शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
2
"आम्हाला तोंड उघडायला लावू नका..."; सुप्रीम कोर्ट ईडीवर संतापले; काय आहे प्रकरण?
3
"पाती माझ्यासोत जबरदस्ती..."; इंग्लंडचे माजी खासदार अँड्रयू ग्रिफिथ्स यांच्यावर, माजी खासदार पत्नीचा गंभीर आरोप
4
झोपेत असताना तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा, नंतर लाथा मारायचा; माजी महिला खासदाराने केले गंभीर आरोप
5
हवाई दलाचे विमान महाविद्यालयावर कोसळले; अनेकांच्या मृत्यूचा संशय, बांग्लादेशातील घटना
6
Solapur Crime: घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले
7
"विश्वासघात वेदनादायक होता पण..." नवऱ्याच्या व्हायरल व्हिडीओवर अँडी बायरनच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया?
8
७ कोटी मुलांसाठी गुड न्यूज; आता शाळेतच होणार आधारशी निगडीत 'हे' काम, UIDAI ची विशेष सुविधा
9
गोरी दिसण्यासाठी काय नाही केलं, शेवटी देवाकडे नवस केला अन् मग...; 'झांसी की रानी' फेम अभिनेत्रीचा स्ट्रगल
10
कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली? डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर
11
इस्रायल थांबला, पण आता तुर्की सुरू झाला... सिरियामध्ये हाहा:कार, दमास्कसनंतर अलेप्पो 'लक्ष्य'
12
सत्तेची मस्ती, नेत्यांची फ्री स्टाईल कुस्ती! महायुतीतील तिन्ही पक्षांनी जनतेला दाखवला 'लाथा-बुक्क्यांचा सिनेमा'
13
"कृषिमंत्री कोकाटेंचा खुलासा अयोग्यच, एक-दोन वेळा दादांनीही...!"; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
14
ज्यूस प्यायला नाही म्हणून सांबारमध्ये विष; २ मुलांच्या आईला बॉयफ्रेंडने दिली भयंकर आयडिया अन्...
15
"अजून मारा पण कृषिमंत्र्यांचा राजीनामा घ्या"; मारहाणीनंतर विजयकुमार घाडगे संतप्त; म्हणाले, 'तटकरेंना एक शब्द वाकडा बोललो असेल तर...'
16
IND vs ENG : टीम इंडियातील हा स्टार खेळाडू मालिकेतून 'आउट'; चौथ्या कसोटी आधी आली संघ बदलण्याची वेळ
17
मुंबई विमानतळावर मोठा अपघात टळला! विमान धावपट्टीवरून घसरले, तिन्ही टायर फुटल्याने खळबळ
18
“माझा हक्क आहे, पण विरोधी पक्षनेता असूनही संसेदत बोलू दिले जात नाही”; राहुल गांधींचा आरोप
19
७/११तील सर्व दोषी निर्दोष, भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले, “CM फडणवीसांना...”
20
"स्मिता तळवलकर नाराज झाल्या आणि मी...", 'लक्ष्मी निवास' फेम तुषार दळवींनी सांगितला 'तो' किस्सा

मधु मंगेश कर्णिकांना लागलेला अफलातून शोध:

By admin | Updated: October 13, 2015 23:42 IST

भुकेलेलेच भ्रष्टाचारी असतात!

