शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

जिल्ह्यात मक्याचे पीक धोक्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 01:28 IST

पावसाचे अगोदरच झालेले उशिरा आगमन व त्यातच लष्करी अळीने घातलेला घाला पाहता, खरिपात शेतकऱ्यांना हमखास दोन पैसे मिळवून देणारे मक्याचे पीक धोक्यात आले असून, खुद्द कृषी खात्यानेच शेतकऱ्यांना यापुढे मक्याचे पीक न घेण्याचे व घेतलेल्या पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झालेला असेल तर पीक नष्ट करण्याचे आवाहन केले आहे.

ठळक मुद्देबाजरीचे क्षेत्र वाढणार : खरिपाची ४२ टक्के पेरणी

नाशिक : पावसाचे अगोदरच झालेले उशिरा आगमन व त्यातच लष्करी अळीने घातलेला घाला पाहता, खरिपात शेतकऱ्यांना हमखास दोन पैसे मिळवून देणारे मक्याचे पीक धोक्यात आले असून, खुद्द कृषी खात्यानेच शेतकऱ्यांना यापुढे मक्याचे पीक न घेण्याचे व घेतलेल्या पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झालेला असेल तर पीक नष्ट करण्याचे आवाहन केले आहे. जुलै महिन्याच्या दुसºया आठवड्यापर्यंत खरिपाच्या ४२ टक्के पेरण्या झाल्या असून, यापुढे मक्याचे पीक घेणे व्यावहारिकदृष्ट्या परवडणारे नसल्यामुळे नजीकच्या काळात जिल्ह्यात बाजरीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.यंदा दमदार पावसाचे आगमन थेट जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच झाले असून, त्यामुळे शेतकºयांनी पेरण्यांना सुरुवात केली आहे. तथापि, ज्या शेतकºयांकडे पाणी उपलब्ध होते त्यांनी जून महिन्यात मक्याची पेरणी केली तथापि, उष्णतेचे प्रमाण कायम राहिल्याने या मक्यावर मोठ्या प्रमाणात लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला. त्यात प्रामुख्याने अळ्यांकडून मक्याची पाने खरबडून खाण्यास सुरुवात झाली असून, कणसांमध्ये शिरून दाण्यांवर प्रभाव टाकू लागल्याने पिकाला धोका निर्माण झाला आहे. शेतकºयांना लष्करी अळीमुळे क्षेत्रावर दुसरे पीक घ्यावे किंवा नाही याची काळजी वाटू लागली आहे. मालेगाव, नांदगाव, सटाणा, देवळा, कळवण या भागात मोठ्या प्रमाणात मक्याचे पीक घेतले जाते; परंतु अजूनही पाहिजे त्या प्रमाणात या तालुक्यांमध्ये पाऊस झालेला नाही. त्यामुळे मक्याची पेरणी पाहिजे तितकी होऊ शकली नाही. पाऊस अजून लांबला तर यापुढे मक्याचे पीक घेणे शेतकºयांना व्यावहारिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे शेतकरी बाजरी, ज्वारीकडे वळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.मक्याचे क्षेत्र घटण्याची शक्यताजाणकारांच्या मते यापुढे शेतकरी मक्याची फारशी पेरणी करू शकणार नाही. मक्याचे पीक तीन ते साडेतीन महिन्यांत येते, त्यानंतर शेतकरी आॅक्टोबरमध्ये लेट खरीप कांद्याची पेरणी करायला मोकळे होतात किंबहुना त्यांना शेत मोकळे मिळते. अशा परिस्थितीत आता उशिराने मका पेरून लेट खरीप कांद्याचे नुकसान करून घेण्यास कोणताही शेतकरी तयार होत नाही. त्यामुळे यंदा मकाऐवजी बाजरीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता असून, बाजरीची पेरणी आॅगस्ट महिन्यापर्यंत केली तरी चालते त्यामुळे आत्तापर्यंत फक्त ५० हजार हेक्टरवरच बाजरीची पेरणी होऊ शकली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती