शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

टोमॅटो निर्यातीसाठी भारताच्या सीमा कायमस्वरूपी खुल्या करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 18:05 IST

लासलगांव : सध्या भारत-पाकिस्तान सीमा बंद असल्याने पुरेशा निर्यातीअभावी स्थानिक बाजारपेठेत टोमॅटोला उठाव नाही. त्यामुळे टोमॅटो दरातील सततची घसरण थांबविणेसाठी भारताच्या सीमा टोमॅटोसह इतर नाशवंत शेतीमाल वाहतुकीसाठी कायमस्वरूपी खुल्या ठेवाव्या अशी मागणी लासलगांव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी केंद्रीय मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

ठळक मुद्देजयदत्त होळकर : लासलगांव बाजार समितीतर्फे केंद्रीय मंत्र्यांना निवेदन

लासलगांव : सध्या भारत-पाकिस्तान सीमा बंद असल्याने पुरेशा निर्यातीअभावी स्थानिक बाजारपेठेत टोमॅटोला उठाव नाही. त्यामुळे टोमॅटो दरातील सततची घसरण थांबविणेसाठी भारताच्या सीमा टोमॅटोसह इतर नाशवंत शेतीमाल वाहतुकीसाठी कायमस्वरूपी खुल्या ठेवाव्या अशी मागणी लासलगांव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी केंद्रीय मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभु, परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज, कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्री राधा मोहन सिंह यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील नाशिक, पुणे, सांगली, सातारा, अहमदनगर, नागपुर इ. जिल्हे टोमॅटो उत्पादनात अग्रेसर आहे. चालु वर्षी चांगला पाऊस आणि पोषक हवामान यामुळे राज्यातील बहुतांश भागात टोमॅटोची मोठ्या प्रमाणावर लागवड झाल्याने सध्या लासलगांवसह नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्ये टोमॅटोच्या आवकेत वाढ झाली आहे.बाजार समितीच्या लासलगाव मुख्य बाजार आवारावर दररोज साधारणत: ९ ते १० हजार टोमॅटो क्रेटस्ची आवक होत असुन सदरचा टोमॅटो कमीत कमी रू. ५०, जास्तीत जास्त रू. १४१ व सर्वसाधारण रू. ११५ प्रती २० किलो क्रेटस् प्रमाणे विक्र ी होत आहे. लवकरच टोमॅटो आवकेत वाढ होणार असुन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय टोमॅटो पाठविणेस सीमाबंदीची अडचण असल्याने मागणी व पुरवठ्यातील असमतोलामुळे दिवसेंदिवस टोमॅटोचे दरात घसरण होत आहे. टोमॅटो हा शेतीमाल नाशवंत असल्याने त्याची काढणीनंतर तात्काळ विक्र ी, प्रतवारी व पॅकींग करून तो देशांतर्गत व परदेशी बाजारपेठेत पाठविणे गरजेचे आहे. त्यामुळे लासलगांवसह नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमधील खरेदीदार त्यांचा टोमॅटो पंजाब, राजस्थान, गुजरात, दिल्ली, उत्तरप्रदेश, हरीयाणासह देशातील इतर राज्यात ट्रकद्वारे पाठवितात तर निर्यातक्षम टोमॅटो पाकिस्तान, बांग्लादेश, ओमान, दुबई, मलेशिया, कतार इ. देशात निर्यात करतात. पाकिस्तान हा भारतीय टोमॅटोचा सर्वात मोठा आयातदार देश असल्याने दरवर्षी टोमॅटो हंगामात १५ आॅगष्ट, बकरी ईद, मोहरम इ. सणांमुळे तसेच दोन्ही देशातील नेहमीच्या तणावाचे वातावरणामुळे भारत-पाकिस्तानची सीमा बंद रहात असल्याने एैन हंगामात टोमॅटोची निर्यात होत नाही. त्यामुळे दरवर्षी येथील टोमॅटो उत्पादकांना नाईलाजास्तव आपला टोमॅटो मिळेल त्या भावात विक्र ी करावा लागतो. पाकिस्तान पाठोपाठ बांग्लादेश, दुबई, मलेशिया, कतार इ. देश भारतीय टोमॅटोचे प्रमुख आयातदार देश आहे. मात्र दरवर्षी या ना त्या कारणास्तव भारतीय सीमा बंद रहात असल्याने टोमॅटो शेतीमालाला त्याचा फटका सहन करावा लागतो. भारतीय टोमॅटोची चव व प्रत चांगली असुनही केवळ इराणमधुन स्वस्त टोमॅटो मिळत असल्याने दुबईमध्ये इराणच्या टोमॅटोला दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. उच्चप्रतीचे व निर्यातक्षम टोमॅटो बियाणे, वेगवेगळी रासायनिक खते व किटकनाशके, टोमॅटो लागवडीपासुन टोमॅटो विक्रीपर्यंत लागणारी मजुरी इ. चा खर्च विचारात घेता दरवर्षी येथील टोमॅटो उत्पादकांना उत्पादन खर्चापेक्षाही कमी दरात टोमॅटोची विक्र ी करावी लागते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपल्या शेतीमालाची इतर देशांच्या शेतीमालाशी स्पर्धा करतांना प्रसंगी येथील शेतकऱ्यांना बँका, वित्तीय संस्थांकडुन कर्ज घेऊन शेतीच्या मशागतीसाठी निधी उपलब्ध करावा लागतो. परंतु शासनाच्या ध्येय धोरणांमुळे अनेक वेळा येथील शेतकºयांना उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे येथील खरेदीदारांना त्यांचा टोमॅटो हा शेतीमाल परदेशी बाजारपेठेत पाठविणेसाठी पाकिस्तान, बांग्लादेश, मलेशिया, दुबई, ओमान, कतार इ. देशांच्या तसेच भारतातील सर्व राज्यांच्या सीमा फक्त शेतीमाल वाहतुकीसाठी कायमस्वरूपी खुल्या ठेवणेबाबत तसेच टोमॅटो वाहतुकीवरील खर्च कमी होणेकामी कमी करणे करणेबाबत आपले स्तरावरून प्रयत्न व्हावा अशी मागणी होळकर यांनी निवेदनात केली आहे.उच्च प्रतीचे वेगवेगळे बियाणे आणि नवनविन तंत्रज्ञान यामुळे टोमॅटोची उत्पादन क्षमता वाढली असुन यंदा टोमॅटोचे मोठ्या प्रमाणावर पीक आले आहे. मात्र दरवर्षी १५ आॅगस्ट, बकरी ईद व मोहरमचे सणादरम्यान पाकिस्तान बॉर्डर हमखास बंद होते. केंद्र शासनाने याबाबतीत तातडीने लक्ष घालून भारतातील टोमॅटो उत्पादकांना न्याय द्यावा.- संदीप दरेकर, उपसभापती, लासलगांव बाजार समिती.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड