शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

आठवडे बाजार लिलाव स्थगित झाल्याने नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 00:13 IST

सिन्नर : ग्रामीण भागात गावोगावी भरवण्यात येणाऱ्या आठवडे बाजारांच्या करवसुली लिलावाची प्रक्रिया लॉकडाउनमुळे स्थगित करण्यात आली असल्याने ग्रामपंचायतींना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. गेल्या वर्षी लिलाव घेतलेल्या बोलीधारकांनादेखील आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्दे लिलाव घेतलेल्या बोलीधारकांनादेखील आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

सिन्नर : ग्रामीण भागात गावोगावी भरवण्यात येणाऱ्या आठवडे बाजारांच्या करवसुली लिलावाची प्रक्रिया लॉकडाउनमुळे स्थगित करण्यात आली असल्याने ग्रामपंचायतींना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. गेल्या वर्षी लिलाव घेतलेल्या बोलीधारकांनादेखील आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.एप्रिल ते मार्च या कालावधीसाठी आठवडे बाजार कर वसुलीसाठी लिलावप्रक्रिया राबवण्यात येते. यात बोली लावून अधिक पुकारा करणाºयास वर्षभरासाठी करवसुलीचा ठेका देण्यात येतो. लिलावातून मिळणारी रक्कम गावाच्या विकासासाठी वापरण्यात येते. यंदा कोरोनामुळे ही लिलावप्रक्रिया मे उलटला तरी राबवणे शक्य नाही. त्यामुळे ग्रामपंचायतींना हक्काच्या उत्पन्नावर पाणी सोडण्याची वेळ आली आहे. त्यात आठवडे बाजार भरत नसल्याने गेल्या वर्षीचा लिलाव घेणाऱ्यांना शेवटच्या तीन चार बाजारांवर पाणी सोडावे लागले आहे. तर नव्याने लिलाव घेणाºयास लॉकडाउन उठल्यानंतरच बाजार करवसुली करता येणार आहे. असे असले तरी पुढील काळात लिलावापोटी भरलेले पैसे वसूल होणार कसे, असा प्रश्न संबंधितांना भेडसावतो आहे. बाजार कर लिलावातून ग्रामपंचायतीस एक लाख ते पाच लाखापर्यंत उत्पन्न मिळते. मोठ्या ग्रामपंचायती अधिक उत्पन्न बाजार करवसुली लिलवातून मिळवतात. तालुक्यातील वावी, ठाणगाव, पांढुर्ली, नायगाव, नांदूरशिंगोटे पाथरे, शहा, पंचाळे, सोमठाणे, वडांगळी या गावांमध्ये आठवड्यातून एक दिवस भरणारा बाजार जिल्हाधिकाºयांच्या आदेशान्वये बंद करण्यात आलेले आहेत. त्यामुळे अनेक ठेकेदाराचे वर्षातील लिलावाफुटीची रक्कम आगाऊ भरल्याने नुकसान झाले आहे. तसेच बाजारामध्ये वस्तू विकणाºया व्यावसायिकांनादेखील आर्थिक फटका बसला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीMarketबाजार