शहरं
Join us  
Trending Stories
1
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
2
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
3
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
4
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
5
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
6
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
7
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
8
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
9
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
10
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
11
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
12
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
13
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
14
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग
15
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
16
दिवाळीच्या फटाक्यांवर सरसकट बंदीने प्रदूषणाचा प्रश्न सुटेल काय?
17
सुंदर पिचाई, नाडेला यांची ‘अळी मिळी गुपचिळी’ का?; आयटी क्षेत्रात मोठी अस्वस्थता
18
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
19
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
20
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन

शेतीकडे उद्योगाच्या दृष्टिकोनातून बघावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 01:19 IST

राज्यात मोठ्या प्रमाणात बागायती व कोरडवाहू शेती आहे. या शेतीच्या माध्यमातून प्रतिएकरी किमान चार लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देता येऊ शकते.

नाशिक : राज्यात मोठ्या प्रमाणात बागायती व कोरडवाहू शेती आहे. या शेतीच्या माध्यमातून प्रतिएकरी किमान चार लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देता येऊ शकते. परंतु सध्याच्या स्थितीत शेतीत एक वर्षात फायदा झाला, तर चार वर्षे नुकसान होत असल्याने उत्पन्न घटले आहे. त्यामुळे रोजगारही घटला असून, समाजातील अस्वस्थता वाढत चालली आहे. यासाठी शेती क्षेत्राकडे उद्योग व्यवसायाच्या दृष्टिकोनातून बघण्याची गरज असल्याचे प्रतिपादन बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष हनुमंत गायकवाड यांनी केले आहे.  कर्मवीर अ‍ॅड. बाबूराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालय येथे मराठा उद्योजक फोरमतर्फे आयोजित उद्योजक व नोकरी मार्गदर्शन कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी खासदार हेमंत गोडसे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक अतुल दवंगे आदी उपस्थित होते. हनुमंत गायकवाड म्हणाले, शेतीकडे व्यवसाय म्हणून बघितल्यास शेतकऱ्यास अपेक्षित उत्पन्न मिळून इतरांनाही रोजगार उपलब्ध होऊ शकेल. तसेच शेतीचा विकास समाजातील नैराश्याचे वातावरण झटकण्याच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केला. शेतीचे शास्त्र समजून घेत, शेती विषमुक्त करण्यासह उत्पादनावरील खर्च कमी करण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून आपले काम सुरू असून, याचाच एक भाग म्हणून अल्पदरात माती व पाणी परीक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा उद्योग केंद्राचे अतुल दवंगे यांनी व्यवसाय उभारणीसाठी विविध योजनांची माहिती दिली. तरुणांमधून उद्योजक घडणे काळाची गरज असल्याचे मत खासदार गोडसे यांनी व्यक्त केले.उद्योजकतेचा नारा द्यावाव्यवसाय करताना चांगली संकल्पना, विश्वासू सहकारी, आर्थिक नियोजन आणि कष्टाची तयारी या सर्व घटकांची योग्य सांगड घालणे गरज असून, उद्योजक होऊ पाहणाºया युवकांनी कष्टाला दिशा देण्याचा प्रयत्न होण आवश्यक असल्याचे मत संमोहन तज्ज्ञ डॉ. शैलेंद्र गायकवाड यांनी व्यक्त केले. तरुणांनी कोणत्याही कामाला न लाजता अभिमानाने ‘कौशल्यनिपुन मराठा, उद्योजक मराठा’ असा नारा युवकांनी द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

 

टॅग्स :Farmerशेतकरी