शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

मका, सोयाबीन पेरणीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 18:34 IST

येवला तालुक्यातील मानोरी, खडकीमाळ परिसरात बुधवारी दुसº्यांदा मुसळधार पाऊस झाला असता दोन्ही पावसाचे पाणी शेतात न मुरता वाहून गेल्याने थोड्याफार ओली झालेल्या जमिनीत शेतकº्यांनी काही ठिकाणी धीम्या गतीने खरीप हंगामातील मका आणि सोयाबीन पिकाच्या लागवडीसाठी सुरु वात केली आहे.

ठळक मुद्देपेरण्या झाल्या; पुढील भवितव्य पावसाच्या हाती

मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी, खडकीमाळ परिसरात बुधवारी दुसº्यांदा मुसळधार पाऊस झाला असता दोन्ही पावसाचे पाणी शेतात न मुरता वाहून गेल्याने थोड्याफार ओली झालेल्या जमिनीत शेतकº्यांनी काही ठिकाणी धीम्या गतीने खरीप हंगामातील मका आणि सोयाबीन पिकाच्या लागवडीसाठी सुरु वात केली आहे.काही शेतकरी अद्यापही जमिनीत पुरेशी ओल झाल्याशिवाय पेरण्या करणार नसल्याचे बोलले जात आहे.तर काही ठिकाणी रविवारी मका टाकण्यासाठी शेतात गेले असता शेतकरी वर्ग पुरेशी जमिनीत ओल नसल्याने माघारी फिरल्याचे दिसून आले होते.सुमारे वर्षभरापासून शेतकरी आणि मजूर वर्गाच्या हाताला काम मिळत नव्हते आता पाऊस वेळेवर पडता झाल्याने शेती कामांना सुरु वात झाली आहे.शनिवारी दुपारी तीन ते चार तास पावसाची चांगल्या प्रकारे रिपरिप सुरू असताना या पावसात शेतकरी वर्गाने मका पेरणी करण्यासाठी धावपळ केली होती. शनिवारी दुपारी तीन वाजेनंतर उघडीप दिलेल्या पावसाने रविवारी देखील दांडी मारल्याने मका , सोयाबीन पेरणी केलेल्या शेतकरी वर्गात पुन्हा धास्ती उभी राहिली असून, मोरांची संख्या देखील मानोरी परिसरात मोठ्या प्रमाणात असल्याने शेतात टाकलेली मका मोर खात असल्याने दुसरी चिंता शेतकरी वर्गाला पडली आहे.गत वर्षी पेरण्या झाल्यानंतर पावसाने पूर्ण पणे ओढ दिल्याने मका आणि सोयाबीन ची पिके पाण्याविना करपून गेली असल्याने झालेला खर्च देखील फेडता न आल्याने परिणामी दुष्काळाला सामोरे जाण्याची वेळ शेतकरी वर्गावर ओढावली होती.यंदा उशिरा का होईना पाऊस पडता झाल्याने शेतकर्या मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मान्सून पूर्व पावसाने खरीप हंगामातील पिकांना वेळेवर मशागत करणे शेतकरी वर्गाला सोपे झाले होते.पारंपरिक पद्धतीने यंदाही शेतकरी बैल जोडीच्या पेरणीला प्रामुख्याने प्राधान्य देत आहे. पाऊस जास्त झाला असला तर ओल मात्र कमी असल्याने शेतीची जास्त तुडवातुडव होऊ नये यासाठी बैल जोडी चा वापर शेतकरी करत आहेत. ज्या शेतकऱ्यांना घरची औत आहे अशा शेतकऱ्यांनी बैल, ट्रॅक्टरद्वारे सºया घेऊन मका, बाजरी, सोयाबीन पेरणीला सुरु वात केली. तर काही शेतकºयांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतात मका टाकण्यासाठी सरी पाडण्यासाठी गेले असता बळी जमिनीत घातला असता तर पूर्ण कोरडी माती वर येत असल्याने मानोरीत काही शेतकर्यांनी पेरणी करण्याचे टाळले असल्याचे दिसून आले असून ज्या शेतकर्यांनी पेरण्या केल्या त्यांना आता दमदार आणि भिज पावसाची आवश्यक आहे.विहिरींना पावसाचा अद्याप फायदा नाहीखडकीमाळ येथे सुमारे महिना भरापासून सुरू असलेला पिण्याच्या पाण्यासाठीच्या टँकर ला मुदतवाढ देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ३० जून नंतर टँकर बंद होणार असल्याचे बोलले जात असून, ग्रामीण भागात अद्याप विहिरींना पाणी उतरेल इतका मुसळधार पाऊस झालेला नाही आणि खडकीमाळ येथील बहुतांश शेतकरी कुटुंबही शेतशिवारात राहत असल्याने सध्या पडलेल्या दोन पावसाचे पाणी जमिनीत न मुरता वाहून गेले असून, विहिरींना या पावसाचा अद्याप तरी फायदा होणार नसल्याचे खडकीमाळ येथील ग्रामस्थांनी सांगितले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती