शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

जिल्ह्यात मक्याचे पीक धोक्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 01:28 IST

पावसाचे अगोदरच झालेले उशिरा आगमन व त्यातच लष्करी अळीने घातलेला घाला पाहता, खरिपात शेतकऱ्यांना हमखास दोन पैसे मिळवून देणारे मक्याचे पीक धोक्यात आले असून, खुद्द कृषी खात्यानेच शेतकऱ्यांना यापुढे मक्याचे पीक न घेण्याचे व घेतलेल्या पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झालेला असेल तर पीक नष्ट करण्याचे आवाहन केले आहे.

ठळक मुद्देबाजरीचे क्षेत्र वाढणार : खरिपाची ४२ टक्के पेरणी

नाशिक : पावसाचे अगोदरच झालेले उशिरा आगमन व त्यातच लष्करी अळीने घातलेला घाला पाहता, खरिपात शेतकऱ्यांना हमखास दोन पैसे मिळवून देणारे मक्याचे पीक धोक्यात आले असून, खुद्द कृषी खात्यानेच शेतकऱ्यांना यापुढे मक्याचे पीक न घेण्याचे व घेतलेल्या पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झालेला असेल तर पीक नष्ट करण्याचे आवाहन केले आहे. जुलै महिन्याच्या दुसºया आठवड्यापर्यंत खरिपाच्या ४२ टक्के पेरण्या झाल्या असून, यापुढे मक्याचे पीक घेणे व्यावहारिकदृष्ट्या परवडणारे नसल्यामुळे नजीकच्या काळात जिल्ह्यात बाजरीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.यंदा दमदार पावसाचे आगमन थेट जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच झाले असून, त्यामुळे शेतकºयांनी पेरण्यांना सुरुवात केली आहे. तथापि, ज्या शेतकºयांकडे पाणी उपलब्ध होते त्यांनी जून महिन्यात मक्याची पेरणी केली तथापि, उष्णतेचे प्रमाण कायम राहिल्याने या मक्यावर मोठ्या प्रमाणात लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला. त्यात प्रामुख्याने अळ्यांकडून मक्याची पाने खरबडून खाण्यास सुरुवात झाली असून, कणसांमध्ये शिरून दाण्यांवर प्रभाव टाकू लागल्याने पिकाला धोका निर्माण झाला आहे. शेतकºयांना लष्करी अळीमुळे क्षेत्रावर दुसरे पीक घ्यावे किंवा नाही याची काळजी वाटू लागली आहे. मालेगाव, नांदगाव, सटाणा, देवळा, कळवण या भागात मोठ्या प्रमाणात मक्याचे पीक घेतले जाते; परंतु अजूनही पाहिजे त्या प्रमाणात या तालुक्यांमध्ये पाऊस झालेला नाही. त्यामुळे मक्याची पेरणी पाहिजे तितकी होऊ शकली नाही. पाऊस अजून लांबला तर यापुढे मक्याचे पीक घेणे शेतकºयांना व्यावहारिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे शेतकरी बाजरी, ज्वारीकडे वळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.मक्याचे क्षेत्र घटण्याची शक्यताजाणकारांच्या मते यापुढे शेतकरी मक्याची फारशी पेरणी करू शकणार नाही. मक्याचे पीक तीन ते साडेतीन महिन्यांत येते, त्यानंतर शेतकरी आॅक्टोबरमध्ये लेट खरीप कांद्याची पेरणी करायला मोकळे होतात किंबहुना त्यांना शेत मोकळे मिळते. अशा परिस्थितीत आता उशिराने मका पेरून लेट खरीप कांद्याचे नुकसान करून घेण्यास कोणताही शेतकरी तयार होत नाही. त्यामुळे यंदा मकाऐवजी बाजरीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता असून, बाजरीची पेरणी आॅगस्ट महिन्यापर्यंत केली तरी चालते त्यामुळे आत्तापर्यंत फक्त ५० हजार हेक्टरवरच बाजरीची पेरणी होऊ शकली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती