शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
3
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
4
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
5
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
6
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
7
भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
8
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
9
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
10
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
11
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
12
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
13
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
14
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
15
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
16
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!
17
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

अत्यल्प पाणीपुरवठा

By admin | Updated: February 22, 2017 23:16 IST

इंदिरानगर : उन्हाळ्याच्या प्रारंभीच टंचाई

इंदिरानगर : परिसरात अत्यंत कमी दाबाने आणि कमी वेळ पाणीपुरवठा होत असल्याने उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गंगापूर धरणात मुबलक जलसाठा असतानाही पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशुन्य कारभारामुळे कृत्रिम पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.गेल्या दहा दिवसांपासून पाटील गार्डन, देवेंद्र सोसायटी, महारुद्र कॉलनी, जिल्हा परिषद कॉलनी, अरुणोदय सोसायटी, देवदत्त सोसायटी, मानस कॉलनी, मोदकेश्वर सोसायटीसह परिसरात अत्यंत कमी दाबाने आणि कमी वेळ पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे जेमतेम पिण्याचे पाणीसुद्धा येत नाही. वापराचे पाणीसुद्धा अन्य ठिकाणाहून घ्यावे लागत आहे. आताच उन्हाळ्याची चाहूल लागली आहे तर पाण्याची अशी परिस्थिती राहिल्यास पुढे चार महिने काय परिस्थिती राहील, असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.धरणात जलसाठा मुबलक असतानाही परिसरातील जलकुंभ भरले जात नाही. त्यामुळे पाणीपुरवठा होत नाही असे उत्तर पाणीपुरवठा अधिकाऱ्यांचे नेहमीचे असल्याने नागरिकांनी तक्रार केली आहे. येत्या दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास नागरिक जनआंदोलन छेडणार आहे.