शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

बैठकीवर लोकप्रतिनिधींचा बहिष्कार

By admin | Updated: November 4, 2015 23:54 IST

बैठकीवर लोकप्रतिनिधींचा बहिष्कार

नाशिक : सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशान्वये जायकवाडीसाठी नाशिक जिल्'ातील गंगापूर व दारणा समूहातून पाणी सोडण्यात येणार असल्याने त्याची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी जिल्'ातील लोकप्रतिनिधींच्या बोलविलेल्या बैठकीवर बहिष्कार टाकत, पाणीप्रश्नी लोकप्रतिनिधींच्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्याची विनंती केली. गेल्या चार दिवसांपासून जिल्'ातील धरणांचा पाणीप्रश्न गाजत असून, सर्वपक्षीय आंदोलन, उच्च न्यायालय, सर्वोेच्च न्यायालयापर्यंत वाद पोहोचूनदेखील पाणी सोडण्याचा निर्णय कायम राहिल्याने धरणांमधून पाणी सोडताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच धरणांमधून पाणी सोडल्याने काय परिस्थिती उद्भवेल याची माहिती देण्यासाठी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीची सर्वच लोकप्रतिनिधींना मंगळवारी पत्रे तसेच दूरध्वनीवरून माहिती देण्यात आली असल्याने महापौर अशोक मुर्तडक, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार नरहरी झिरवाळ, कॉँग्रेसच्या निर्मला गावित, शिवसेनेचे राजाभाऊ वाजे या तीन आमदारांसह जिल्हा परिषदेचे अध्यक्ष जयश्री चुंभळे, उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी या बैठकीला हजेरी लावली. बैठक सुरू होताच, आमदार झिरवाळ यांनी समन्यायी पाणी वाटपाबाबत राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाचा सर्वपक्षीय कृती समितीने विरोध दर्शविला असून, आजच्या बैठकीवर सर्व लोकप्रतिनिधींनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. त्यामुळे जिल्'ातील धरणांच्या पाण्याबाबत लोकप्रतिनिधींच्या भावना शासनापर्यंत पोहोचविल्या जाव्यात, अशी विनंती केली. त्यांच्या या सुरात आमदार गावित यांनी सूर मिसळवित, गंगापूर व दारणा धरणातून पाणी सोडल्यास त्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे सुमारे १५०० कोटी रुपयांचे नुकसान होणार असल्याचे सांगितले. महापौर अशोक मुर्तडक यांनी नाशिक शहरात सध्या वीस टक्के पाणी कपात करण्यात आली असून, येत्या दहा महिन्यात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ येईल अशी भीती व्यक्त केली. जिल्हा परिषद अध्यक्ष चुंभळे यांनी न्यायालयाला वस्तुस्थिती समजावून न सांगितल्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी शासनाची भूमिका विषद केली. जायकवाडीसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा पिण्यासाठीच वापर व्हावा असे सर्वाेच्च न्यायालयाने मुख्य सचिवांना लक्ष ठेवण्यास सांगितले आहे त्यामुळे पाणी सोडावे लागेल. न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याने लोकप्रतिनिधींनी कायदा हातात न घेता सहकार्य करावे, असे आवाहन केले. या बैठकीस पोलीस अधीक्षक संजय मोहिते, उपआयुक्त अविनाश बारगळ, वीज कंपनी, पाटबंधारे खात्याचे अधिकारी उपस्थित होते. प्राधिकरणासमोर बाजू मांडू राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात व्यवस्थित बाजू न मांडल्यामुळे जिल्'ातील धरणांमधून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याची वेळ आली असून, आता महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणापुढे उद्या सुनावणी असल्याने त्या ठिकाणी जिल्'ातील लोकप्रतिनिधी बाजू मांडतील. न्याय न मिळाल्यास आमरण उपोषण करण्यात येईल.- आमदार नरहरी झिरवाळनियोजनाचा अभावजिल्'ातील धरणांमध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा व लागणारे पाणी याचे कोणतेही नियोजन न करता पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आमचा न्यायालयाच्या निर्णयाला विरोध नाही, परंतु आम्हाला तहानलेले ठेवून दुसऱ्यांची तहान कशी भागवता येईल? - आमदार निर्मला गावितखंडित विजेने पाण्यापासून वंचित गंगापूर व दारणा धरण समूहातून पाणी सोडताना नदीकाठच्या गावांचा विद्युत पुरवठा गेल्या दोन दिवसांपासून पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना नदीच्या पाण्यावर अवलंबून असून, काहींना जलकुंभाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. वीजपुरवठाच खंडित करण्यात आल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून नदीकाठची गावे रात्रीच्या अंधारात व दिवसा पाण्याअभावी तहानलेली आहेत. मराठवाड्याची तहान भागविताना स्थानिक जनतेला मात्र तहानलेले ठेवले जात आहे.