शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

महाराष्ट्राची अस्मिता जपणार एसटी बस

By admin | Updated: June 9, 2017 18:25 IST

राज्यातील सर्व बसेसवर सध्या महाराष्ट्राच्या नकाशासह जय महाराष्ट्र ब्रीद आकारास येत आहे.

नाशिक : कर्नाटक सरकारने ‘जय महाराष्ट्र’ म्हणणाऱ्या तेथील लोकप्रतिनिधींना अपात्र ठरविण्याचा निर्णय घेतल्यानंतर कर्नाटकात पोहोचलेल्या राज्याच्या परिवहनमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी बसेसवर ‘जय महाराष्ट्र’चा नारा दिला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व बसेसवर सध्या महाराष्ट्राच्या नकाशासह जय महाराष्ट्र ब्रीद आकारास येत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त परिवहनमंत्र्यांनी विविध योजना जाहीर करतानाच एसटी बसेसवर जय महाराष्ट्र असे बोधचिन्ह असेल अशी घोषणा केली होती. त्यानुसार एसटीच्या पारंपरिक बोधचिन्हात थोडासा बदल करून त्यामध्ये ‘जय महाराष्ट्र’ या महाराष्ट्राची अस्मिता जागविणाऱ्या घोषणेचा व महाराष्ट्राच्या नकाशाचा समावेश करण्यात आला आहे. मुंबई आगार येथून मुंबई-बेळगाव ही पहिली बस ‘जय महाराष्ट्र’ या नवीन बोधचिन्हासह पोहोचली. सध्या नाशिक जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण बसेसवर येथील कार्यशाळा आणि डेपोंमध्ये जय महराष्ट्र लिहिण्यास सुरुवात झाली आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या लोगोच्या खालीच जय महाराष्ट्र आणि या दोन्ही अक्षराच्या मध्ये महाराष्ट्राचा नकाशा असे ब्रीद मिरविले जात आहे. परिवहन महामंडळाच्या वर्धापनदिनाचे औचित्य सांगितले जात असले तरी त्यामागे कर्नाटकात जय महाराष्ट्रला विरोध करण्यात आल्याने महाराष्ट्राची अस्मिता म्हणून बसेसवर आता कायमस्वरूपी जय महाराष्ट्र असणार आहे.