शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

टोमॅटो निर्यातीसाठी भारताच्या सीमा कायमस्वरूपी खुल्या करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 18:05 IST

लासलगांव : सध्या भारत-पाकिस्तान सीमा बंद असल्याने पुरेशा निर्यातीअभावी स्थानिक बाजारपेठेत टोमॅटोला उठाव नाही. त्यामुळे टोमॅटो दरातील सततची घसरण थांबविणेसाठी भारताच्या सीमा टोमॅटोसह इतर नाशवंत शेतीमाल वाहतुकीसाठी कायमस्वरूपी खुल्या ठेवाव्या अशी मागणी लासलगांव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी केंद्रीय मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

ठळक मुद्देजयदत्त होळकर : लासलगांव बाजार समितीतर्फे केंद्रीय मंत्र्यांना निवेदन

लासलगांव : सध्या भारत-पाकिस्तान सीमा बंद असल्याने पुरेशा निर्यातीअभावी स्थानिक बाजारपेठेत टोमॅटोला उठाव नाही. त्यामुळे टोमॅटो दरातील सततची घसरण थांबविणेसाठी भारताच्या सीमा टोमॅटोसह इतर नाशवंत शेतीमाल वाहतुकीसाठी कायमस्वरूपी खुल्या ठेवाव्या अशी मागणी लासलगांव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी केंद्रीय मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभु, परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज, कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्री राधा मोहन सिंह यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील नाशिक, पुणे, सांगली, सातारा, अहमदनगर, नागपुर इ. जिल्हे टोमॅटो उत्पादनात अग्रेसर आहे. चालु वर्षी चांगला पाऊस आणि पोषक हवामान यामुळे राज्यातील बहुतांश भागात टोमॅटोची मोठ्या प्रमाणावर लागवड झाल्याने सध्या लासलगांवसह नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्ये टोमॅटोच्या आवकेत वाढ झाली आहे.बाजार समितीच्या लासलगाव मुख्य बाजार आवारावर दररोज साधारणत: ९ ते १० हजार टोमॅटो क्रेटस्ची आवक होत असुन सदरचा टोमॅटो कमीत कमी रू. ५०, जास्तीत जास्त रू. १४१ व सर्वसाधारण रू. ११५ प्रती २० किलो क्रेटस् प्रमाणे विक्र ी होत आहे. लवकरच टोमॅटो आवकेत वाढ होणार असुन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय टोमॅटो पाठविणेस सीमाबंदीची अडचण असल्याने मागणी व पुरवठ्यातील असमतोलामुळे दिवसेंदिवस टोमॅटोचे दरात घसरण होत आहे. टोमॅटो हा शेतीमाल नाशवंत असल्याने त्याची काढणीनंतर तात्काळ विक्र ी, प्रतवारी व पॅकींग करून तो देशांतर्गत व परदेशी बाजारपेठेत पाठविणे गरजेचे आहे. त्यामुळे लासलगांवसह नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमधील खरेदीदार त्यांचा टोमॅटो पंजाब, राजस्थान, गुजरात, दिल्ली, उत्तरप्रदेश, हरीयाणासह देशातील इतर राज्यात ट्रकद्वारे पाठवितात तर निर्यातक्षम टोमॅटो पाकिस्तान, बांग्लादेश, ओमान, दुबई, मलेशिया, कतार इ. देशात निर्यात करतात. पाकिस्तान हा भारतीय टोमॅटोचा सर्वात मोठा आयातदार देश असल्याने दरवर्षी टोमॅटो हंगामात १५ आॅगष्ट, बकरी ईद, मोहरम इ. सणांमुळे तसेच दोन्ही देशातील नेहमीच्या तणावाचे वातावरणामुळे भारत-पाकिस्तानची सीमा बंद रहात असल्याने एैन हंगामात टोमॅटोची निर्यात होत नाही. त्यामुळे दरवर्षी येथील टोमॅटो उत्पादकांना नाईलाजास्तव आपला टोमॅटो मिळेल त्या भावात विक्र ी करावा लागतो. पाकिस्तान पाठोपाठ बांग्लादेश, दुबई, मलेशिया, कतार इ. देश भारतीय टोमॅटोचे प्रमुख आयातदार देश आहे. मात्र दरवर्षी या ना त्या कारणास्तव भारतीय सीमा बंद रहात असल्याने टोमॅटो शेतीमालाला त्याचा फटका सहन करावा लागतो. भारतीय टोमॅटोची चव व प्रत चांगली असुनही केवळ इराणमधुन स्वस्त टोमॅटो मिळत असल्याने दुबईमध्ये इराणच्या टोमॅटोला दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. उच्चप्रतीचे व निर्यातक्षम टोमॅटो बियाणे, वेगवेगळी रासायनिक खते व किटकनाशके, टोमॅटो लागवडीपासुन टोमॅटो विक्रीपर्यंत लागणारी मजुरी इ. चा खर्च विचारात घेता दरवर्षी येथील टोमॅटो उत्पादकांना उत्पादन खर्चापेक्षाही कमी दरात टोमॅटोची विक्र ी करावी लागते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपल्या शेतीमालाची इतर देशांच्या शेतीमालाशी स्पर्धा करतांना प्रसंगी येथील शेतकऱ्यांना बँका, वित्तीय संस्थांकडुन कर्ज घेऊन शेतीच्या मशागतीसाठी निधी उपलब्ध करावा लागतो. परंतु शासनाच्या ध्येय धोरणांमुळे अनेक वेळा येथील शेतकºयांना उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे येथील खरेदीदारांना त्यांचा टोमॅटो हा शेतीमाल परदेशी बाजारपेठेत पाठविणेसाठी पाकिस्तान, बांग्लादेश, मलेशिया, दुबई, ओमान, कतार इ. देशांच्या तसेच भारतातील सर्व राज्यांच्या सीमा फक्त शेतीमाल वाहतुकीसाठी कायमस्वरूपी खुल्या ठेवणेबाबत तसेच टोमॅटो वाहतुकीवरील खर्च कमी होणेकामी कमी करणे करणेबाबत आपले स्तरावरून प्रयत्न व्हावा अशी मागणी होळकर यांनी निवेदनात केली आहे.उच्च प्रतीचे वेगवेगळे बियाणे आणि नवनविन तंत्रज्ञान यामुळे टोमॅटोची उत्पादन क्षमता वाढली असुन यंदा टोमॅटोचे मोठ्या प्रमाणावर पीक आले आहे. मात्र दरवर्षी १५ आॅगस्ट, बकरी ईद व मोहरमचे सणादरम्यान पाकिस्तान बॉर्डर हमखास बंद होते. केंद्र शासनाने याबाबतीत तातडीने लक्ष घालून भारतातील टोमॅटो उत्पादकांना न्याय द्यावा.- संदीप दरेकर, उपसभापती, लासलगांव बाजार समिती.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड