शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
3
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
4
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
5
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
6
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
7
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
8
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
9
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
10
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
11
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
12
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
13
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
14
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
15
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
16
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
17
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
18
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
19
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
20
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...

टोमॅटो निर्यातीसाठी भारताच्या सीमा कायमस्वरूपी खुल्या करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 18:05 IST

लासलगांव : सध्या भारत-पाकिस्तान सीमा बंद असल्याने पुरेशा निर्यातीअभावी स्थानिक बाजारपेठेत टोमॅटोला उठाव नाही. त्यामुळे टोमॅटो दरातील सततची घसरण थांबविणेसाठी भारताच्या सीमा टोमॅटोसह इतर नाशवंत शेतीमाल वाहतुकीसाठी कायमस्वरूपी खुल्या ठेवाव्या अशी मागणी लासलगांव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी केंद्रीय मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

ठळक मुद्देजयदत्त होळकर : लासलगांव बाजार समितीतर्फे केंद्रीय मंत्र्यांना निवेदन

लासलगांव : सध्या भारत-पाकिस्तान सीमा बंद असल्याने पुरेशा निर्यातीअभावी स्थानिक बाजारपेठेत टोमॅटोला उठाव नाही. त्यामुळे टोमॅटो दरातील सततची घसरण थांबविणेसाठी भारताच्या सीमा टोमॅटोसह इतर नाशवंत शेतीमाल वाहतुकीसाठी कायमस्वरूपी खुल्या ठेवाव्या अशी मागणी लासलगांव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी केंद्रीय मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभु, परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज, कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्री राधा मोहन सिंह यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील नाशिक, पुणे, सांगली, सातारा, अहमदनगर, नागपुर इ. जिल्हे टोमॅटो उत्पादनात अग्रेसर आहे. चालु वर्षी चांगला पाऊस आणि पोषक हवामान यामुळे राज्यातील बहुतांश भागात टोमॅटोची मोठ्या प्रमाणावर लागवड झाल्याने सध्या लासलगांवसह नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्ये टोमॅटोच्या आवकेत वाढ झाली आहे.बाजार समितीच्या लासलगाव मुख्य बाजार आवारावर दररोज साधारणत: ९ ते १० हजार टोमॅटो क्रेटस्ची आवक होत असुन सदरचा टोमॅटो कमीत कमी रू. ५०, जास्तीत जास्त रू. १४१ व सर्वसाधारण रू. ११५ प्रती २० किलो क्रेटस् प्रमाणे विक्र ी होत आहे. लवकरच टोमॅटो आवकेत वाढ होणार असुन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय टोमॅटो पाठविणेस सीमाबंदीची अडचण असल्याने मागणी व पुरवठ्यातील असमतोलामुळे दिवसेंदिवस टोमॅटोचे दरात घसरण होत आहे. टोमॅटो हा शेतीमाल नाशवंत असल्याने त्याची काढणीनंतर तात्काळ विक्र ी, प्रतवारी व पॅकींग करून तो देशांतर्गत व परदेशी बाजारपेठेत पाठविणे गरजेचे आहे. त्यामुळे लासलगांवसह नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमधील खरेदीदार त्यांचा टोमॅटो पंजाब, राजस्थान, गुजरात, दिल्ली, उत्तरप्रदेश, हरीयाणासह देशातील इतर राज्यात ट्रकद्वारे पाठवितात तर निर्यातक्षम टोमॅटो पाकिस्तान, बांग्लादेश, ओमान, दुबई, मलेशिया, कतार इ. देशात निर्यात करतात. पाकिस्तान हा भारतीय टोमॅटोचा सर्वात मोठा आयातदार देश असल्याने दरवर्षी टोमॅटो हंगामात १५ आॅगष्ट, बकरी ईद, मोहरम इ. सणांमुळे तसेच दोन्ही देशातील नेहमीच्या तणावाचे वातावरणामुळे भारत-पाकिस्तानची सीमा बंद रहात असल्याने एैन हंगामात टोमॅटोची निर्यात होत नाही. त्यामुळे दरवर्षी येथील टोमॅटो उत्पादकांना नाईलाजास्तव आपला टोमॅटो मिळेल त्या भावात विक्र ी करावा लागतो. पाकिस्तान पाठोपाठ बांग्लादेश, दुबई, मलेशिया, कतार इ. देश भारतीय टोमॅटोचे प्रमुख आयातदार देश आहे. मात्र दरवर्षी या ना त्या कारणास्तव भारतीय सीमा बंद रहात असल्याने टोमॅटो शेतीमालाला त्याचा फटका सहन करावा लागतो. भारतीय टोमॅटोची चव व प्रत चांगली असुनही केवळ इराणमधुन स्वस्त टोमॅटो मिळत असल्याने दुबईमध्ये इराणच्या टोमॅटोला दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. उच्चप्रतीचे व निर्यातक्षम टोमॅटो बियाणे, वेगवेगळी रासायनिक खते व किटकनाशके, टोमॅटो लागवडीपासुन टोमॅटो विक्रीपर्यंत लागणारी मजुरी इ. चा खर्च विचारात घेता दरवर्षी येथील टोमॅटो उत्पादकांना उत्पादन खर्चापेक्षाही कमी दरात टोमॅटोची विक्र ी करावी लागते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपल्या शेतीमालाची इतर देशांच्या शेतीमालाशी स्पर्धा करतांना प्रसंगी येथील शेतकऱ्यांना बँका, वित्तीय संस्थांकडुन कर्ज घेऊन शेतीच्या मशागतीसाठी निधी उपलब्ध करावा लागतो. परंतु शासनाच्या ध्येय धोरणांमुळे अनेक वेळा येथील शेतकºयांना उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे येथील खरेदीदारांना त्यांचा टोमॅटो हा शेतीमाल परदेशी बाजारपेठेत पाठविणेसाठी पाकिस्तान, बांग्लादेश, मलेशिया, दुबई, ओमान, कतार इ. देशांच्या तसेच भारतातील सर्व राज्यांच्या सीमा फक्त शेतीमाल वाहतुकीसाठी कायमस्वरूपी खुल्या ठेवणेबाबत तसेच टोमॅटो वाहतुकीवरील खर्च कमी होणेकामी कमी करणे करणेबाबत आपले स्तरावरून प्रयत्न व्हावा अशी मागणी होळकर यांनी निवेदनात केली आहे.उच्च प्रतीचे वेगवेगळे बियाणे आणि नवनविन तंत्रज्ञान यामुळे टोमॅटोची उत्पादन क्षमता वाढली असुन यंदा टोमॅटोचे मोठ्या प्रमाणावर पीक आले आहे. मात्र दरवर्षी १५ आॅगस्ट, बकरी ईद व मोहरमचे सणादरम्यान पाकिस्तान बॉर्डर हमखास बंद होते. केंद्र शासनाने याबाबतीत तातडीने लक्ष घालून भारतातील टोमॅटो उत्पादकांना न्याय द्यावा.- संदीप दरेकर, उपसभापती, लासलगांव बाजार समिती.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड