शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

माधवराव गायकवाड : संघर्षशील कॉम्रेड

By किरण अग्रवाल | Updated: November 14, 2018 14:06 IST

संघर्ष हाच ज्याच्या जीवनाचा स्थायिभाव बनून गेलेला असतो अशा व्यक्तिमत्त्वाला सुखासीनतेची कल्पनाच करवत नाही मुळी. त्यामुळे अशा व्यक्तींच्या आयुष्यात ...

संघर्ष हाच ज्याच्या जीवनाचा स्थायिभाव बनून गेलेला असतो अशा व्यक्तिमत्त्वाला सुखासीनतेची कल्पनाच करवत नाही मुळी. त्यामुळे अशा व्यक्तींच्या आयुष्यात खासगीपण काही उरतच नाही. त्याची त्यांना अभिलाषा अगर फिकीरही नसते, कारण आपला जन्म हा आपल्या स्वत:साठी नाही हे त्यांनीच स्वीकारलेले असते. त्यामुळेच ते व्यक्ती म्हणून नव्हे, तर संस्था बनून राहतात. परिणामी रूढ अर्थाने अंत हा शब्दही त्यांना लागू होत नाही. या पंथातली माणसे असतात कमी; पण ते इतिहासाचा दस्तऐवज ठरतात. समाजवादी पक्षाच्या मुशीत घडून मार्क्सवादाकडे वळलेल्या व शेतकरी-कामगारांसाठी सतत संघर्षशील राहिलेल्या माधवराव गायकवाड यांचे नावही याच पंथात मोडणारे आहे.राष्ट्र सेवा दलातून सार्वजनिक जीवनाची वाटचाल सुरू करून समाजवाद ते मार्क्सवाद असा सुमारे पाच ते सहा दशकांचा कृतिशील प्रवास केलेल्या कॉ. माधवराव यांचा एकूणच जीवनपट हा त्यांच्या लढवय्येपणाची साक्ष देणारा आहे. स्वातंत्र्यलढ्यापासून गोवा मुक्ती संग्राम व संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन यात सक्रिय राहिलेल्या माधवराव यांनी खंडकरी शेतकऱ्यांसाठी दिलेला लढा स्मरणात राहणारा आहे. साखर कारखान्यासाठी खंडाने घेतलेल्या शेतक-यांच्या जमिनी परत मिळाव्यात म्हणून लढला गेलेला हा तब्बल चाळीसेक वर्षाचा दीर्घकालीन लढा गिनीज बुकात नोंदविला गेला. विशेष म्हणजे, राज्यातील गेल्या सरकारच्या काळात कॉ. माधवराव गायकवाड यांच्याच उपस्थितीत तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण यांनी संबंधित खंडक-यांना सातबारा उताºयाचे वाटप केल्याने त्यांच्या लढ्याची फलश्रुती पाहावयास मिळाली.आचार्य अत्रे, एस. एम. जोशी, कॉ. श्रीपाद अमृतराव डांगे आदी प्रमुख नेत्यांसोबत काम केल्याने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साम्यवादी, ध्येयासक्त विचारांचा पैलू लाभून गेलेला होता, शिवाय क्रांतिसिंह नाना पाटील व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वात लढल्या गेलेल्या भूमी आंदोलनातही त्यांनी पुढाकार घेतलेला असल्याने लढावूपणा त्यांच्या नसानसात भिनला होता. रेल्वे कामगारांचे आंदोलन असो, की शेतकरी-श्रमजीवींचे; अनेक लढे माधवरावांनी नेटाने लढले व संबंधिताना न्याय मिळवून दिला. या लढ्यांमुळे तरुणपणापासूनच अनेकदा त्यांना कधी भूमिगत राहून काम करण्याची वेळ आली तर दरवर्षी कोणत्या न कोणत्या आंदोलनामुळे तुरुंगातही जावे लागले; परंतु त्याने त्यांची ध्येयनिष्ठा डगमगली नाही. त्यांनी हाती घेतलेली आंदोलने तडीस नेली.राज्यात ‘पुलोद’चा प्रयोग झाला तेव्हा १९८५ मध्ये माधवराव गायकवाड नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभेत निवडून गेले होते. तत्पूर्वी १९५८ ते ६३ मध्ये ते विधान परिषदेचे सदस्य होते. या दरम्यान विरोधी पक्ष नेतेपदही त्यांनी भूषविले. जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडून देण्याचा निर्णय राज्य शासनाने पहिल्यांदा घेतला होता, तेव्हा ते नांदगावचे नगराध्यक्ष म्हणूनही निवडून गेले होते. कोणताही विषय अभ्यास करून मांडणे हा त्यांचा स्वभाव होता. त्यामुळे एका अधिवेशनात, देशाला स्वातंत्र्य मिळून ४० वर्षे झाली तरी राज्यातील केवळ साडेबारा टक्केच शेतजमिनीला सरकार पाणी पुरवू शकले, या मुद्द्यावर झालेले त्यांचे भाषण त्याकाळी चर्चित ठरले होते. महसूल, अर्थ, शेती, सहकार, कायदा-सुव्यवस्था अशा अनेक विषयांवर चौफेर फटकेबाजी करीत त्यांनी विधिमंडळात भाकपाची मशाल तेवत ठेवली होती. पक्षाचे राज्याचे सेक्रेटरी म्हणून राज्यभर संघटन बांधणीतही त्यांनी झोकून देऊन काम केले, त्याच बळावर आज भाकप मजबुतीने उभा राहू पाहतो आहे. विचारांची दृढनिश्चयता व सातत्यपूर्ण संघर्षशीलता हाच कॉ. माधवराव गायकवाड यांचा जीवनधर्म होता. आजच्या राजकारण्यांत तेच दुर्मीळ झाले असल्याने माधवरावांचे जाणे मनाला चटका लावणारेच ठरले आहे.