शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

यंदा भरपूर पाऊस; कोरोनानंतर आता जिल्ह्यात पुराची धास्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:17 IST

नाशिक : नैऋृत्य मोसमी वाऱ्यांच्या अरबी समुद्रातील शाखेने वेगाने मुसंडी मारली आहे. वेळेपूर्वीच यंदा महाराष्ट्रात मान्सून सरींचे आगमन झाले ...

नाशिक : नैऋृत्य मोसमी वाऱ्यांच्या अरबी समुद्रातील शाखेने वेगाने मुसंडी मारली आहे. वेळेपूर्वीच यंदा महाराष्ट्रात मान्सून सरींचे आगमन झाले आहे. यंदा राज्यात सर्वदूर भरपूर पाऊस पडणार असल्याने जिल्ह्यांना आतापासूनच पावसाळापूर्व बळकट तयारी करावी लागणार आहे. कोरोनानंतर आता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व मनपा आपत्ती विभागापुढे पूरनियंत्रणाचे आव्हान उभे राहणार आहे.

नाशिक जिल्ह्यात गेल्या वर्षी १ हजार ४२५ मिमीपर्यंत पाऊस पडला होता. पर्जन्यमानाची टक्केवारी सरासरी ९५.५ इतकी राहिली होती. भारतीय वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार यावर्षी यापेक्षाही अधिक पाऊस जिल्ह्यात होण्याची शक्यता आहे. शहरासह जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक राहते. शहरासह जिल्ह्याची प्रमुख नदी गोदावरी असून गोदावरीच्या पूरनियंत्रण रेषेला लागून नागरिकांनी घरे बांधलेली आहे. त्र्यंबकेश्वरपासून तर थेट नाशिक जिल्ह्याच्या वेशीपर्यंत अशीच अवस्था आहे. जिल्ह्यातील पाच तालुके पूरबाधित असून यामध्ये निफाड, बागलाण, कळवण, दिंडोरी, नाशिक या ताुलक्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून सर्वेक्षण करून सुमारे ६४ धोकादायक पावस्थळी ‘ब्लॅक स्पॉट’ निश्चित करण्यात आले आहे. दरवर्षी गंगापूर धरणातून विसर्ग करण्यात आल्यानंतर गोदावरी नदीला पूरस्थिती निर्माण होते. गोदाकाठालगतच्या पंचवटी, गंगापूर रोड, जुने नाशिकचा परिसर बाधित होतो. मनपा अग्निशमन विभागाकडे रबरी बोटींची संख्या केवळ बोटावर मोजण्याइतकीच आहे.

---इन्फो---

पूरबाधित क्षेत्रावर विशेष लक्ष

जिल्ह्यातील पाच तालुके पूरबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत. या भागात निर्माण होणाऱ्या पूरपरिस्थतीचा सामना करण्याकरिता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज झाली आहे. १९ रेस्क्यू बोटींसह ५० जीवरक्षक व स्वयंसेवकांचे दल सतर्क असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात २४ तास पूरनियंत्रण कक्ष व हेल्पलाइन कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाला ‘ॲलर्ट’वर राहण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

----पॉइंटर्स---

जिल्ह्यात सरासरी पर्जन्यमान १,४२५ मिमी

जिल्ह्यातील नद्या- ८

नदीशेजारील गावे- ८९

पूरबाधित होणारे तालुके-५

----चौकट---

जिल्हा - मनपा प्रशासनाची काय तयारी?

फायरमन-

पेट्रोल कटर-

लाइफ जॅकेट-

वॉटर पंप-

रेस्क्यू बोट- १९

जीवरक्षक- ५०

रबर बोटी- ९

गिर्यारोहक टीम- २०

---इन्फो--

अग्निशमन दल सज्ज

मनपा अग्निशमन दलाची सज्जता पूरनियंत्रणासाठी आहे. आवश्यक साधनसामग्री जरी या दलाकडे असली तरी मनुष्यबळ मात्र तसे अपुरेच आहे. राजीव गांधी भवन येथे २४ आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरू (२५७१८७२/ २२२२४१३ ) प्रत्येक विभागनिहाय सहा कक्ष आहेत. मुख्य कक्षाद्वारे या कक्षांसह उद्यान, सार्वजनिक, विद्युत, भूमिगत गटार आदी विभागांशी समन्वय साधला जाणार आहे.

---इन्फो--

शहरातील धोकादायक इमारती

शहरात १ हजार २८७ धोकादायक मिळकती असून यामध्ये १ हजार २८७ इमारती धोकादायक स्थितीतील आहेत. धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांची संंख्या सुमारे ५ हजार इतकी आहेत. एकट्या काझी गढी या धोकादायक ठिकाणी अडीच हजार लोकांची वस्ती आहे.

शहरातील धोकादायक स्थितीतील झाडांची संख्याही मोठी आहे. बहुतांश झाडांच्या फांद्यांची छाटणी अशास्त्रीय पध्दतीने महावितरणच्या ठेकेदाराकडून करण्यात आल्याने अनेक डेरेदार झाडे धोकादायक बनली आहेत. याकडे मात्र मनपाचे उद्यान विभाग व वृक्ष प्राधिकरण समितीकडून कानाडोळा केला जात आहे. यामुळे वादळी पावसात झाडे कोसळण्याच्या घटना या सातत्याने शहरातील सहाही विभागांमध्ये घडत असतात. धोकादायक झाडे काढून घेण्याबाबत किंवा अन्य कुठल्याही उपाययोजनांबाबत ठोस निर्णय घेतला जात नाही.

----कोट---

मान्सून दाखल झाला असून आपत्ती व्यवस्थापन विभागाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. रेस्क्यू ऑपरेशनसाठी बोटी, मदतकार्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ, स्थानिक शोध व बचाव पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. आठवडाभरापासून २४ तास जिल्हाधिकारी कार्यालयात मदत व नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.

- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

---

फोटो आर वर :०८ मान्सून नावाने सेव्ह.

===Photopath===

080621\08nsk_9_08062021_13.jpg

===Caption===

मान्सुन दाखल....