शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

मका, सोयाबीन पेरणीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 18:34 IST

येवला तालुक्यातील मानोरी, खडकीमाळ परिसरात बुधवारी दुसº्यांदा मुसळधार पाऊस झाला असता दोन्ही पावसाचे पाणी शेतात न मुरता वाहून गेल्याने थोड्याफार ओली झालेल्या जमिनीत शेतकº्यांनी काही ठिकाणी धीम्या गतीने खरीप हंगामातील मका आणि सोयाबीन पिकाच्या लागवडीसाठी सुरु वात केली आहे.

ठळक मुद्देपेरण्या झाल्या; पुढील भवितव्य पावसाच्या हाती

मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी, खडकीमाळ परिसरात बुधवारी दुसº्यांदा मुसळधार पाऊस झाला असता दोन्ही पावसाचे पाणी शेतात न मुरता वाहून गेल्याने थोड्याफार ओली झालेल्या जमिनीत शेतकº्यांनी काही ठिकाणी धीम्या गतीने खरीप हंगामातील मका आणि सोयाबीन पिकाच्या लागवडीसाठी सुरु वात केली आहे.काही शेतकरी अद्यापही जमिनीत पुरेशी ओल झाल्याशिवाय पेरण्या करणार नसल्याचे बोलले जात आहे.तर काही ठिकाणी रविवारी मका टाकण्यासाठी शेतात गेले असता शेतकरी वर्ग पुरेशी जमिनीत ओल नसल्याने माघारी फिरल्याचे दिसून आले होते.सुमारे वर्षभरापासून शेतकरी आणि मजूर वर्गाच्या हाताला काम मिळत नव्हते आता पाऊस वेळेवर पडता झाल्याने शेती कामांना सुरु वात झाली आहे.शनिवारी दुपारी तीन ते चार तास पावसाची चांगल्या प्रकारे रिपरिप सुरू असताना या पावसात शेतकरी वर्गाने मका पेरणी करण्यासाठी धावपळ केली होती. शनिवारी दुपारी तीन वाजेनंतर उघडीप दिलेल्या पावसाने रविवारी देखील दांडी मारल्याने मका , सोयाबीन पेरणी केलेल्या शेतकरी वर्गात पुन्हा धास्ती उभी राहिली असून, मोरांची संख्या देखील मानोरी परिसरात मोठ्या प्रमाणात असल्याने शेतात टाकलेली मका मोर खात असल्याने दुसरी चिंता शेतकरी वर्गाला पडली आहे.गत वर्षी पेरण्या झाल्यानंतर पावसाने पूर्ण पणे ओढ दिल्याने मका आणि सोयाबीन ची पिके पाण्याविना करपून गेली असल्याने झालेला खर्च देखील फेडता न आल्याने परिणामी दुष्काळाला सामोरे जाण्याची वेळ शेतकरी वर्गावर ओढावली होती.यंदा उशिरा का होईना पाऊस पडता झाल्याने शेतकर्या मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मान्सून पूर्व पावसाने खरीप हंगामातील पिकांना वेळेवर मशागत करणे शेतकरी वर्गाला सोपे झाले होते.पारंपरिक पद्धतीने यंदाही शेतकरी बैल जोडीच्या पेरणीला प्रामुख्याने प्राधान्य देत आहे. पाऊस जास्त झाला असला तर ओल मात्र कमी असल्याने शेतीची जास्त तुडवातुडव होऊ नये यासाठी बैल जोडी चा वापर शेतकरी करत आहेत. ज्या शेतकऱ्यांना घरची औत आहे अशा शेतकऱ्यांनी बैल, ट्रॅक्टरद्वारे सºया घेऊन मका, बाजरी, सोयाबीन पेरणीला सुरु वात केली. तर काही शेतकºयांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतात मका टाकण्यासाठी सरी पाडण्यासाठी गेले असता बळी जमिनीत घातला असता तर पूर्ण कोरडी माती वर येत असल्याने मानोरीत काही शेतकर्यांनी पेरणी करण्याचे टाळले असल्याचे दिसून आले असून ज्या शेतकर्यांनी पेरण्या केल्या त्यांना आता दमदार आणि भिज पावसाची आवश्यक आहे.विहिरींना पावसाचा अद्याप फायदा नाहीखडकीमाळ येथे सुमारे महिना भरापासून सुरू असलेला पिण्याच्या पाण्यासाठीच्या टँकर ला मुदतवाढ देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ३० जून नंतर टँकर बंद होणार असल्याचे बोलले जात असून, ग्रामीण भागात अद्याप विहिरींना पाणी उतरेल इतका मुसळधार पाऊस झालेला नाही आणि खडकीमाळ येथील बहुतांश शेतकरी कुटुंबही शेतशिवारात राहत असल्याने सध्या पडलेल्या दोन पावसाचे पाणी जमिनीत न मुरता वाहून गेले असून, विहिरींना या पावसाचा अद्याप तरी फायदा होणार नसल्याचे खडकीमाळ येथील ग्रामस्थांनी सांगितले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती