शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

महाराष्ट्र चेंबर उत्तर महाराष्ट्राची निवडणूक बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2021 01:25 IST

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चरच्या निवडणूक प्रक्रियेत महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्र वगळता अन्य विभागांची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी व उद्योग जगताचे लक्ष लागून असलेली उत्तर महाराष्ट्र विभागाची निवडणूकही अखेर आजी-माजी अध्यक्ष व विश्वस्तांच्या मध्यस्थीमुळे बिनविरोध झाली आहे.

ठळक मुद्देविश्वस्त मंडळाच्या प्रयत्नांना यश : परस्पर विरोधी गटात उपाध्यक्ष, चेअरमनपदाच्या वाटपातून समेट

नाशिक : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चरच्या निवडणूक प्रक्रियेत महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्र वगळता अन्य विभागांची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी व उद्योग जगताचे लक्ष लागून असलेली उत्तर महाराष्ट्र विभागाची निवडणूकही अखेर आजी-माजी अध्यक्ष व विश्वस्तांच्या मध्यस्थीमुळे बिनविरोध झाली आहे. नाशिकमधील उपाध्यक्ष व कार्यकारी सदस्यमंडळाच्या २१ जागांसाठी होणारी निवडणूक टाळण्यासाठी आजी-माजी अध्यक्षांसह विश्वस्त मंडळाच्या सदस्यांनी एकत्रित बैठक घेत परस्पर विरोधी गटात चेंबरचे उपाध्यक्षपद व शाखा चेअरमनपदाचे वाटप करून समेट घडवून आणले. त्यानंतर उत्तर महाराष्ट्राची निवडणूकही बिनविरोध झाल्याची घोषणा चेंबरचे नवनिर्वाचित अध्यक्ष ललित गांधी यांनी पत्रकार परिषदेत केली.

 

सारडा संकुल येथील महाराष्ट्र चेंबरच्या कार्यालयात मंगळवारी (दि. २३) पत्रकार परिषदेत विश्वस्त मंडळाचे चेअरमन आशिष पेडणेकर, माजी अध्यक्ष विक्रम सारडा, माजी अध्यक्ष हेमंत राठी, नवनिर्वाचित अध्यक्ष ललित गांधी, वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी, अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी एकत्र बसून सामंजस्याने उत्तर महाराष्ट्राची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नाशिकच्या कार्यकारिणी पदाच्या २१ जागांसाठी आजपर्यंतची बिनविरोध निवडणुकीची परंपरा यावर्षीही कायम राहिली असून चेंबरच्या उपाध्यक्षपदासाठी सुधाकर देशमुख यांची तर सुनिता फाल्गुने यांची नाशिक शाखा चेअरमनपदी निवड करण्यात आली. को-चेअरमन पदी संधी संजय सोनवणे यांना देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. चेंबरची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी हेमंत गायकवाड, संदीप भंडारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

 

कार्यकारिणी सदस्य

हेमंत गायकवाड, कैलास आहेर, व्हिनस वाणी, संजय राठी, रवी जैन, रवींद्र झोपे, हेमंत कांकरिया, नेमिचंद कोचर, मनीष रावल, संजय महाजन, सचिन शहा, अंजु सिंघल, भावेश मानेक, राजेश मालपुरे, डॉ. मिथिला कापडणीस, स्वप्नील जैन, दत्ता भालेराव, राजाराम सांगळे, सचिन जाधव , मिलिंद राजपूत, प्रशांत जोशी यांना कार्यकारिणी समितीवर संधी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती माजी अध्यक्ष विक्रम सारडा व हेमंत राठी यांच्यासह अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी दिली.

 

कोट

चेंबरच्या बिनविरोध निवडणुकीने यापुढील काळात राज्यातील व्यापार उद्योगाच्या विकासासाठी बळ मिळणार असून महाराष्ट्र चेंबर त्यासाठी कायम प्रयत्नशील आहेत. उद्योग, कृषी व व्यापाराच्या सर्वांगीण विकासासाठी सामूहिकपणे सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार आहेत.

- ललित गांधी, नवनिर्वाचित अध्यक्ष , महाराष्ट्र चेंबर

टॅग्स :NashikनाशिकElectionनिवडणूक