शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

मका पिकाला आता मररोगाचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 15:10 IST

उमराणे : चालु वर्षी मका पिकावर लष्करी अळींनी घातलेल्या थैमानानंतर अथक प्रयत्नांतुन वाचिवलेल्या मका पिकाला आता मररोगाचे ग्रहण लागल्याने मका पिकापासुन काही अंशी मिळणार्या उत्पादनाचीही आशा धुसर झाली आहे.

उमराणे : चालु वर्षी मका पिकावर लष्करी अळींनी घातलेल्या थैमानानंतर अथक प्रयत्नांतुन वाचिवलेल्या मका पिकाला आता मररोगाचे ग्रहण लागल्याने मका पिकापासुन काही अंशी मिळणार्या उत्पादनाचीही आशा धुसर झाली आहे. त्यामुळे पिकापासुन मिळणारे उत्पन्न तर दुरच परंतु उद्भवलेल्या मररोगामुळे चाराही निकामी झाल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. पेरणीनंतर अवघ्या पंधरा दिवसांपासूनच लष्करी अळींनी प्रथम पोंग्यात व त्यानंतर मका पिकाला लागलेल्या कणसात शिरकाव केल्यानंतर पिक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी महागड्या औषधांची फवारणी करु न काहीअंशी पिक वाचविले.शिवाय गेल्या पंधरा दिवसांपासून उत्तर नक्षत्राचा पाऊस सुरु झाल्याने लष्करी अंळीचा प्रादुर्भाव कमी झाला असतानाच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार तोच पिकाला मररोगाचे ग्रहण लागले आहे. मररोगामुळे हिरव्या पिकाच्या मुळ्या नष्ट होऊन झाडे कोमजु लागली आहेत. परिणामी कणसांचे दाणे परिपक्व होण्याआधीच मररोग आल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येणार असल्याने शेतकरी बेचैन झाला आहे. तर दुसरीकडे या रोगामुळे चाराही कुजुन निकामी होऊ लागल्याने आगामी काळात जनावरांना चारा टंचाईच्या भितीने दुहेरी संकटात सापडला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक