शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

हजारो मजुरांचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 23:23 IST

नाशिक : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गेल्या महिनाभरापासून निवारा केंद्रात थांबलेल्या नाशिक जिल्ह्यातील सुमारे दोन हजार नागरिकांना आपल्या मूळ गावी परतणे शक्य होणार आहे.

नाशिक : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गेल्या महिनाभरापासून निवारा केंद्रात थांबलेल्या नाशिक जिल्ह्यातील सुमारे दोन हजार नागरिकांना आपल्या मूळ गावी परतणे शक्य होणार आहे. आपल्या कुटुंबीयांपासून दूर असलेल्या या नागरिकांना लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे येथे थांबावे लागले असले तरी ते अत्यंत अगतिक झाले होते. मात्र आता त्यांची सुटका होण्याची चिन्हे दिसत आहेत. विशेषत: नाशिक शहरासह अनेक निवारा केंद्रांमध्ये अडकलेल्या नागरिकांचा आता संयम सुटत चालल्याने त्यांनी संघर्षाची भाषा सुरू केली होती. मात्र, ३ मेपर्यंत निर्णय न झाल्यास वेगळे चित्र निर्माण होऊ शकते. अशा वेळी शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे अनेक स्थलांतरित कामगारांना दिलासा मिळणार आहे.गेल्या महिन्यात देशभरात लॉकडाउन घोषित झाल्यानंतर रोजगार आणि मजुरीसाठी अडकलेल्या लाखो नागरिकांचे हाल झाले. दळणवळणाची सर्व साधने बंद असताना मिळेल त्या वाहनाने आणि प्रसंगी पायपीट करीत नागरिक आपल्या राज्याकडे आणि गावाकडे जात असल्याने शासनाने कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी त्यांना आहे त्याचठिकाणी थांबण्याचे आणि त्यांची तात्पुरती सोय करण्याचे आदेश दिल्याने जिल्ह्यात महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने निवारा केंद्र उभारले होते. नाशिक शहरातील सुमारे पंधरा शाळांमध्ये अशाप्रकारे निवारा केंद्रे उभारण्यात आली असून, त्याठिकाणी सातशे कामगार आहेत. तर जिल्हाभरात एकूण २७ केंद्रे असून, ३ हजार १२६ व्यक्तींची निवासाची व्यवस्था असली तरी तूर्तास १ हजार ९०१ स्थलांतरित वास्तव्यास आहेत. यात महाराष्टÑात अन्य राज्यांतील ५०१ नागरिक आहेत. उर्वरित सर्व जण देशाच्या विविध राज्यांतील आहेत.सध्या निवारा केंद्रात मूलभूत सुविधा आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यापूर्वी १४ तारखेला लॉकडाउनचा पहिला टप्पा संपेल तेव्हा सुटका होईल, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, लॉकडाउन ३ मेपर्यंत वाढल्याने सर्वच स्थलांतरित अस्वस्थ आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक