शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
4
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
5
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
6
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
7
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
8
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
9
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
10
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
11
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
12
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
13
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
14
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
15
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
16
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
17
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
18
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
19
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
20
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर

आठवडे बाजार लिलाव स्थगित झाल्याने नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 00:13 IST

सिन्नर : ग्रामीण भागात गावोगावी भरवण्यात येणाऱ्या आठवडे बाजारांच्या करवसुली लिलावाची प्रक्रिया लॉकडाउनमुळे स्थगित करण्यात आली असल्याने ग्रामपंचायतींना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. गेल्या वर्षी लिलाव घेतलेल्या बोलीधारकांनादेखील आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्दे लिलाव घेतलेल्या बोलीधारकांनादेखील आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

सिन्नर : ग्रामीण भागात गावोगावी भरवण्यात येणाऱ्या आठवडे बाजारांच्या करवसुली लिलावाची प्रक्रिया लॉकडाउनमुळे स्थगित करण्यात आली असल्याने ग्रामपंचायतींना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. गेल्या वर्षी लिलाव घेतलेल्या बोलीधारकांनादेखील आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.एप्रिल ते मार्च या कालावधीसाठी आठवडे बाजार कर वसुलीसाठी लिलावप्रक्रिया राबवण्यात येते. यात बोली लावून अधिक पुकारा करणाºयास वर्षभरासाठी करवसुलीचा ठेका देण्यात येतो. लिलावातून मिळणारी रक्कम गावाच्या विकासासाठी वापरण्यात येते. यंदा कोरोनामुळे ही लिलावप्रक्रिया मे उलटला तरी राबवणे शक्य नाही. त्यामुळे ग्रामपंचायतींना हक्काच्या उत्पन्नावर पाणी सोडण्याची वेळ आली आहे. त्यात आठवडे बाजार भरत नसल्याने गेल्या वर्षीचा लिलाव घेणाऱ्यांना शेवटच्या तीन चार बाजारांवर पाणी सोडावे लागले आहे. तर नव्याने लिलाव घेणाºयास लॉकडाउन उठल्यानंतरच बाजार करवसुली करता येणार आहे. असे असले तरी पुढील काळात लिलावापोटी भरलेले पैसे वसूल होणार कसे, असा प्रश्न संबंधितांना भेडसावतो आहे. बाजार कर लिलावातून ग्रामपंचायतीस एक लाख ते पाच लाखापर्यंत उत्पन्न मिळते. मोठ्या ग्रामपंचायती अधिक उत्पन्न बाजार करवसुली लिलवातून मिळवतात. तालुक्यातील वावी, ठाणगाव, पांढुर्ली, नायगाव, नांदूरशिंगोटे पाथरे, शहा, पंचाळे, सोमठाणे, वडांगळी या गावांमध्ये आठवड्यातून एक दिवस भरणारा बाजार जिल्हाधिकाºयांच्या आदेशान्वये बंद करण्यात आलेले आहेत. त्यामुळे अनेक ठेकेदाराचे वर्षातील लिलावाफुटीची रक्कम आगाऊ भरल्याने नुकसान झाले आहे. तसेच बाजारामध्ये वस्तू विकणाºया व्यावसायिकांनादेखील आर्थिक फटका बसला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीMarketबाजार