शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी एका वर्षांचेच नॉन क्रीमी लेअर

By admin | Updated: July 20, 2014 01:44 IST

मालेगावी एका वर्षांचेच नॉन क्रीमी लेअर

 

प्रवीण साळुंके

मालेगावयेथील प्रांत कार्यालयातर्फे सर्वांना शैक्षणिक कामासाठी एक वर्षाचे नॉन क्रीमी लेअर दाखला देण्यात येत आहे. शासनाने सहा लाख उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींसाठी तीन वर्षांचे नॉन क्रीमी लेअर दाखला देण्याचे आदेश असतानाही प्रांत कार्यालयामार्फत दरवर्षी नवीन दाखला काढण्याची सक्ती करण्यात येत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. हा अध्यादेश निघून एक वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला असतानाही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अनागोंदीमुळे सामान्यांना दरवर्षी हा दाखला काढावा लागत आहे.दरवर्षी शैक्षणिक वर्ष सुरू झाले की विद्यार्थ्यांना शिक्षणसंस्थांकडून शिक्षणासाठी विविध दाखल्यांची मागणी केली जात असते. त्यात राष्ट्रीयत्व, नॉन क्रीमी लेअर, वय अधिवास, जात आदि दाखल्यांचा समावेश आहे. हे दाखले देण्याचे अधिकार प्रांत किंवा तहसीलदारांना आहेत. त्यातील नॉन क्रीमी लेअर हा दाखला देण्याचा अधिकार प्रांत अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.राज्यात या दाखल्याच्या कालावधीत एकवाक्यता नसल्याने शासनाने २४ जून २०१३ला अध्यादेश काढला. यात सलग तीन वर्षे पालकांचे उत्पन्न सहा लाख रुपयांच्या आत असलेल्या पाल्यांना तीन वर्षाचे नॉन क्रीमी लेअर दाखले देण्यात यावेत, असा आदेश दिला. या अध्यादेशाला एक वर्ष झाले तरीही येथील प्रांत कार्यालयात एकाच वर्षाचा नॉन क्रीमी लेअर दाखला देण्यात येतो. याविषयी माहिती घेतली असता यात जिल्हाधिकारी कार्यालयाने तीन वर्ष नॉन क्रीमी लेअरचा नमुना सादर केला नसल्याने सामान्यांना दरवर्षी नवीन नॉन क्रीमी लेअर काढावा लागत आहे. शासन जनसामान्यांसाठी योजना आणते. मात्र त्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे त्याचा फायदा होत नाही.गेल्या वर्षभरापासून जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे जिल्ह्यात इंटरनेटद्वारे दाखले देण्यात येतात. यासाठी सर्व प्रांत कार्यालयांना एक सॉफ्टवेअर पुरविण्यात आले आहे. मात्र हे सॉफ्टवेअर पुरविताना जिल्हाधिकारी कार्यालयाने तीन वर्ष कालावधीचे सॉफ्टवेअर न पुरविल्याने वर्षभरात सामान्य नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान तर झालेच; परंतु त्यांना आपला वेळ खर्ची कारावा लागला. यात त्यांची काहीही चूक नाही हे विशेष.या नुकसानीला कोण जबाबदार? या नुकसानीची भरपाई कशी होणार, असे प्रश्न विचारले जात आहेत. या सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषीविरुद्ध कारवाई करून तीन वर्षाचा दाखला देण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.