शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

महिंद्रा, बॉशसह मोठे वाहन उद्योग बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 23:44 IST

सातपूर : महिन्याभरापासून बंद असलेले उद्योग सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध शिथिल केल्याने जवळपास साडेआठशे उद्योगांनी उद्योग सुरू करण्याची परवानगी घेतली आहे,असे असले तरी नाशिकमधील महत्त्वपूर्ण समजले जाणारे महिंद्रा, बॉशसह अन्य वाहन उद्योग मात्र ३ मेपर्यंत सुरू होण्याची शक्यता नाही.

सातपूर : महिन्याभरापासून बंद असलेले उद्योग सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध शिथिल केल्याने जवळपास साडेआठशे उद्योगांनी उद्योग सुरू करण्याची परवानगी घेतली आहे,असे असले तरी नाशिकमधील महत्त्वपूर्ण समजले जाणारे महिंद्रा, बॉशसह अन्य वाहन उद्योग मात्र ३ मेपर्यंत सुरू होण्याची शक्यता नाही. त्यामुळे त्यांचे वेंडर असलेल्या लघु उद्योगांवर अद्यापही अस्थिरतेचे वातावरण असल्याने असे उद्योग परवानगीसाठी पुढे आलेले नाहीत. जर मोठे उद्योग प्रकल्प सुरू होणार नसतील तर लघु उद्योग सुरू होऊन फारसा लाभ होणार नाही, अशी द्विधा स्थिती निर्माण झाली आहे.कोरोना विषाणू संसर्गजन्य रोगाचा फैलाव रोखण्यासाठी २३ मार्चपासून ते ३ मेपर्यंत लॉकडाउन वाढविण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर करून परंतु २० एप्रिलनंतर काही ठिकाणी शिथिलता आणली. महानगरपालिका क्षेत्र वगळता ग्रामीण भागातील उद्योग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यातील तेराशे उद्योगांनी आॅनलाइन परवानगीसाठी अर्ज दाखल केले होते. नाशिक जिल्हा आॅटोमोबाइल (वाहन उद्योग) आणि इंजिनिअरिंग हब म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील सर्वांत मोठे उद्योग म्हणून महिंद्र अँड महिंद्र कंपनी आणि बॉश कंपनीकडे पाहिले जाते. या दोन्ही कारखान्यांवर आधारित वेंडरची (लघुउद्योग) संख्या जवळपास एक हजारांच्या आसपास आहे. या दोन्ही कारखान्यांत आणि संलग्न लघुउद्योगात सुमारे २५ हजार कामगार काम करतात. जिल्हा प्रशासनाने निर्बंध शिथिल केल्याने वाहन उद्योगांनी उद्योग सुरू करण्यास स्वारस्य दाखविलेले नाही. वाहन उद्योगाव्यतिरिक्त अन्य उद्योग सुरू होणार आहेत. मोठे उद्योग सुरू होणार नसतील तर लघुउद्योगांचे आर्थिक गणित आणखी गडगडणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक