शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
2
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
3
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
4
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
5
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
6
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
7
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
8
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
9
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
10
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
11
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
12
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
13
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
14
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
15
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
16
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
17
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
18
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
19
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
20
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं

मालेगावचा व्यापारी बांग्लादेशात बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 14:56 IST

नाशिक जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांमधील कार्यरत व्यापा-यांनी शेतक-यांचे सुमारे २९ कोटी रूपये थकविले असून, त्या संदर्भातील तक्रारींची दखल घेत जिल्हा उपनिबंधकांनी या बाजार समित्यांना संचालक मंडळ बरखास्त करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे बाजार समित्यांच्या संचालकांचे धाबेदणाणले

ठळक मुद्देमालेगावच्या व्यापाऱ्याची मालमत्ता लिलाव करणारशेतक-यांची रक्कम थकली : व्यापारी बांग्लादेशला बेपत्ता

नाशिक : दोन महिन्यात शेतक-यांकडून सुमारे साडेतीन कोटी रूपयांच्या कांद्याची खरेदी करून बांग्लादेशात पैसे घेण्यासाठी गेलेला मालेगाव तालुक्यातील मुंगसे येथील व्यापारी शिवाजी सुर्यवंशी हे गेल्या काही महिन्यांपासून बेपत्ता झाल्याने मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने संबंधित व्यापारी व जामीनदार प्रल्हाद अग्रवाल या दोघांच्याही मालमत्तेचा लिलाव करून शेतक-यांचे पैसे अदा करण्याची अनुमती मिळविण्यासाठी बाजार समितीने जिल्हाधिका-यांना साकडे घातले आहे.नाशिक जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांमधील कार्यरत व्यापा-यांनी शेतक-यांचे सुमारे २९ कोटी रूपये थकविले असून, त्या संदर्भातील तक्रारींची दखल घेत जिल्हा उपनिबंधकांनी या बाजार समित्यांना संचालक मंडळ बरखास्त करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे बाजार समित्यांच्या संचालकांचे धाबेदणाणले असून, काही बाजार समित्यांनी यापुढे फक्त रोखीनेच व्यवहार करण्याची सक्ती व्यापा-यांना केली आहे. मालेगाव तालुक्यातील शिवाजी सुर्यवंशी यांनी डिसेंबर २०१७ व जानेवारी २०१८ या काळात तालुक्यातील शेतक-यांकडून मोठ्या प्रमाणावर कांदा खरेदी केला. सुमारे साडेतीन कोटी रूपये शेतक-यांना देणे असताना सुर्यवंशी यांनी बांगलादेशातील व्यापा-याला सदरचा कांदा पाठविला. परंतु तेथून पैसे मिळत नसल्याने ते पैसे घेण्यासाठी बांगलादेशला गेले असून, अद्यापही तेथून परत आलेले नसल्याचे व त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नसल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे म्हणणे आहे. शेतक-यांना चार महिन्यांपासून पैसे न मिळाल्यामुळे बाजार समितीने अडत्याकडून एक कोटी रूपये वसुल करून शेतक-यांना वाटप केले. परंतु तरिही अन्य शेतक-यांना पैसे मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करण्याची भिती बाजार समितीला वाटू लागली आहे. त्यामुळे सुर्यवंशी यांनी बाजार समितीकडून परवाना घेत असताना त्यांच्या मालकिची मुंगसे शिवारातील शेतजमीन तारण म्हणून ठेवलेली आहे. तर त्यांचे जामीनदार उमराण्याचे प्रल्हाद ताराचंद अग्रवाल यांनी आडत्याची आर्थिक जबाबदारी स्विकारली असल्याने त्यांच्या उमराणे येथील बंगला तारण ठेवला आहे. या दोन्ही मालमत्तांवर बाजार समितीचे नावे लावण्यासाठी बाजार समितीने संबंधित तहसिलदारांशी पत्रव्यवहार केला आहे. परंतु निव्वळ मालमत्तेवर बोजा चढवून शेतक-यांची रक्कम वसुल होणार नसल्याचे पाहून बाजार समितीने शिवाजी सुर्यवंशी व जामीनदार प्रल्हाद अग्रवाल या दोघांच्या मालमत्ता लिलाव करून मिळावी अशी मागणी जिल्हाधिका-यांकडे केली आहे. बाजार समितीचे सभापती सुनील देवरे व सचिवांनी या संदर्भात दोन दिवसांपुर्वी जिल्हाधिकाºयांची भेट घेतली.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक