शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवालांना उद्या सरेंडर व्हावे लागणार; कोर्ट अंतरिम जामिनावर ५ जूनला निकाल देणार 
2
शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत तटकरेंचा खळबळजनक दावा; मात्र अजित पवार म्हणाले...
3
मतदानानंतरची रणनीती ठरवण्यासाठी इंडिया आघाडीची बैठक, हे बडे नेते अनुपस्थित   
4
४ तारखेला निकाल, ५ जूनला केंद्रीय मंत्रिमंडळाला राष्ट्रपतींकडून डिनरचे निमंत्रण
5
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: 'एक्झिट पोल' थोड्याच वेळात; आकडे समोर येणार, देशाचा कल कळणार
6
लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलवर EC ची मोठी घोषणा; "संध्याकाळी ६.३० वाजण्यापूर्वी..."
7
"पाकव्याप्त काश्मीर आपलं नाही, ती परकीय भूमी"; पाकिस्तानची मोठी कबुली
8
पंतप्रधान मोदींच्या १५५ सभा, २ हजारहून अधिक वेळा उच्चारले हे २ शब्द; विरोधकांना या ५ मुद्द्यांवर घेरलं!
9
‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ पक्षातील महत्त्वपूर्ण नियुक्त्यांची घोषणा, सुप्रिया सुळेंकडे सोपवली मोठी जबाबदारी
10
"थोडं थांबा, ४ जूननंतर कुठे रांग लागते हे..."; सुनील तटकरेंच्या दाव्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर
11
"एका समाजासाठी काम करत असाल तर..."; अमोल मिटकरींचा मेधा कुलकर्णींवर पलटवार
12
रणवीर शिवाय डिनरला गेली दीपिका पादुकोण, अभिनेत्रीच्या बेबी बंपपेक्षा केअर टेकरने वेधलं सर्वांचं लक्ष
13
"मोदींच्या साधनेमुळे वातावरण सुधारले, उष्णतेपासून दिलासा मिळाला’’, रवी किशन यांनी केला दावा  
14
बदललेले रक्त बिल्डर 'बाळा'च्या आईचे? आज मोठा खुलासा होणार, पोलिसांना लीड मिळाले...
15
भाजपा स्वबळावर जिंकू शकत नाही, ... एवढी बेगमी ते करतील; लोकसभा निकालावर भाकीत
16
Punjab National Bank : 'या' सरकारी बँकेतून लोन घेणं महागणार, वाढणार EMI; पाहा किती झाला Interest Rate?
17
“४ जूनला इंडिया आघाडी जिंकतेय, देशाची चॉइस पंतप्रधान म्हणून राहुल गांधी आहेत”: संजय राऊत
18
"४६ सेकंदात २० अँगल... कॅमेरे लावून कोण ध्यान करतं?"; विरोधकांचा PM मोदींवर निशाणा
19
“देशाला पुढे नेण्यात एकटे PM मोदी अन् फडणवीस पुरेसे नाहीत”; भाजपा खासदाराचे विधान चर्चेत
20
भारतीय क्रिकेटपटूची १.५ कोटींची जमीन अधिकारी-भूमाफियांनी लाटली; कागदपत्रांत हेराफेरी, बाप फेऱ्या मारतोय

महंत मोहनदास बेपत्ता; आखाडा परिषद चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 1:28 AM

राम रहिम, आसाराम बापू यांच्यासारख्या बाबांना भोंदू ठरविणाºया देशभरातील साधू-महंतांच्या आखाडा परिषदेचे राष्टÑीय प्रवक्तेमहंत तथा श्री पंचायती आखाडा बडा उदासीन हरिद्वारचे कोठारी महंत मोहनदास हे प्रवासादरम्यान गायब झाल्याने व दहा दिवस उलटूनही त्यांचा शोध न लागल्याने अखिल भारतीय षड्दर्शन आखाडा परिषदेने चिंता व्यक्त केली आहे. या संदर्भात त्र्यंबकेश्वर येथे सोमवारी सकाळी आखाडा परिषदेची तातडीची बैठक घेण्यात आली.

