शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शासनाच्या लेखी मालेगाव जिल्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 01:56 IST

गेल्या तीन दशकांपासून जिल्ह्याचे विभाजन करून नव्याने मालेगाव जिल्ह्याची निर्मिती करण्याची मागणी होतानाच, शासनाच्या महसूल व वनविभागाने अलीकडेच तहसीलदार म्हणून पदोन्नती दिलेल्या महसूल अधिकाऱ्यांची रिक्तपदांवर नेमणूक करताना चक्क मालेगाव जिल्ह्याची निर्मिती करून त्याठिकाणी मालेगाव शहर क्षेत्रात संजय गांधी निराधार योजनेसाठी तहसीलदारांची नियुक्ती करून टाकली आहे.

ठळक मुद्देतहसीलदारांची नेमणूक : यंत्रणा बुचकळ्यात

नाशिक : गेल्या तीन दशकांपासून जिल्ह्याचे विभाजन करून नव्याने मालेगाव जिल्ह्याची निर्मिती करण्याची मागणी होतानाच, शासनाच्या महसूल व वनविभागाने अलीकडेच तहसीलदार म्हणून पदोन्नती दिलेल्या महसूल अधिकाऱ्यांची रिक्तपदांवर नेमणूक करताना चक्क मालेगाव जिल्ह्याची निर्मिती करून त्याठिकाणी मालेगाव शहर क्षेत्रात संजय गांधी निराधार योजनेसाठी तहसीलदारांची नियुक्ती करून टाकली आहे. शासनाच्याच अधिकृत आदेशावर तशी नोंद करण्यात आल्यामुळे नियुक्ती केलेल्या अधिकाºयाला मालेगाव जिल्ह्यात नेमणूक कशी द्यावी? असा प्रश्न जिल्हा प्रशासनाला पडला आहे.मालेगाव स्वतंत्र जिल्हा करण्यात यावा ही गेल्या अनेक वर्षांची मागणी असून, या मागणीच्या प्रश्नावर राजकीय निवडणुका लढविल्या जाऊन भावनिक राजकारणही खेळण्यात आले. कॉँग्रेस सरकारच्या काळात या मागणीने जोर धरल्यानंतर युती सरकारच्या काळात मालेगाव जिल्ह्याची निर्मिती केली जाईल, असे जाहीर करण्यात आले. मालेगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी त्यासाठी पाठपुरावा केल्यानंतर मालेगाव जिल्ह्णाच्या निर्मितीची व्यवहार्यता तसेच सामील होणाºया तालुक्यांचे मत अजमावणी करण्यात आली व तसा प्रस्ताव शासन दरबारी काही वर्षांपासून पडून आहे. विधीमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनाच्या दरम्यान मालेगावकरांच्या अपेक्षा उंचावल्या असतात. बहुधा त्याचाच विचार करून अधिवेशनाच्या काही दिवस अगोदरच दहा नायब तहसीलदारांना तहसीलदारपदी पदोन्नती देण्यात आली व त्यातील मिलिंद शाळीग्राम कुलथे यांना मालेगाव नगरपालिका क्षेत्रासाठी संजय गांधी योजना तहसीलदार म्हणून नियुक्ती देताना जिल्हा मालेगाव म्हणून आदेश काढले आहेत. विशेष म्हणजे मालेगाव येथे महापालिका असून, शासनाच्या दप्तरी अजूनही नगरपालिकाच दर्शविण्यात येत आहे. कुलथे यांच्या नियुक्तीचे आदेश हाती पडल्यानंतर मालेगाव जिल्ह्णाची निर्मिती कधी व कशी झाली? असा प्रश्न महसूल अधिकाºयांना पडला आहे.

टॅग्स :NashikनाशिकMalegaonमालेगांवGovernmentसरकार