शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

अत्यल्प पाणीपुरवठा

By admin | Updated: February 22, 2017 23:16 IST

इंदिरानगर : उन्हाळ्याच्या प्रारंभीच टंचाई

इंदिरानगर : परिसरात अत्यंत कमी दाबाने आणि कमी वेळ पाणीपुरवठा होत असल्याने उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गंगापूर धरणात मुबलक जलसाठा असतानाही पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशुन्य कारभारामुळे कृत्रिम पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.गेल्या दहा दिवसांपासून पाटील गार्डन, देवेंद्र सोसायटी, महारुद्र कॉलनी, जिल्हा परिषद कॉलनी, अरुणोदय सोसायटी, देवदत्त सोसायटी, मानस कॉलनी, मोदकेश्वर सोसायटीसह परिसरात अत्यंत कमी दाबाने आणि कमी वेळ पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे जेमतेम पिण्याचे पाणीसुद्धा येत नाही. वापराचे पाणीसुद्धा अन्य ठिकाणाहून घ्यावे लागत आहे. आताच उन्हाळ्याची चाहूल लागली आहे तर पाण्याची अशी परिस्थिती राहिल्यास पुढे चार महिने काय परिस्थिती राहील, असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.धरणात जलसाठा मुबलक असतानाही परिसरातील जलकुंभ भरले जात नाही. त्यामुळे पाणीपुरवठा होत नाही असे उत्तर पाणीपुरवठा अधिकाऱ्यांचे नेहमीचे असल्याने नागरिकांनी तक्रार केली आहे. येत्या दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास नागरिक जनआंदोलन छेडणार आहे.