शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
3
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
4
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
5
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
6
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
7
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
9
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
10
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
11
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
12
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
13
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
14
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
15
Lalbaugcha Raja 2025 First Look: 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
16
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
17
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
18
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
20
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

कमी पाण्यात फुलवली डाळींबबाग

By admin | Updated: August 21, 2014 00:16 IST

कमी पाण्यात फुलवली डाळींबबाग

येवला : गेल्या२१ वर्षांपासून निसर्गाने साथ न दिल्याने अल्पपर्जन्यमान असले तरी कमी पाण्यात डाळिंबाची बाग फुलवून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अनुकूलता साधली. कमी पाणी असूनसुद्धा शेतीत नवनवीन प्रयोग केले म्हणूनच सुखी जीवन जगत असल्याची प्रतिक्रिया उद्यानपंडित पुरस्कार प्राप्त नेवरगाव, ता. येवला येथील शेतकरी सुरेश काशीनाथ कदम यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केली. कदम यांनी फलोत्पादन शेतीत भरीव कार्य केल्यामुळे महाराष्ट्र राज्य शासनाने त्यांना उद्यानपंडित पुरस्कार देऊन नुकतेच नाशिक येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरविले. उत्तर महाराष्ट्रातून त्यांची एकमेव निवड झाली. स्वत:च्या दोन हेक्टर क्षेत्रात ‘गणेश १३७’ या जातीचे डाळिंबाची रोपे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून आणली व कमी पाण्यात डाळिंबाची बाग फुलवली. कांदा, फळपिके या सगळ्यांसाठी ठिबक सिंचनाचा वापर करून मोठे उत्पन्न घेतले. पिके काढल्यानंतर फळांची प्रतवारी केली. त्यामुळे चांगला बाजारभाव मिळाला. सेंद्रिय व रासायनिक खतांचा समतोल वापर केला, गांडूळखत, हिरवळीचे खत, बायोडायनामिक कंपोस्ट, जैविक खते व बुरशीनाशकांचाही वापर केल्यामुळे जमिनीचा पोत चांगला राहून भरघोस उत्पन्न मिळाल्याचे कदम यांनी सांगितले. पारंपरिक शेतीला फाटा देऊन नवीन तंत्रज्ञान वापरून बाग फुलविली. मिरची, टमाटे, वांगी यांसह झेंडूची लागवड करून कमवलेल्या पैशामध्ये मुलांच्या शिक्षणाचा मार्ग खुला केला. शेतीव्यवसायात खचून न जाता व आत्महत्त्येचा पळकु टा मार्ग न स्वीकारता कमी पाण्यातही शेती फुलवून सुखी जीवन जगू शकतो. हा आदर्शपाठ कदम यांनी घालून दिल्यामुळे परिसरात अनेक शेतकरी त्यांचे मार्गदर्शन घेऊन शेती करतात.कमी पाऊस पडतो म्हणून निसर्गाला दोष देत बसण्यापेक्षा प्रयोगशीलतेतून शेती करावी, असा सल्लाही शेतकऱ्यांना सुरेश कदम यांनी दिला आहे.(वार्ताहर)