शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

करउद्रेक थांबविण्यासाठी ‘महाजन’ मध्यस्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 00:48 IST

नाशिक : महापालिकेच्या करवसुलीच्या विरोधात गावठाणे आणि विविध व्यावसायिक संघटनांच्या बैठकांचे सत्र सुरूच असून, स्थानिक पातळीवरील भाजपाचे नेतृत्व हतबल झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता ही करवाढ अंगलट येऊ नये आणि नागरिकांच्या भावना ऐकून तोडगा काढावा यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांना मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी दिली आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचा तोडगा : जनतेचा आवाज ऐकणार; शिक्षण संस्था, शेतकरी, औद्योगिक संघटनांशी करणार चर्चा

नाशिक : महापालिकेच्या करवसुलीच्या विरोधात गावठाणे आणि विविध व्यावसायिक संघटनांच्या बैठकांचे सत्र सुरूच असून, स्थानिक पातळीवरील भाजपाचे नेतृत्व हतबल झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता ही करवाढ अंगलट येऊ नये आणि नागरिकांच्या भावना ऐकून तोडगा काढावा यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांना मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी दिली आहे.भाजपाचे शहराध्यक्ष आमदार बाळसाहेब सानप आणि आमदार सीमा हिरे यांनी मंगळवारी (दि. १७) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मुंबईत भेट घेतली आणि शहरातील करसमस्येविषयी माहिती दिली. महापालिका प्रशासनाने १ एप्रिलपासून सर्व निवासी मिळकती तसेच शेती व औद्योगिक क्षेत्र तसेच शिक्षण संस्थांच्या मिळकतींवर करवाढ लागू केली आहे. त्यामुळे कृती समिती, मी नाशिककर अशा विविध नावांखाली संस्थांनी संघटन करून विरोध करण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळेच नाशिक शहरातील वातावरण सत्तारूढ भाजपाच्या विरोधात जात असून, त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मेळाव्यात आता नाशिकमध्ये आमदार सानप आणि सीमा हिरे सहभागीही झाले आहेत. याशिवाय निमा, आयमा, वकील अशा व्यावसायिकांच्या संघटनांनीदेखील करवाढीच्या विरोधात आंदोलनांना पाठिंबा दिला आहे.आयुक्त तुकाराम मुंढे यांना करवाढीबाबत भाजपाचे शिष्टमंडळे भेटून उपयोग झालेला नाही. त्यामुळे आता भाजपा आमदारांनी मुख्यमंत्र्यांचा धावा सुरू केला आहे. मंगळवारी (दि. १७) याबाबत आमदारद्वयींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि शहरात करामुळे निर्माण झालेल्या उद्रेकाविषयी माहिती दिली. त्यावर चालू आठवड्यात पालकमंत्री गिरीश महाजन हे नाशिक दौºयावर येणार असून, ते सर्व शेतकरी, शिक्षण संस्थाचालक, औद्योगिक संघटना आणि अन्य नागरी संघटनांशी चर्चा करणार आहेत. त्यांच्या भावना आणि अडचणी समजावून घेऊन ते प्रशासनाशी चर्चा करून निर्णय घेतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे सीमा हिरे यांनी कळविले आहे. महापालिकेने केलेली करवाढ नियमित घरपट्टीत १८ टक्के वाढ करण्यात आली आहे. याशिवाय बिगरनिवासी आणि औद्योगिक क्षेत्रातही भरीव वाढ केली असून, ती ८३ टक्क्यांपर्यंत गेली आहे. याशिवाय नवीन मिळकती तसेच खुल्या भूखंडासाठी भाडेमूल्य निश्चित करण्यात आले असून, त्यामुळे नव्या मिळकतींना करवाढीचा मोठा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. खुल्या भूखंडावरील करवाढीमुळे शेती क्षेत्रावर कर लागू होणार तो किमान ६५हजार प्रति एकर असेल, असे सांगितले जात आहे.