शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

माधवराव गायकवाड : संघर्षशील कॉम्रेड

By किरण अग्रवाल | Updated: November 14, 2018 14:06 IST

संघर्ष हाच ज्याच्या जीवनाचा स्थायिभाव बनून गेलेला असतो अशा व्यक्तिमत्त्वाला सुखासीनतेची कल्पनाच करवत नाही मुळी. त्यामुळे अशा व्यक्तींच्या आयुष्यात ...

संघर्ष हाच ज्याच्या जीवनाचा स्थायिभाव बनून गेलेला असतो अशा व्यक्तिमत्त्वाला सुखासीनतेची कल्पनाच करवत नाही मुळी. त्यामुळे अशा व्यक्तींच्या आयुष्यात खासगीपण काही उरतच नाही. त्याची त्यांना अभिलाषा अगर फिकीरही नसते, कारण आपला जन्म हा आपल्या स्वत:साठी नाही हे त्यांनीच स्वीकारलेले असते. त्यामुळेच ते व्यक्ती म्हणून नव्हे, तर संस्था बनून राहतात. परिणामी रूढ अर्थाने अंत हा शब्दही त्यांना लागू होत नाही. या पंथातली माणसे असतात कमी; पण ते इतिहासाचा दस्तऐवज ठरतात. समाजवादी पक्षाच्या मुशीत घडून मार्क्सवादाकडे वळलेल्या व शेतकरी-कामगारांसाठी सतत संघर्षशील राहिलेल्या माधवराव गायकवाड यांचे नावही याच पंथात मोडणारे आहे.राष्ट्र सेवा दलातून सार्वजनिक जीवनाची वाटचाल सुरू करून समाजवाद ते मार्क्सवाद असा सुमारे पाच ते सहा दशकांचा कृतिशील प्रवास केलेल्या कॉ. माधवराव यांचा एकूणच जीवनपट हा त्यांच्या लढवय्येपणाची साक्ष देणारा आहे. स्वातंत्र्यलढ्यापासून गोवा मुक्ती संग्राम व संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन यात सक्रिय राहिलेल्या माधवराव यांनी खंडकरी शेतकऱ्यांसाठी दिलेला लढा स्मरणात राहणारा आहे. साखर कारखान्यासाठी खंडाने घेतलेल्या शेतक-यांच्या जमिनी परत मिळाव्यात म्हणून लढला गेलेला हा तब्बल चाळीसेक वर्षाचा दीर्घकालीन लढा गिनीज बुकात नोंदविला गेला. विशेष म्हणजे, राज्यातील गेल्या सरकारच्या काळात कॉ. माधवराव गायकवाड यांच्याच उपस्थितीत तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण यांनी संबंधित खंडक-यांना सातबारा उताºयाचे वाटप केल्याने त्यांच्या लढ्याची फलश्रुती पाहावयास मिळाली.आचार्य अत्रे, एस. एम. जोशी, कॉ. श्रीपाद अमृतराव डांगे आदी प्रमुख नेत्यांसोबत काम केल्याने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साम्यवादी, ध्येयासक्त विचारांचा पैलू लाभून गेलेला होता, शिवाय क्रांतिसिंह नाना पाटील व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वात लढल्या गेलेल्या भूमी आंदोलनातही त्यांनी पुढाकार घेतलेला असल्याने लढावूपणा त्यांच्या नसानसात भिनला होता. रेल्वे कामगारांचे आंदोलन असो, की शेतकरी-श्रमजीवींचे; अनेक लढे माधवरावांनी नेटाने लढले व संबंधिताना न्याय मिळवून दिला. या लढ्यांमुळे तरुणपणापासूनच अनेकदा त्यांना कधी भूमिगत राहून काम करण्याची वेळ आली तर दरवर्षी कोणत्या न कोणत्या आंदोलनामुळे तुरुंगातही जावे लागले; परंतु त्याने त्यांची ध्येयनिष्ठा डगमगली नाही. त्यांनी हाती घेतलेली आंदोलने तडीस नेली.राज्यात ‘पुलोद’चा प्रयोग झाला तेव्हा १९८५ मध्ये माधवराव गायकवाड नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभेत निवडून गेले होते. तत्पूर्वी १९५८ ते ६३ मध्ये ते विधान परिषदेचे सदस्य होते. या दरम्यान विरोधी पक्ष नेतेपदही त्यांनी भूषविले. जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडून देण्याचा निर्णय राज्य शासनाने पहिल्यांदा घेतला होता, तेव्हा ते नांदगावचे नगराध्यक्ष म्हणूनही निवडून गेले होते. कोणताही विषय अभ्यास करून मांडणे हा त्यांचा स्वभाव होता. त्यामुळे एका अधिवेशनात, देशाला स्वातंत्र्य मिळून ४० वर्षे झाली तरी राज्यातील केवळ साडेबारा टक्केच शेतजमिनीला सरकार पाणी पुरवू शकले, या मुद्द्यावर झालेले त्यांचे भाषण त्याकाळी चर्चित ठरले होते. महसूल, अर्थ, शेती, सहकार, कायदा-सुव्यवस्था अशा अनेक विषयांवर चौफेर फटकेबाजी करीत त्यांनी विधिमंडळात भाकपाची मशाल तेवत ठेवली होती. पक्षाचे राज्याचे सेक्रेटरी म्हणून राज्यभर संघटन बांधणीतही त्यांनी झोकून देऊन काम केले, त्याच बळावर आज भाकप मजबुतीने उभा राहू पाहतो आहे. विचारांची दृढनिश्चयता व सातत्यपूर्ण संघर्षशीलता हाच कॉ. माधवराव गायकवाड यांचा जीवनधर्म होता. आजच्या राजकारण्यांत तेच दुर्मीळ झाले असल्याने माधवरावांचे जाणे मनाला चटका लावणारेच ठरले आहे.