शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

मालेगावचा व्यापारी बांग्लादेशात बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 14:56 IST

नाशिक जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांमधील कार्यरत व्यापा-यांनी शेतक-यांचे सुमारे २९ कोटी रूपये थकविले असून, त्या संदर्भातील तक्रारींची दखल घेत जिल्हा उपनिबंधकांनी या बाजार समित्यांना संचालक मंडळ बरखास्त करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे बाजार समित्यांच्या संचालकांचे धाबेदणाणले

ठळक मुद्देमालेगावच्या व्यापाऱ्याची मालमत्ता लिलाव करणारशेतक-यांची रक्कम थकली : व्यापारी बांग्लादेशला बेपत्ता

नाशिक : दोन महिन्यात शेतक-यांकडून सुमारे साडेतीन कोटी रूपयांच्या कांद्याची खरेदी करून बांग्लादेशात पैसे घेण्यासाठी गेलेला मालेगाव तालुक्यातील मुंगसे येथील व्यापारी शिवाजी सुर्यवंशी हे गेल्या काही महिन्यांपासून बेपत्ता झाल्याने मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने संबंधित व्यापारी व जामीनदार प्रल्हाद अग्रवाल या दोघांच्याही मालमत्तेचा लिलाव करून शेतक-यांचे पैसे अदा करण्याची अनुमती मिळविण्यासाठी बाजार समितीने जिल्हाधिका-यांना साकडे घातले आहे.नाशिक जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांमधील कार्यरत व्यापा-यांनी शेतक-यांचे सुमारे २९ कोटी रूपये थकविले असून, त्या संदर्भातील तक्रारींची दखल घेत जिल्हा उपनिबंधकांनी या बाजार समित्यांना संचालक मंडळ बरखास्त करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे बाजार समित्यांच्या संचालकांचे धाबेदणाणले असून, काही बाजार समित्यांनी यापुढे फक्त रोखीनेच व्यवहार करण्याची सक्ती व्यापा-यांना केली आहे. मालेगाव तालुक्यातील शिवाजी सुर्यवंशी यांनी डिसेंबर २०१७ व जानेवारी २०१८ या काळात तालुक्यातील शेतक-यांकडून मोठ्या प्रमाणावर कांदा खरेदी केला. सुमारे साडेतीन कोटी रूपये शेतक-यांना देणे असताना सुर्यवंशी यांनी बांगलादेशातील व्यापा-याला सदरचा कांदा पाठविला. परंतु तेथून पैसे मिळत नसल्याने ते पैसे घेण्यासाठी बांगलादेशला गेले असून, अद्यापही तेथून परत आलेले नसल्याचे व त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नसल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे म्हणणे आहे. शेतक-यांना चार महिन्यांपासून पैसे न मिळाल्यामुळे बाजार समितीने अडत्याकडून एक कोटी रूपये वसुल करून शेतक-यांना वाटप केले. परंतु तरिही अन्य शेतक-यांना पैसे मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करण्याची भिती बाजार समितीला वाटू लागली आहे. त्यामुळे सुर्यवंशी यांनी बाजार समितीकडून परवाना घेत असताना त्यांच्या मालकिची मुंगसे शिवारातील शेतजमीन तारण म्हणून ठेवलेली आहे. तर त्यांचे जामीनदार उमराण्याचे प्रल्हाद ताराचंद अग्रवाल यांनी आडत्याची आर्थिक जबाबदारी स्विकारली असल्याने त्यांच्या उमराणे येथील बंगला तारण ठेवला आहे. या दोन्ही मालमत्तांवर बाजार समितीचे नावे लावण्यासाठी बाजार समितीने संबंधित तहसिलदारांशी पत्रव्यवहार केला आहे. परंतु निव्वळ मालमत्तेवर बोजा चढवून शेतक-यांची रक्कम वसुल होणार नसल्याचे पाहून बाजार समितीने शिवाजी सुर्यवंशी व जामीनदार प्रल्हाद अग्रवाल या दोघांच्या मालमत्ता लिलाव करून मिळावी अशी मागणी जिल्हाधिका-यांकडे केली आहे. बाजार समितीचे सभापती सुनील देवरे व सचिवांनी या संदर्भात दोन दिवसांपुर्वी जिल्हाधिकाºयांची भेट घेतली.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक