शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक ग्राहक न्यायालयाच्या परिक्रमा खंडपीठाच्या जागेस जिल्हाधिकाऱ्यांचा खो

By विजय मोरे | Updated: December 24, 2018 23:23 IST

नाशिक : नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचाने दिलेल्या निकालाविरोधात अपिलासाठी मुंबईला जावे लागू नये यासाठी नाशिकला परिक्रमा खंडपीठ (सर्किट बेंच) मंजूर करण्यात आले़ मात्र या खंडपीठातील न्यायाधीशांना कामकाज करण्यासाठी जागा व कर्मचारी नसल्याने गत चार महिन्यांपासून अपिलातील दाव्यांचे कामकाजच झालेले नसून पक्षकारांना पुन्हा मुंबईच्या चकरा माराव्या लागत आहेत़ दरम्यान, राज्य ग्राहक आयोगाने ग्राहक न्याय मंचसमोरील नागरी संरक्षण दलाची जागा खंडपीठाच्या कामासाठी देण्याबाबत सूचविले असून, यावर जिल्हाधिकाºयांनी नकार देऊन खो घातल्याचे वृत्त आहे़

ठळक मुद्देकेवळ कागदी सोपस्कार ; पक्षकारांची गैरसोयजागेअभावी सप्टेंबरपासून खंडपीठाचे काम बंद

नाशिक : नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचाने दिलेल्या निकालाविरोधात अपिलासाठी मुंबईला जावे लागू नये यासाठी नाशिकला परिक्रमा खंडपीठ (सर्किट बेंच) मंजूर करण्यात आले़ मात्र या खंडपीठातील न्यायाधीशांना कामकाज करण्यासाठी जागा व कर्मचारी नसल्याने गत चार महिन्यांपासून अपिलातील दाव्यांचे कामकाजच झालेले नसून पक्षकारांना पुन्हा मुंबईच्या चकरा माराव्या लागत आहेत़ दरम्यान, राज्य ग्राहक आयोगाने ग्राहक न्याय मंचसमोरील नागरी संरक्षण दलाची जागा खंडपीठाच्या कामासाठी देण्याबाबत सूचविले असून, यावर जिल्हाधिका-यांनी नकार देऊन खो घातल्याचे वृत्त आहे़

अपिलीय न्यायालय असलेल्या परिक्रमा खंडपीठात आजमितीस चार जिल्ह्यांतील सुमारे पाच हजार दावे प्रलंबित असून प्रत्येक वर्षी एक हजार दावे नव्याने दाखल केले जातात़ परिक्रमा खंडपीठासाठी नियुक्त केलेल्या न्यायाधीशांनी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अपिलीय कामकाज करावे, असे राज्य ग्राहक आयोगाचे म्हणणे आहे़ मात्र, त्यासाठी जागा वा कर्मचारी वर्ग दिला जात नसून सद्यस्थितीतील ठिकाणीच हे कामकाज करावे लागते आहे़ मात्र परिक्रमा खंडपीठाचे काम सुरू असेल तर जागेअभावी जिल्हा न्याय मंचचे काम बंद करावे लागते़ विशेष म्हणजे जागेअभावी सप्टेंबरपासून खंडपीठाचे काम बंद असून, जानेवारीपर्यंत ते बंद ठेवण्यात आले आहे़

जिल्हाधिकारी आवारातील जिल्हा न्याय मंच समोरील नागरी संरक्षण दलाच्या कार्यालयासाठी अचानक चौकात जागा देण्यात आली असून, ते त्या ठिकाणी हलविण्यात आले आहे़ त्यामुळे ही रिकामी झालेली जागा ग्राहक न्यायालयाच्या परिक्रमा खंडपीठास कामकाजासाठी मिळावी, असा अहवाल उच्च न्यायालयाच्या इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीने राज्य शासनास दिला आहे़ त्यानुसार राज्य शासनाने जिल्हाधिकाºयांना जागेबाबत निर्णय घेण्याचे आदेश दिले असता त्यांनी जागा देण्यास नकार कळविला आहे़ यामुळे परिक्रमा खंडपीठात अपील केलेल्या चारही जिल्ह्यांतील पक्षकारांना मुंबईच्या चकरा माराव्या लागत असून, पैसा व वेळ यांचा अपव्यय होत आहे़केवळ कागदी सोपस्कारजिल्हा न्याय मंचमध्ये परिक्रमा खंडपीठाचे कामकाम चालत असून, आजमितीस चार जिल्ह्यांतील सुमारे चार हजार अपिले प्रलंबित आहेत़ राज्य शासनाने नाशिकला परिक्रमा खंडपीठ दिले मात्र जागा व कर्मचारी वर्ग न देता केवळ कागदी सोपस्कार पार पाडले आहेत़ त्यामुळे पक्षकारांना वेळ व पैसा खर्च करून मुंबईला जावे लागते़ नागरी संरक्षण दलाची जागा मिळाल्यास या ठिकाणी कामकाज चालेल व प्रलंबित दाव्यांची संख्या कमी होऊन पक्षकारांना कमी खर्चात न्याय मिळेल़ मात्र, ही जागा देण्यास जिल्हाधिका-यांनी नकार दिल्याने पक्षकारांची गैरसोय होत आहे़- अ‍ॅड़ विद्येश नाशिककर, ग्राहक न्यायालय, नाशिकनागरी संरक्षण दलाची जागाराज्य ग्राहक आयोगाच्या परिक्रमा खंडपीठासाठी नागरी संरक्षण दलाची जागा मिळावी, अशी मागणी आम्ही केली आहे़ उच्च न्यायालयाच्या इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीने याबाबतचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविला असून शासनाने तसा पत्रव्यवहारही नाशिकच्या जिल्हाधिका-यांकडे केला आहे़ नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या चार जिल्ह्यातील ग्राहकांचा वेळ व पैसा यांचा अपव्यय टाळण्यासाठी व ग्राहकांच्या हिताचा विचार करून जिल्हाधिका-यांनी या जागेबाबत सकारात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे़ ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यासमोर हा जागेचा प्रश्न मांडला आहे़- मिलिंद सोनवणे, अध्यक्ष, जिल्हा न्याय मंच, नाशिक

टॅग्स :Courtन्यायालयNashikनाशिकconsumerग्राहक