शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

कर के देखो

By admin | Updated: August 25, 2016 17:29 IST

तिकडे अमेरिकेत साशा ओबामाने समर जॉब सुरू केला आणि आपण गेल्या शुक्रवारी औरंगाबादच्या दोन मित्रांना भेटलो.

 - मयूर देवकरतिकडे अमेरिकेत साशा ओबामाने समर जॉब सुरू केला आणि आपण गेल्या शुक्रवारी औरंगाबादच्या दोन मित्रांना भेटलो. त्यातला एकनाथ गरजेपोटी नोकरी करून शिकत शिकत वर निघालेला आणि प्रसाद आरजे होण्याच्या वेडापायी रेडिओच्या स्टुडिओत ठाण मांडून बसलेला. अमेरिकेतली साशा ओबामा असो नाहीतर आपला औरंगाबादचा एकनाथ, नाहीतर प्रसाद; यांच्या स्टोऱ्या ‘आॅक्सिजन’ने इथे काही टाइमपास म्हणून नाही सांगितलेल्या.हे वाचून तुमच्याही डोक्यात काहीतरी वळवळायला लागलं तर बरं असा एक विचार आहे त्यामागे.- पण गोची अशी की तुमच्यातल्या अनेक वाचकांनी ईमेल करून, फोनवरून विचारलं की, ही आयडिया भारी आहे; पण मी करू काय राव? कॉलेज-क्लासेस-ट्युशनच्या टाइमटेबलमधून वेळ काढून मी करणार तरी काय? ...आता हे असं विचारण्यापेक्षा थोडं डोकं चालवलं तर दिसेल की, अभ्यास-कॉलेज सांभाळून सुट्या नसतानाही आपण खूप काही करू शकतो. उदाहरण द्यायचंच झालं तर आता आपल्याकडे सणा-समारंभाचा सिझन सुरू होतोय. थोड्याच दिवसात गणपती बसणार. गल्लीतील गणेश मंडळात सहभागी व्हा. सहभागी व्हा म्हणजे केवळ स्थापना आणि विसर्जनाच्या मिरवणुकीत नाचणं नाही. उत्सवाच्या आयोजन-नियोजनात हिरीरीने पुढाकार घ्या. लाईटिंग, डेकोरेटिंग, मूर्तीचं बुकिंग, वर्गणी, ढोलपथक, स्पर्धांचे आयोजन अशी किती किती कामं करता येतील... आता हा काही जॉब नव्हे, पण एक सुरुवात होऊ शकेल.गणेशोत्सवापासून थेट दिवाळीपर्यंतचा काळ मार्केटमध्ये मोठी धामधूम असते. या काळात छोटे-मोठे मॉल्स, कपड्यांपासून तयार खाद्यपदार्थांपर्यंतची दुकानं यांच्याकडे तात्पुरतं काम मिळू शकतं, ते शोधा.तुमचं डोकं क्रिएटिव्ह असेल तर इव्हेंट मॅनेजमेण्टसारख्या क्षेत्रामध्ये काम मिळू शकेल. शक्यता पुष्कळ आहेत. त्या या दिवाळीत गाठायच्या असतील, तर आत्तापासून शोधायला सुरुवात करायला हवी.आपण मित्रमंडळी जमतोच ना कट्ट्यावर. मारतो ना इकडच्या तिकडच्या गप्पा. मग याविषयीदेखील बोलू ना. काय सांगावं, तुमच्यापैकीच कोणाला तरी भन्नाट आयडिया सुचेल. गाठू एखादी एनजीओ आणि दर रविवारी करू थोडी मेहनत. तुम्ही फक्त एकदा करून बघा. तुम्हालाच फरक जाणवेल. ते म्हणतात ना, ‘करके देखो, अच्छा लगता है!’शिकता शिकता पार्टटाइम किंवा सुटीमध्ये काम करून पैसा तर मिळतोच पण त्यापेक्षाही अधिक महत्त्वाचं काहीतरी आपल्याला मिळतं. ते म्हणजे-१. आत्मविश्वास : विद्यार्थिदशेत काम करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपला आत्मविश्वास वाढतो. आजच्या जगात ‘कॉन्फिडन्स इज द की’ असं म्हणतात. तो आतून असेल तर बाहेर दिसेल. ‘दोन पैसे कमवण्याची अक्कल’ आली की आपोआप आत्मविश्वास येतो. काम करत असताना येणारी विविध आव्हानं यशस्वीपणे पार केल्यावर कोणाच्या अंगावर मूठभर मांस चढणार नाही?२. टाइम मॅनेजमेंट :सुट्यांमध्ये घरी मस्तपैकी ताणून देता येईल पण त्याऐवजी कुठेतरी काम केल्यावर निदान वेळेचा सदुपयोग आणि व्यवस्थापन कसं करायचं हे कळेल. ‘सेल्फ-हेल्प’ बुक्समध्ये सर्वाधिक पुस्तके तुम्हाला टाइम मॅनेजमेंटवरच दिसतील. एकदा का वेळेचं गणित जमवता आलं तर ते संपूर्ण आयुष्यात कामी येईल. ‘टाइम इज मनी’ खरंय ना!३. अनुभव :स्पर्धेच्या युगात मिळेल तो अ‍ॅडव्हाण्टेज घेतला पाहिजे. कॉलेज संपल्यावर नोकरी शोधत असताना रेझ्युमवर ‘एक्सपेरियन्स’चा रकाना रिकामा चांगला वाटणार नाही. शिकत असतानाच जर काम केलं तर निदान रेझ्युममध्ये लिहायला इतरांपेक्षा एक गोष्ट जास्त असेल. तसेही, कुठल्याही कामाचा प्रॅक्टिकल अनुभव असलेल्या उमेदवाराला निवडण्यास कोणीही प्राधान्य देईल, नाही का?४. स्व-ओळख :बऱ्याचदा आपल्याला आपण काय आहोत हेच माहीत नसतं. आपल्याला नेमकं काय आवडतं, आपण काय करू शकतो, आपल्यामध्ये कुठल्या क्षमता आहेत, आपण नेमके कशात कमी पडतो हेच आपल्याला माहिती नसतं. मात्र जॉब केल्यामुळे स्वत:च्या क्षमतांची ओळख पटते. ‘आपण हे करू शकतो’ अशी सकारात्मक वृत्ती बळावते. कॉलेज आणि रिअल लाइफमधला खरा फरक कळतो. टीमवर्क, वर्क एथिक असे ‘करिअरवर्धक’ गुण बिंबवले जातात.५. नेटवर्क :कामाच्या ठिकाणी भविष्यात तुमच्या करिअरला ‘अप लिफ्ट’ देणारे लोक भेटतील. तुमचं प्रोफेशनल नेटवर्क निर्माण होईल. लहान वयातच इंडस्ट्रीच्या आतल्या वर्तुळात प्रवेश मिळवला तर चार ओळखी वाढतात. पुढे चालून याच ओळखींचा खूप फायदा होऊ शकतो. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या ‘रेफरन्स’चं महत्त्व काय हे जॉब करणाऱ्या तुमच्या मोठ्या भावंडांना विचारा...........................