस्ती करून गळती थांबवावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक