शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
3
एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
4
सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
5
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
6
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
7
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
8
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
9
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
10
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
11
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
12
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...
13
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
14
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...
15
Rambabu Singh : अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...
16
१० तारखेला वाढदिवस साजरा केला अन् दुसऱ्याच दिवशी...; आईसह २ मुलांचा दुर्दैवी अंत
17
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
18
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
19
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
20
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?

महंत ग्यानदास यांनी कामांबद्दल नाराजीचा सूर लावला;

By admin | Updated: June 9, 2015 02:15 IST

महंत ग्यानदास यांनी कामांबद्दल नाराजीचा सूर लावला;

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर येऊन ठेपल्याने साधुग्रामसह अन्य कामे उरकण्याचे आव्हान एकीकडे पेलणाऱ्या प्रशासनाला नाशिकमध्ये ठाण मांडून बसलेले आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांनाही सांभाळण्याची कसरत करावी लागते आहे. महंतांच्या वेगवेगळ्या विधानांमुळे प्रशासनाची करमणूकही होताना दिसून येत आहे. रविवारी पावसाने साधुग्रामची दाणादाण उडाल्यानंतर सोमवारी सकाळी ‘रामायण’वर औपचारिकपणे बोलताना महंत ग्यानदास यांनी कामांबद्दल नाराजीचा सूर लावला; मात्र तासाभरातच साधुग्राममध्ये झालेल्या पाहणी दौऱ्यात महंतांनी प्रशासनाला प्रशस्तिपत्रक बहाल केल्याने माध्यम प्रतिनिधींसह पदाधिकारी व अधिकारीही चकित झाले. तासाभरातच महंतांची दोन रूपं पाहायला मिळाली. रविवारी पावसामुळे तपोवनातील साधुग्राममध्ये उभारण्यात आलेल्या शौचालय व स्नानगृहांचे पत्रे उडून नुकसान झाले होते. याशिवाय ठिकठिकाणी पाणी साचून विजेचे खांबही वाकले होते. पहिल्याच पावसाने साधुग्रामची दैना उडाल्याने प्रशासनाची धावपळ उडाली. सोमवारी सकाळी साधुग्राममधील नुकसानीची पाहणी करण्यासाठी महापौरांनी दौऱ्याचे आयोजन केले होते. या दौऱ्यासाठी महापौरांच्या ‘रामायण’ निवासस्थानी आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदासही उपस्थित झाले. यावेळी ‘रामायण’वर माध्यम प्रतिनिधींसह महापालिकेचे पदाधिकारी व अधिकारीही हजर होते. याचवेळी महंतांनी प्रशासनाच्या कामाबद्दल नाराजीचा सूर लावला. प्रशासनाकडून कमिशन घेतले जात असल्यानेच कामे निकृष्ट होत असल्याचा आरोप करताना महंतांनी दहा मिनिटांच्या पावसाने एवढे नुकसान झाले, तर दोन तास पाऊस झाल्यास काय अवस्था होईल, अशी भीतीही व्यक्त केली. याचवेळी महंतांनी महापौरांचेही उपरोधिक स्वरात कान पिळले. महंतांचा नूर पाहून पदाधिकाऱ्यांसह अधिकारीवर्गही तणावाखाली आला. पुढच्या दौऱ्यात काय वाढून ठेवले आहे, या भीतीखालीच तपोवनाकडे सर्वांनी प्रस्थान केले. साधुग्राममधील कामांची पाहणी केल्यानंतर महंतांचे मात्र सौम्य रूप समोर आले आणि सारेच अवाक् होतानाच अधिकारीवर्गाने सुटकेचा नि:श्वासही सोडला. ‘ये नैसर्गिक आपत्ती है, ऐसा थोडाबहुत कुछ होता रहेता है’ असे सांगत महंतांनी प्रशासनाकडून साधुग्राम उभारणीचे काम उत्तम असल्याचे प्रशस्तिपत्रक बहाल केले. याशिवाय आम्ही ३० जूननंतर येऊ तोपर्यंत कामांसाठी अवधीही देत असल्याचे सांगितल्याने प्रशासनाचा जीव भांड्यात पडला. तासाभरापूर्वी प्रशासनावर आरोपांच्या फैरी झाडणाऱ्या महंतांनी साधुग्राममध्ये मात्र मवाळ भूमिका घेतल्याने नेमकी काय जादू झाली, यावरच नंतर पदाधिकारी व अधिकाऱ्यांमध्ये चर्चा रंगली होती. (प्रतिनिधी)