शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

मालेगावी ऐन सणासुदीत ‘अंधार’

By admin | Updated: September 30, 2014 21:49 IST

नागरीक संतप्त : दिवसभरात आठ तास विज पुरवठा खंडीत

मालेगाव कॅम्प : शहर व परिसरात ऐन सणासुदीच्या कालावधीत भारनियमन सुरू असल्याने शहरवासीयांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दिवसभरात सात ते आठ तास वीजपुरवठा खंडित होत आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात कामकाज ठप्प झाले आहे. किमान दसरा-दिवाळीत तरी वीज भारनियमन रद्द करावे, अशी मागणी होत आहे.शहरात गेल्या तीन-चार महिन्यांपासून वीजपुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे. अखंडित वीजपुरवठा मिळवण्यासाठी शहरातील जनतेसह राजकीय पुढाऱ्यांनी जंग पछाडले होते. यात सर्वप्रथम शहरातील संपूर्ण भारनियमन रद्द करा, सुधारित भारनियमन करा, शहरात एकाच वेळेस सर्वत्र भारनियमन करा, यंत्रमागासाठी एक्स्प्रेस वाहिनी करून वीजपुरवठा द्या अशा विविध मागण्या लोकप्रतिनिधींनी केल्या होत्या. तसेच रमजान ईद, गणपती उत्सव, नवरात्री, दसरा आदि सणांमध्ये भारनियमन पूर्ण बंद करण्यात यावे, अशीदेखील मागणी केली होती; परंतु त्या सर्व मागण्यांना सध्या वीज कंपनीने वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. रमजान, गणपती उत्सव कालावधीत काही काळ अखंडित वीजपुरवठा सुरू होता; परंतु सध्या नवरात्रीचा कालावधी सुरू आहे. यात वीज कंपनीने पहिल्या माळेपासून भारनियमन सुरू केले आहे. पहाटे चार व दुपारी चार तास अशा दोन सत्रात बिनबोभाट भारनियमन सुरू आहे. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने भारनियमन समस्येकडे आंदोलकांचेही दुर्लक्ष झाले आहे.सणासुदीच्या काळात भारनियमन होणार नाही असे वीज कंपनीने आश्वासन दिले असले तरी भारनियमन कडेकोटपणे सुरू झाले. त्यामुळे नवरात्री व इतर महत्त्वाच्या कामांवर विरजन पडले आहे. सायंकाळ व रात्री ९ वाजेपर्यंत शहरात अंधाराचे साम्राज्य आहे. त्यामुळे सणांच्या आनंदावर शहरवासीयांचा हिरमोड होत आहे. या भारनियमनाच्या समस्यावर आचारसंहिताच्या बडगा विसरून लोकप्रतिनिधींनी वीज कंपनीशी भारनियमन रद्द करण्याबाबत चर्चा करून भारनियमन रद्द करण्याची मागणी करावी, अशा भावना शहरवासीयांमध्ये व्यक्त होत आहे. (वार्ताहर)