शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा प्रभाव नाही, पाटलांनी आता राजकारण करु नये: रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 09:50 IST

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांचा प्रभाव विधानसभा निवडणुकीत दिसणार नाही. त्यांनी निवडणुकीतून माघारीची घेतलेली भूमिका योग्य आहे, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क सातपूर: मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांचा प्रभाव विधानसभा निवडणुकीत दिसणार नाही. त्यांनी निवडणुकीतून माघारीची घेतलेली भूमिका योग्य आहे. कारण कोणत्याही एका जाती-धर्मावर निवडणूक लढविता येत नाही. मात्र, जरांगे यांनी आता राजकारण करू नये, असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला.

नाशिक दौऱ्यावर आले असता, आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, लोकसभेला नाही तर विधानसभा निवडणुकीत आमच्या पक्षाला (रिपाइं) किमान चार-पाच जागा महायुतीकडून मिळणे अपेक्षित होते. पण एकच जागा मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. परंतु बंडखोरी नको म्हणून महायुतीसोबतच राहणार आहे. महायुतीला किमान १७० जागा मिळतील, असा आशावाद केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विरोधक संविधान, आरक्षण या मुद्द्यांवर यशस्वी झाले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत हे मुद्दे टिकणार नाहीत. दलित, बौद्ध, मुस्लिम, ओबीसींची काही प्रमाणात मते मिळतील. त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेचादेखील फायदा होणार आहे. यावेळी रिपाइं उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव आदी उपस्थित होते. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४north maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकRamdas Athawaleरामदास आठवलेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील