शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

मका, सोयाबीन पेरणीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 18:34 IST

येवला तालुक्यातील मानोरी, खडकीमाळ परिसरात बुधवारी दुसº्यांदा मुसळधार पाऊस झाला असता दोन्ही पावसाचे पाणी शेतात न मुरता वाहून गेल्याने थोड्याफार ओली झालेल्या जमिनीत शेतकº्यांनी काही ठिकाणी धीम्या गतीने खरीप हंगामातील मका आणि सोयाबीन पिकाच्या लागवडीसाठी सुरु वात केली आहे.

ठळक मुद्देपेरण्या झाल्या; पुढील भवितव्य पावसाच्या हाती

मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी, खडकीमाळ परिसरात बुधवारी दुसº्यांदा मुसळधार पाऊस झाला असता दोन्ही पावसाचे पाणी शेतात न मुरता वाहून गेल्याने थोड्याफार ओली झालेल्या जमिनीत शेतकº्यांनी काही ठिकाणी धीम्या गतीने खरीप हंगामातील मका आणि सोयाबीन पिकाच्या लागवडीसाठी सुरु वात केली आहे.काही शेतकरी अद्यापही जमिनीत पुरेशी ओल झाल्याशिवाय पेरण्या करणार नसल्याचे बोलले जात आहे.तर काही ठिकाणी रविवारी मका टाकण्यासाठी शेतात गेले असता शेतकरी वर्ग पुरेशी जमिनीत ओल नसल्याने माघारी फिरल्याचे दिसून आले होते.सुमारे वर्षभरापासून शेतकरी आणि मजूर वर्गाच्या हाताला काम मिळत नव्हते आता पाऊस वेळेवर पडता झाल्याने शेती कामांना सुरु वात झाली आहे.शनिवारी दुपारी तीन ते चार तास पावसाची चांगल्या प्रकारे रिपरिप सुरू असताना या पावसात शेतकरी वर्गाने मका पेरणी करण्यासाठी धावपळ केली होती. शनिवारी दुपारी तीन वाजेनंतर उघडीप दिलेल्या पावसाने रविवारी देखील दांडी मारल्याने मका , सोयाबीन पेरणी केलेल्या शेतकरी वर्गात पुन्हा धास्ती उभी राहिली असून, मोरांची संख्या देखील मानोरी परिसरात मोठ्या प्रमाणात असल्याने शेतात टाकलेली मका मोर खात असल्याने दुसरी चिंता शेतकरी वर्गाला पडली आहे.गत वर्षी पेरण्या झाल्यानंतर पावसाने पूर्ण पणे ओढ दिल्याने मका आणि सोयाबीन ची पिके पाण्याविना करपून गेली असल्याने झालेला खर्च देखील फेडता न आल्याने परिणामी दुष्काळाला सामोरे जाण्याची वेळ शेतकरी वर्गावर ओढावली होती.यंदा उशिरा का होईना पाऊस पडता झाल्याने शेतकर्या मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मान्सून पूर्व पावसाने खरीप हंगामातील पिकांना वेळेवर मशागत करणे शेतकरी वर्गाला सोपे झाले होते.पारंपरिक पद्धतीने यंदाही शेतकरी बैल जोडीच्या पेरणीला प्रामुख्याने प्राधान्य देत आहे. पाऊस जास्त झाला असला तर ओल मात्र कमी असल्याने शेतीची जास्त तुडवातुडव होऊ नये यासाठी बैल जोडी चा वापर शेतकरी करत आहेत. ज्या शेतकऱ्यांना घरची औत आहे अशा शेतकऱ्यांनी बैल, ट्रॅक्टरद्वारे सºया घेऊन मका, बाजरी, सोयाबीन पेरणीला सुरु वात केली. तर काही शेतकºयांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतात मका टाकण्यासाठी सरी पाडण्यासाठी गेले असता बळी जमिनीत घातला असता तर पूर्ण कोरडी माती वर येत असल्याने मानोरीत काही शेतकर्यांनी पेरणी करण्याचे टाळले असल्याचे दिसून आले असून ज्या शेतकर्यांनी पेरण्या केल्या त्यांना आता दमदार आणि भिज पावसाची आवश्यक आहे.विहिरींना पावसाचा अद्याप फायदा नाहीखडकीमाळ येथे सुमारे महिना भरापासून सुरू असलेला पिण्याच्या पाण्यासाठीच्या टँकर ला मुदतवाढ देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ३० जून नंतर टँकर बंद होणार असल्याचे बोलले जात असून, ग्रामीण भागात अद्याप विहिरींना पाणी उतरेल इतका मुसळधार पाऊस झालेला नाही आणि खडकीमाळ येथील बहुतांश शेतकरी कुटुंबही शेतशिवारात राहत असल्याने सध्या पडलेल्या दोन पावसाचे पाणी जमिनीत न मुरता वाहून गेले असून, विहिरींना या पावसाचा अद्याप तरी फायदा होणार नसल्याचे खडकीमाळ येथील ग्रामस्थांनी सांगितले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती