शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

शेतीकडे उद्योगाच्या दृष्टिकोनातून बघावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 01:19 IST

राज्यात मोठ्या प्रमाणात बागायती व कोरडवाहू शेती आहे. या शेतीच्या माध्यमातून प्रतिएकरी किमान चार लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देता येऊ शकते.

नाशिक : राज्यात मोठ्या प्रमाणात बागायती व कोरडवाहू शेती आहे. या शेतीच्या माध्यमातून प्रतिएकरी किमान चार लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देता येऊ शकते. परंतु सध्याच्या स्थितीत शेतीत एक वर्षात फायदा झाला, तर चार वर्षे नुकसान होत असल्याने उत्पन्न घटले आहे. त्यामुळे रोजगारही घटला असून, समाजातील अस्वस्थता वाढत चालली आहे. यासाठी शेती क्षेत्राकडे उद्योग व्यवसायाच्या दृष्टिकोनातून बघण्याची गरज असल्याचे प्रतिपादन बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष हनुमंत गायकवाड यांनी केले आहे.  कर्मवीर अ‍ॅड. बाबूराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालय येथे मराठा उद्योजक फोरमतर्फे आयोजित उद्योजक व नोकरी मार्गदर्शन कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी खासदार हेमंत गोडसे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक अतुल दवंगे आदी उपस्थित होते. हनुमंत गायकवाड म्हणाले, शेतीकडे व्यवसाय म्हणून बघितल्यास शेतकऱ्यास अपेक्षित उत्पन्न मिळून इतरांनाही रोजगार उपलब्ध होऊ शकेल. तसेच शेतीचा विकास समाजातील नैराश्याचे वातावरण झटकण्याच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केला. शेतीचे शास्त्र समजून घेत, शेती विषमुक्त करण्यासह उत्पादनावरील खर्च कमी करण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून आपले काम सुरू असून, याचाच एक भाग म्हणून अल्पदरात माती व पाणी परीक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा उद्योग केंद्राचे अतुल दवंगे यांनी व्यवसाय उभारणीसाठी विविध योजनांची माहिती दिली. तरुणांमधून उद्योजक घडणे काळाची गरज असल्याचे मत खासदार गोडसे यांनी व्यक्त केले.उद्योजकतेचा नारा द्यावाव्यवसाय करताना चांगली संकल्पना, विश्वासू सहकारी, आर्थिक नियोजन आणि कष्टाची तयारी या सर्व घटकांची योग्य सांगड घालणे गरज असून, उद्योजक होऊ पाहणाºया युवकांनी कष्टाला दिशा देण्याचा प्रयत्न होण आवश्यक असल्याचे मत संमोहन तज्ज्ञ डॉ. शैलेंद्र गायकवाड यांनी व्यक्त केले. तरुणांनी कोणत्याही कामाला न लाजता अभिमानाने ‘कौशल्यनिपुन मराठा, उद्योजक मराठा’ असा नारा युवकांनी द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

 

टॅग्स :Farmerशेतकरी