शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप घृणास्पद, मी आता सहन करू शकत नाही"; ट्रम्प यांच्या निर्णयावर इलॉन मस्क संतापले
2
काळाचा घाला! लग्नावरुन परतणाऱ्या व्हॅनवर सिमेंटने भरलेला ट्रक उलटला, ९ जणांचा मृत्यू
3
१२ वर्षांनी गुरु-रवि युती, ७ राशींची ३० दिवस चांदीच चांदी; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-लाभ!
4
अमेरिका-चीनचं भांडण भारताच्या उंबरठ्यापर्यंत; जपान-जर्मनीही त्रस्त, कंपन्यांना टाळं ठोकण्याची वेळ
5
Share Market Today: ३ दिवसांनंतर शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; सेन्सेक्स १२१ अंकांनी वधारला, या स्टॉक्समध्ये तेजी
6
Sana Yousaf : "फ्रेंडशिप, रिजेक्शन आणि मर्डर कनेक्शन"; पाकिस्तानी टिकटॉकर सना युसूफची का झाली हत्या?
7
घणसोली बस आगारात अग्नितांडव; नवी मुंबई पालिकेच्या तीन बस जळून खाक, आगीचे कारण अस्पष्ट
8
"आई, हे मला जंगलात..."; हनिमूनला बेपत्ता झालेल्या कपलचा शेवटचा कॉल, सासूला काय सांगितलं?
9
कोण आहे देशातील सर्वात महागडं घर खरेदी करणारी महिला? ६३९ कोटी किंमत; ६४ कोटींची स्टँप ड्युटीच भरली
10
नात्याला काळीमा! हुंड्यासाठी पती झाला हैवान; AC न मिळाल्याने पत्नीला दिला ट्रिपल तलाक
11
आजचे राशीभविष्य: ०४ जून २०२५; जलाशया पासून दूर राहा, घरातील सर्वांचे सहकार्य मिळेल
12
"१८ वर्षांनंतर स्वप्न पूर्ण झाले"; RCB च्या विजयावर मल्ल्या म्हणाला, "माझी इच्छा पूर्ण करणाऱ्या..."
13
Ashok Saraf Birthday: अशोक सराफ यांना 'मामा' का म्हणतात? म्हणाले होते- "एकदा सिनेमाचं शूटिंग करताना..."
14
आर्टिफिशल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग या क्षेत्रामध्ये वरिष्ठ पदांवर अनुभवी कर्मचाऱ्यांना मागणी
15
नवा नियम! आता मतदार झालात तरीही स्थानिक स्वराज्य संस्थेत नसेल मतदानाचा हक्क!
16
महापूर, भूकंप, वादळापासून स्वत:चं घर वाचवायचंय? 'प्रॉपर्टी इन्शुरन्स' हाच सर्वोत्तम फॉर्म्युला
17
पाकिस्तानचे नवे रडगाणे; म्हणे- भारताने जास्त हल्ले केले अन् दाखवताना कमी दाखवले
18
पूर्ण वेळ देणाऱ्याला महिला आयोगाची धुरा द्या; मविआ महिला नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट
19
म्हाडाच्या अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना २० हजार भाडे देण्याचा निर्णय
20
हॉटेल व्यावसायिकाला गंडा; ED कडून मध्य प्रदेशातील भाजप आमदाराचा मेहूणा अखेर अटकेत

कमी पाण्यात फुलवली डाळींबबाग

By admin | Updated: August 21, 2014 00:16 IST

कमी पाण्यात फुलवली डाळींबबाग

येवला : गेल्या२१ वर्षांपासून निसर्गाने साथ न दिल्याने अल्पपर्जन्यमान असले तरी कमी पाण्यात डाळिंबाची बाग फुलवून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अनुकूलता साधली. कमी पाणी असूनसुद्धा शेतीत नवनवीन प्रयोग केले म्हणूनच सुखी जीवन जगत असल्याची प्रतिक्रिया उद्यानपंडित पुरस्कार प्राप्त नेवरगाव, ता. येवला येथील शेतकरी सुरेश काशीनाथ कदम यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केली. कदम यांनी फलोत्पादन शेतीत भरीव कार्य केल्यामुळे महाराष्ट्र राज्य शासनाने त्यांना उद्यानपंडित पुरस्कार देऊन नुकतेच नाशिक येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरविले. उत्तर महाराष्ट्रातून त्यांची एकमेव निवड झाली. स्वत:च्या दोन हेक्टर क्षेत्रात ‘गणेश १३७’ या जातीचे डाळिंबाची रोपे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून आणली व कमी पाण्यात डाळिंबाची बाग फुलवली. कांदा, फळपिके या सगळ्यांसाठी ठिबक सिंचनाचा वापर करून मोठे उत्पन्न घेतले. पिके काढल्यानंतर फळांची प्रतवारी केली. त्यामुळे चांगला बाजारभाव मिळाला. सेंद्रिय व रासायनिक खतांचा समतोल वापर केला, गांडूळखत, हिरवळीचे खत, बायोडायनामिक कंपोस्ट, जैविक खते व बुरशीनाशकांचाही वापर केल्यामुळे जमिनीचा पोत चांगला राहून भरघोस उत्पन्न मिळाल्याचे कदम यांनी सांगितले. पारंपरिक शेतीला फाटा देऊन नवीन तंत्रज्ञान वापरून बाग फुलविली. मिरची, टमाटे, वांगी यांसह झेंडूची लागवड करून कमवलेल्या पैशामध्ये मुलांच्या शिक्षणाचा मार्ग खुला केला. शेतीव्यवसायात खचून न जाता व आत्महत्त्येचा पळकु टा मार्ग न स्वीकारता कमी पाण्यातही शेती फुलवून सुखी जीवन जगू शकतो. हा आदर्शपाठ कदम यांनी घालून दिल्यामुळे परिसरात अनेक शेतकरी त्यांचे मार्गदर्शन घेऊन शेती करतात.कमी पाऊस पडतो म्हणून निसर्गाला दोष देत बसण्यापेक्षा प्रयोगशीलतेतून शेती करावी, असा सल्लाही शेतकऱ्यांना सुरेश कदम यांनी दिला आहे.(वार्ताहर)