नाशिक : राम रहिम, आसाराम बापू यांच्यासारख्या बाबांना भोंदू ठरविणाºया देशभरातील साधू-महंतांच्या आखाडा परिषदेचे राष्टÑीय प्रवक्तेमहंत तथा श्री पंचायती आखाडा बडा उदासीन हरिद्वारचे कोठारी महंत मोहनदास हे प्रवासादरम्यान गायब झाल्याने व दहा दिवस उलटूनही त्यांचा शोध न लागल्याने अखिल भारतीय षड्दर्शन आखाडा परिषदेने चिंता व्यक्त केली आहे. या संदर्भात त्र्यंबकेश्वर येथे सोमवारी सकाळी आखाडा परिषदेची तातडीची बैठक घेण्यात आली.  स्वामी सागरानंद यांच्या अध्यक्षतेखाली जव्हाररोडवरील संन्यास आश्रम येथे ही बैठक घेण्यात आली. आखाडा परिषदेचे महामंत्री महंत हरिगिरी महाराज यांनी या बैठकीत सांगितले की, पंचायती आखाडा बडा उदासीन हरिद्वारचे महंत  मोहनदास हे १५ सप्टेंबर रोजी हरिद्वारहून मुंबईकडे रेल्वेने निघाले असता वाटेत ते गायब झाले आहेत. या संदर्भात हरिद्वारचे जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुख तसेच उत्तराखंडच्या  मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार करण्यात आली. हरिद्वारच्या प्रमुख पोलीस अधिकाºयांचे पथकही त्यांच्या शोधासाठी रवाना करण्यात आले, परंतु दहा दिवस उलटूनही त्यांचा शोध लागलेला नाही. आखाडा परिषदेने देशभरातील भोंदू बाबांची यादी जाहीर केल्यानंतर राष्टÑीय प्रवक्तेमहंत मोहनदास यांना अनोळखी व्यक्तींकडून धमकीचे फोन येत होते, त्या संदर्भात त्यांनी पोलिसांत तक्रारही केली होती. परंतु त्याची दखल घेतली गेली नाही. अखेर महंत मोहनदास यांचे संबंधित गुंडांकडून अपहरण करण्यात आले अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली. मेरठपर्यंत महंत मोहनदास यांचे लोकेशन मिळत आहे, त्यानंतर मात्र फोनही लागत नाही. आखाडा परिषदेच्या महंताचे अशा प्रकारे अपहरण करण्याची घटना दुर्दैवी असून, या संदर्भात केंद्र व राज्य सरकारने तत्काळ चौकशी करून या अपहरणाचे षडयंत्र रचणाºयांचा पर्दाफाश करावा, अशी मागणीही आखाडा परिषदेने केली आहे. यावेळी बोलताना आखाडा परिषदेचे प्रवक्ते योगीराज डॉ. बिंदूजी महाराज यांनीही सरकार अद्यापही महंत मोहन दास यांचा शोध न घेऊ शकल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. या बैठकीस त्र्यंबकेश्वर येथील सर्व आखाड्यांचे साधू, महंत उपस्थित होते.हे महंत होते उपस्थितच्आखाडा परिषदेच्या सोमवारी झालेल्या बैठकीस अखिल भारतीय षट्दर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती, महामंत्री महंत हरिगिरीजी, प्रवक्ते डॉ. बिंदुजी महाराज, महंत शंकरानंद सरस्वती, निर्मल आखाड्याचे महंत राजेंद्र सिंह, अग्नी आखाड्याचे महंत दुर्गानंद ब्रह्मचारी, जुना आखाड्याचे महंत सुशील गिरी, अटलचे महंत उदयगिरी, श्री पंचायती अखाडा बडा उदासीनचे महंत बालक दास, नया उदासी आखाड्याचे महंत विचार दास, आवाहनचे आनंद पुरी, निर्वाणी आखाड्याचे कमलेशगिरी दिगंबर आदी उपस्थित होते.