शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बियाणे विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 01:35 IST

जिल्ह्यात शेतकऱ्यांची खरीप पेरणीची लगबग सुरू असताना, बियाणे विक्रेत्यांकडून मात्र वाढीव किमती लावून शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. एकाच कंपनीच्या बियाण्यांची दोन दुकानांमध्ये वेगवेगळी किमत सांगितली जात असल्याने, शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाचे दुर्लक्ष : शेतकऱ्यांमध्ये संताप

नाशिक : जिल्ह्यात शेतकऱ्यांची खरीप पेरणीची लगबग सुरू असताना, बियाणे विक्रेत्यांकडून मात्र वाढीव किमती लावून शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. एकाच कंपनीच्या बियाण्यांची दोन दुकानांमध्ये वेगवेगळी किमत सांगितली जात असल्याने, शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. मोठ्या बाजारपेठेपेक्षाही गावपातळीवरील दुकानदार तर मनमानी पद्धतीने दर आकारत असल्याचे दिसून येत आहे. कृषी विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने, सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील बहुसंख्य तालुक्यांमध्ये शेतकरी मक्याची लागवड करतात. वेगवेगळ्या कंपन्यांचे मका बियाणे बाजारात उपलब्ध आहे. यातील एका कंपनीच्या बियाण्याला विशेष पसंती दिली जात आहे. सुरुवातीच्या काळात या बियाण्यांच्या एका पाकिटाची किंमत १,२०० रुपयांपर्यंत होती. मागणी वाढताच, विक्रेत्यांनी पाकिटाच्या किमतीमागे ५० रुपयांनी वाढ केली. गावपातळीवरील विक्रेते तर थेट १,४०० रुपये आकारतात, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. एकाच कंपनीच्या बियाण्याची वेगवेगळी किंमत कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

कृत्रीम टंचाई

ज्या बियाण्याला मागणी आहे, त्याची विक्रेत्यांकडून कृत्रिम टंचाई निर्माण करून, शेतकऱ्यांकडून मनमानी पद्धतीने दर आकारणी केली जात असल्याचे प्रकारही जिल्ह्यात घडत आहेत. निफाड तालुक्यातील विंचुर येथील एका विक्रेत्याकडे या बियाण्याची चौकशी केली असता, त्याने सुरुवातीला त्या बियाण्याचे शॉर्टेज असल्याचे सांगितले. किती बॅग हव्या आहेत, याची चौकशी करून त्याने एका पाकिटाची किंमत १,२८० रुपये सांगितली. त्याच वेळी एका शेतकऱ्याला तेच बियाणे १,२९० रुपयांना विकले. हेच बियाणे शेजारच्या दुकानात विचारले, तर त्याने १,२५० रुपयांना दिले . गावपातळीवरून हेच बियाणे खरेदी केलेल्या शेतकऱ्याकडे चौकशी केली असता, त्याला त्याच बियाण्याची किमत १,४०० रु. पाकीट सांगण्यात आली होती.

चौकट-

कृषी विभागाचे दुर्लक्ष

कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यातच शेतकऱ्यांची अशा प्रकारे लूट होत असताना, कृषी विभागाचे मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. हंगामाच्या काळात शेतकरी गरजवंत असतो. वेळेत पेरणी झाली नाही, तर त्याचा हंगाम वाया जाण्याची शक्यता असते, शिवाय दूरवरच्या गावातून बाजारपेठेत येत असल्यामुळे रिकाम्या हाताने परत जाणेही त्याला परवडणारे नसते. यामुळे विक्रेते मागतील ती किंमत देणे त्यांना भाग पडते. याबाबत कृषी विभागाने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

टॅग्स :NashikनाशिकagricultureशेतीFarmerशेतकरी