हेमंत कुलकर्णी, नाशिकदूरस्थ पद्धतीने मुंबई वा अन्यत्र बसून येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा कारभार चालविणारे या संस्थेचे तूर्तासचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या मते ‘प्रतिष्ठानचे विद्यमान विश्वस्त खाऊन पिऊन सुखी असल्यानेच गेल्या पंचवीस वर्षात संस्थेत एक पैशाचाही गैरव्यवहार झालेला नाही’! त्यांच्या या अजब शोधाचा हास्यास्पद श्लेष म्हणजे जे भुकेले असतात, तेच भ्रष्टाचारी असतात!सामान्यत: साहित्यिक हा एक अत्यंत संवेदनशील, सजग, डोळस आणि नीरक्षीरविवेकाचा धनी मानला जातो. कर्णिक यात मोडत असावेत अशी शंका घ्यायला पुरेपूर वाव आहे आणि ही शंका खरी असेल तर त्यांना समाजातील भुकेला आणि भरपेटला यातील नेमका कोणता वर्ग भ्रष्टाचाराने लिप्त असतो, हेही आकळायला काही हरकत नाही. पण खरा मुद्दा तो नाहीच. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या घटनेपासून तो पुरस्कार योजनेपर्यंतचा सारा तपशील वेळोवेळी दस्तुरखुद्द कुसुमाग्रज म्हणजे वि.वा. तथा तात्यासाहेब शिरवाडकर यांच्या हस्ताक्षरात तयार झालेला. त्यांनीच प्रतिष्ठानची जी घटना तयार केली त्या घटनेनुसार कोणताही विश्वस्त (खरे तर कार्यकारिणीचा सदस्य) कमाल दहा वर्षांपेक्षा अधिक काळ त्या पदावर राहू शकत नाही, त्याला निवृत्त व्हावेच लागते. आजपर्यंत तसेच होतही आले आहे. जो निवृत्तला त्याच्या जागी अन्य विश्वस्तांनी प्रतिष्ठानच्या सामान्य सदस्यांमधून रिक्त जागी भरावी वा भराव्यात अशीही तरतूद तात्यांनीच करुन ठेवलेली. (खरे तर हे कार्य समस्त सभासदांच्या आम सभेकडे पोचते व्हावयास हवे होते) ज्याअर्थी त्यांनी अत्यंत नि:संदिग्ध शब्दात अशी तरतूद केली त्याअर्थी त्यांचा त्यामागे काही निश्चितच हेतू असणार. नवीन लोकाना संधी दिली तर नव्या कल्पना येतील व प्रतिष्ठानच्या कामाला नवी उभारी येत जाईल, असाच काहीसा हेतू त्यामागे असू शकतो. ‘जुन्यांनी मन:पूत भ्रष्टाचार केला आता नव्यांना संधी देऊ’ असा हेतू खचितच नसणार आणि भ्रष्टाचार करायला आहेच काय तिथे? (असं लोकाना वाटतं. कर्णिकांकडे याबाबत अधिक ज्ञान असू शकते)आजवर पाळली गेलेली प्रथा मोडीत काढून घटनेतील सक्तीच्या निवृत्तीचे कलम रद्द करण्याचा म्हणजेच घटना दुरुस्ती करण्याचा एक संकल्प मधु मंगेश यांच्या पौरोहित्याखाली अलीकडेच सोडण्यात आला असून तो साहजिकच वादग्रस्त ठरला आहे. त्या वादावर बोलतानाच कर्णिकांनी ‘वेळोवेळी घटनेत गरजेनुसार दुरुस्ती व्हावी अशी तात्यांची भूमिका होती (हे तात्यांनी त्यांना कधी सांगितले बरे?) प्रतिष्ठान ही काही सोसायटी नव्हे. त्यामुळे संचालक तीन वर्षांनी बदलावेतच असे नव्हे. कामात सातत्य राहावे म्हणून विश्वस्तांच्या बैठकीत दुरुस्तीचा ठराव मंजूर केला गेला आहे व त्यात बेकायदेशीर असे काही नाही’, असे प्रबोधन करुन ‘ते’ ऐतिहासिक उद्गार काढले आहेत.मुळात कोणत्या विश्वस्तांनी ठराव मंजूर केला? निवृत्तीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्यांनीच ना? म्हणजे एकूण प्रकार साटेलोट्याचा. या प्रतिष्ठानचे आजचे दुर्दैव म्हणजे तात्यासाहेब हयात असताना, त्यांचा सहवास लाभलेले आणि त्यांच्या साहित्यावर जीवापाड प्रेम करणारे व एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेही लोक तिथे नाहीत. नाशिककरांनी, नाशिककरांसाठी व नाशिककरिता स्थापन केलेल्या प्रतिष्ठानच्या डोक्यावर बाहेरचा अध्यक्ष बसविण्याचा जो पायंडा खुद्द तात्यांनी सुरु केला तो आजतागायत तसाच सुरु आहे आणि मधु मंगेश त्याच मालिकेतील एक आहेत. त्यांनी सुखेनैव अध्यक्षपद उबवीत रहावे पण ताजमहालला कोण्या गणपा मिस्तरीनी वीट लावण्याचा प्रकार केल्यागत कुसुमाग्रजांनी जे निर्माण करुन ठेवले त्यात उगा मोडतोड न करता आहे ते तसेच अबाधित ठेवावे इतकीच तात्यांवर आजही प्रेम करणाऱ्या तमाम नाशिककरांची आंतरिक इच्छा आहे.