शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत सुरक्षिततेसाठी ‘महावितरण गणपतीच्या दारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 00:42 IST

उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विद्युत सुरक्षिततेविषयी जनतेमध्ये जनजागृती करण्याच्या हेतूने महावितरणने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.

नाशिक : उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विद्युत सुरक्षिततेविषयी जनतेमध्ये जनजागृती करण्याच्या हेतूने महावितरणने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. गणेशोत्सवात विद्युत सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी तसेच यासंदर्भात प्रबोधन करण्यासाठी महावितरणच्या नाशिक शहर विभाग २ अंतर्गत ‘महावितरण गणपतीच्या दारी’ हा उपक्र म राबविण्यात येत आहे.महावितरणकडून गणेश मंडळांना सवलतीच्या दरात अधिकृत तात्पुरती वीजजोडणी देण्यात येते. या सर्व गणेश मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घेतल्याची खात्री करणे, न घेतल्यास आणि विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती आदी उद्देशाने विभागात सहा पथके तैनात करण्यात आली आहेत.वीज गुणवत्ता व नियंत्रण कक्षाचे सहायक अभियंता या पथकांचे नेतृत्व करीत आहेत. आतापर्यंत या उपक्रमात नाशिकरोड, जेलरोड, देवळाली, भगूर, आडगाव, द्वारका आणि उपनगर परिसरातील ८१ गणेश मंडळांना भेटी देऊन वीजजोडणी, वायरिंग आदींची तपासणी करून आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती करून सूचना देण्यात आल्या.सातपूरला राबविली मोहीमनाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनीसुद्धा शहरातील सातपूर, अशोकनगर व आनंदवली येथील गणपती मंडळांना भेटी देऊन यासंदर्भात गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. नाशिक शहर मंडलाचे अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहर विभाग २ चे कार्यकारी अभियंता अनिल थोरात यांच्या नेतृत्वात हा उपक्रम राबविण्यात येत आहे.या गणेश मंडळांच्या दर्शनी भागात ऊर्जा संवर्धन व सुरक्षेबाबत जनजागृती करणारे पोस्टर लावण्यात आले. गणेश मंडळ पदाधिकारी व भक्तांकडूनही महावितरणला सहकार्य लाभत आहे.

टॅग्स :electricityवीजGaneshotsavगणेशोत्सव