शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

सरस्वतीच्या दारातच ‘मधुशाळा’

By admin | Updated: December 14, 2015 23:52 IST

सरस्वतीच्या दारातच ‘मधुशाळा’

सिडको :विद्या विनयन शोभते’ असे वाक्य शाळेच्या भिंतीवर रेखाटलेल्या महापालिकेच्या गणेश चौकातील हायस्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना शाळेत प्रवेश करतानाच मद्याच्या फुटलेल्या बाटल्यांचा कच दिसतो. यावरून या शाळेची सुरक्षितता किती रामभरोसे आहे याचे चित्र दर सुटीच्या दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर बघावयास मिळते. अशी परिस्थिती असतानाही या शाळेकडे अद्यापही महापालिकेच्या कारभाऱ्यांनी याचे गांभीर्याने दखल घेतली नसल्याचे दिसत आहे.सिडकोतील गणेश चौकात मनपा हायस्कूल आहे. या शाळेत सकाळी व दुपार असे वर्ग भरतात, परंतु या शाळेची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. शाळेच्या संपूर्ण आवारात कचरा साचलेला असून, गाजरगवत वाढलेले आहे. सकाळी अंगवाडीच्या तीन तुकड्या भरतात व दुपारी पाचवी ते दहावीच्या जेमतेम तुकड्या भरतात. सोमवारी सकाळी अंगणवाडीच्या मुलांना त्यांचे पालक शाळेत घेऊन आले की शाळेच्या प्रवेश दारातच मद्यपींनी मद्याच्या बाटल्या फोडून परिसरात काचा टाकलेल्या दिसतात. या काचा जर शाळेतील बालगोपाळांच्या पायात शिरल्या तर त्यांना इजा होऊ शकते. यामुळे शाळेत मुलांना सोडविण्यासाठी आलेल्या पालकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. शाळेला रविवार व इतर सार्वजनिक सुटीच्या दिवसानंतर दुसऱ्या दिवशी शाळेत मद्याच्या बाटल्या दिसून येतात. सोमवार (दि १४)रोजी असाच प्रकार उघडकीस आला आणि शाळेत मुलांना सोडण्यासाठी आलेल्या पालकांनी प्रवेश द्वारावर मद्याच्या बाटल्या फोडलेल्या पाहून शाळेच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला. शाळेचे मुख्य प्रवेशद्वार तुटलेले असून, शाळेत रात्रीच्या वेळी सुरक्षारक्षकच नसल्याने शाळेच्या मैदानात रात्री मद्याच्या पार्ट्या होतात, असे परिसरातील नागरिकांनी सांगितले. तसेच शाळेच्या मैदानात रात्रीच्या वेळेस टवाळखोर गर्दी करून याच मैदानात मद्यप्राशन करून सिडको तसेच परिसरात धिंगाणा घालण्याचा प्रकारही या टवाळखोरांकडून केला जात असल्याचेही नागरिकांनी सांगितले.शाळेच्या आवारात दोन ते तीन खोल्या आहेत. या खोल्यांमध्ये मनपा कर्मचारी राहत असल्याचे सांगण्यात येत असले तरी या ठिकाणी सदर कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून फुकट लाईट वापरत आहे. तसेच शाळेच्या आवारात मुके जनावरही त्यांनी पाळल्याचे शाळेच्या वतीने सांगण्यात आले. एकूणच संपूर्ण शाळाच रामभरोसे झाली असून, याबाबत मनपा आयुक्तांनीच लक्ष घालण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.