शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

बदलत्या काळातही ‘जाहिरात’ टिकून

By admin | Updated: October 14, 2014 01:21 IST

बदलत्या काळातही ‘जाहिरात’ टिकून

 

राष्ट्रीय जाहिरात दिन साजरा होणे ही एक उत्साहवर्धक बाब आहे. यापूर्वी जाहिरात क्षेत्राने अशाप्रकारे एक ठरावीक दिवस निश्चित करून तो साजरा केला नव्हता.१४ आॅक्टोबर हाच राष्ट्रीय जाहिरात दिन म्हणून निवडण्याचे कारण म्हणजे या दिवशी १९०५ साली देशातील पहिली अ‍ॅड एजन्सी बी. दत्ता ऊर्फ दत्तात्रय बावडेकर यांनी मुंबई येथे सुरु केली.आजच्या काळात प्रत्येकजण जाहिरात संस्थांच्या द्वारे विविध माध्यमांच्या संपर्कात येत असतो. दुकानदार, कारखानदार, व्यावसायिक त्याचबरोबर वाढदिवसासाठी शुभेच्छा किंवा श्रद्धांजली इ.साठी वैयक्तिक जाहिराती देणारे तसेच जाहीर नोटीस देणारे अशा असंख्य प्रकारच्या ग्राहकांचा समावेश दिसून येतो. या जाहिरात दिनाच्या कार्यक्रमात अ‍ॅड एजन्सीज् रेडिओ, टीव्ही चॅनल त्याचप्रमाणे आऊट डोअर (होर्डिंग्ज्, वॉल पेंटिंग इ.) या सर्व माध्यमांत काम करणाऱ्यांचा सहभाग आहे. हे युग जाहिरातीेंचे युग आहे असे म्हटले जाते. स्पर्धात्मक जगात जाहिरातीला पर्याय नाही. त्यामुळे गेल्या पंचवीस वर्षांत जाहिरात क्षेत्राची घोडदौड खूप वेगाने झालेली दिसून येते. सोशल मीडियाद्वारे उत्पादनाची जाहिरात केली जाते; पण आजही या सर्वांमध्ये वृत्तपत्रीय जाहिरातींना ग्राहकाची प्रथम पसंती आहे. कमी खर्चिक, प्रभावी व अधिक काळ परिणाम करणारी असल्यामुळे वृत्तपत्र जाहिरात सर्वप्रथम केली जाते. नाशिकच्या दृष्टीने बघितले तर जाहिरात एजन्सीज् मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामध्ये छोट्या जाहिराती, जाहीर नोटीस यापासून ते मोठ्या क्रिएटिव्ह डिझाईन तयार करून त्या प्रसिद्ध करणाऱ्या अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीज् कार्यरत आहेत. या जाहिरातदारांची संघटना नाशिक अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीज् वेल्फेअर असोसिएशन (नावा) गत बारा वर्षांपासून कार्यरत आहे. ‘नावा’तर्फे वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये ‘नावा करंडक’ क्रिकेट स्पर्धा, सभासदांसाठी जाहिरात क्षेत्राशी संबंधित उद्बोधक व माहितीपर व्याख्याने, चर्चासत्रे, जाहिरात एजन्सीज्च्या कुटुंबीयांचे स्नेहसंमेलन इ. कार्यक्रम नियमित घेण्यात येतात. त्यामुळेच नाशिकमधील बहुतेक एजन्सीज्मध्ये सौहार्दाचे व खेळीमेळीचे वातावरण आहे. या कार्यांमध्ये वर्तमानपत्रांचे व संस्थेच्या हितचिंतकांचे, प्रायोजकांचे सहकार्य अनमोल आहे. आज राष्ट्रीय जाहिरात दिनाच्या निमित्ताने सर्व वृत्तपत्रे, हितचिंतक, जाहिरात एजन्सीज् ह्यांचे अभिनंदन आणि ज्यांच्यामुळे हा व्यवसाय वृद्धिंगत होत आहे त्या जाहिरातदार संस्था, व्यक्ती यांना शतश: धन्यवाद...- विठ्ठल देशपांडे