शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

देशाच्या नेतृत्वाची संधी महाराष्टलाच :सुरेश भटेवरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 00:16 IST

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला पूर्ण बहुमत मिळण्याची शक्यता कमी असून, काठावर मिळालेल्या संख्याबळावर भाजपाला अन्य पक्षांच्या मदतीने सरकार बनविण्याची वेळ आली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय म्हणून नितीन गडकरी यांचे नाव पुढे येऊ शकते, तसेच विरोधकांची एकी फळास आली तर सर्वमान्य उमेदवार म्हणून शरद पवार यांचे नाव पंतप्रधानपदासाठी अग्रेसर राहू शकते.

ठळक मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय म्हणून नितीन गडकरी यांचे नाव पुढे येऊ शकतेस्व. बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता पुरस्कार वितरणविरोधकांची एकी फळास आली तर सर्वमान्य उमेदवार म्हणून शरद पवार यांचे नाव पंतप्रधानपदासाठी

नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला पूर्ण बहुमत मिळण्याची शक्यता कमी असून, काठावर मिळालेल्या संख्याबळावर भाजपाला अन्य पक्षांच्या मदतीने सरकार बनविण्याची वेळ आली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय म्हणून नितीन गडकरी यांचे नाव पुढे येऊ शकते, तसेच विरोधकांची एकी फळास आली तर सर्वमान्य उमेदवार म्हणून शरद पवार यांचे नाव पंतप्रधानपदासाठी अग्रेसर राहू शकते. त्यामुळे दोन्हीही बाबतीत देशाच्या नेतृत्वाची संधी महाराष्टकडे येण्याची शक्यता दिल्लीतील लोकमतचे संपादक सुरेश भटेवरा यांनी व्यक्त केली. सार्वजनिक वाचनालयाच्या १७८ व्या वार्षिक समारंभाच्या निमित्ताने स्व. बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता पुरस्कार वितरणप्रसंगी ते बोलत होते. महाराष्टÑ टाइम्सचे नवी दिल्लीतील वरिष्ठ सहायक संपादक सुनील चावके यांना भटेवरा यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. भटेवरा पुढे म्हणाले, देशात २०१९ मध्ये होणाऱ्या निवडणुकीबाबत जनतेच्या मनात अनेक प्रश्न आहेत, कोण सत्तेवर येईल याबाबत नेहमीच विचारणा केली जाते. परंतु कोणत्याही घटनेने इव्हेंट साजरा करणे एवढे एकमेव काम या सरकारने केले आहे. जेव्हा कधी त्यांना त्यांच्या कामगिरीबाबत विचारणा केली जाते त्यावेळी कॉँग्रेसकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत असतात. त्यामुळे आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे किमान शंभर खासदार कमी होतील, असा दावा करून भटेवरा यांनी त्यामागच्या कारणांची मिमांसा केली. आजवर झालेल्या लोकसभेच्या आठ पोटनिवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. त्यांचे संख्याबळ कमी झाले आहे. येत्या निवडणुकीतही जागा कमी झाल्यास राष्ट्रीय लोकशाही आघा डीतील घटक पक्ष पंतप्रधानपदासाठी पुन्हा मोदी यांच्यासाठी पुढे येणार नाहीत. अशा वेळी मोदी यांच्या तोडीस तोड नेता म्हणून नितीन गडकरी यांच्या नावावर सहमती होऊ शकेल आणि सर्वच विरोधीपक्ष एकजुटीने या निवडणुकीत उतरले व त्यांना यश लाभले तर राहुल गांधी यांना पंतप्रधान म्हणून स्वीकारण्याऐवजी शरद पवार यांच्या नावाला सर्वांची पसंती मिळू शकेल असे भटेवरा यांनी सांगितले.या प्रसंगी व्यासपीठावर सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते, किशोर पाठक, प्रमुख सचिव श्रीकांत बेणी, भानुदास शौचे, निवड समितीचे योगेश खरे आदी उपस्थित होते. प्रारंभी जयप्रकाश जातेगावकर यांनी प्रास्ताविक केले, तर संजय करंजकर यांनी परिचय करून दिला. निवड समितीतर्फे दिव्य मराठीचे डेप्युटी एडिटर अभिजीत कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. शंकर बोºहाडे यांनी, तर आभार उदयकुमार मुंगी यांनी मानले.माध्यमांचे विभाजनसत्काराला उत्तर देताना सुनील चावके यांनी बाळशास्त्री जांभेकर यांनी ज्या काळात पत्रकारिता केली त्यावेळी इंग्रजांचा त्यांच्यावर दबाव होता तसाच दबाव आजही माध्यमांवर टाकला जात असल्याचे सांगत, सत्ताधारी व विरोधीपक्ष अशा दोहोंमध्ये माध्यमांचे विभाजन झाले असल्याने जो तो आपल्यापरीने त्यातून अर्थ काढू लागल्याचे सांगितले. आगामी निवडणूक सत्ताधाºयांना जशी अवघड आहे तशीच विरोधकांनादेखील सोपी नसल्याचे ते म्हणाले. देशात कधी नव्हे इतकी भयावह परिस्थिती निर्माण झालेली असून, वृत्तपत्रांवर अघोषित आणीबाणी लादून त्यांचा आवाजच बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसे झाल्यास देशाची घडीच विस्कटेल त्यामुळे बाळशास्त्री जांभेकर व लोकमान्य टिळक यांनी अंगीकारलेले सत्य बोलण्याचे व लिहिण्याचे धाडस पत्रकारांनी दाखविले तरच देश वाचू शकेल, असे मतही सुरेश भटेवरा यांनी व्यक्त केले.

टॅग्स :libraryवाचनालय