शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

Lok Sabha Election 2019; वाद निरर्थक : राज्यात ‘रमजान’पुर्व आटोपणार लोकसभेचे मतदान !

By अझहर शेख | Updated: March 12, 2019 14:46 IST

रमजान पर्व काळात देशातील काही राज्यांत मतदान होणार असले तरीदेखील त्याचा कुठलाही नकारात्मक प्रभाव मतदान किंवा निवडणूक प्रक्रीयेवर होणार नाही तर मुस्लीम मतदानाचा टक्का वाढलेला दिसून येईल,

ठळक मुद्देमतदानप्रक्रिया आणि रमजान पर्वचा कुठलाही संबंध नसल्याचे सांगितले. राज्यात 'रमजान'च्या आठवडाभर अगोदर मतदानप्रक्रिया पूर्ण होत आहे

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्यातील मतदान ११ एप्रिल तर दुसऱ्या टप्यात १८ एप्रिल, तीसऱ्या टप्प्यात २३ एप्रिल आणि मतदानाचा अखेरचा चौथा टप्पा २९ एप्रिलला पुर्ण होत आहे. मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान पर्व ६ मेपासून सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे रमजानच्या अगोदर राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये लोकसभा निवडणुकीची मतदानप्रक्रीया आटोपत आहे. तसेच काही राज्यांत रमजानकाळत मतदानाच्या तारखा येत असल्या तरी त्याचा फारसा परिणाम मतदानावर किंवा निवडणूक प्रक्रियेवर होणार नाही, असे मत नाशिक शहरातील सुन्नी मुस्लीम धर्मगुरूंनी व्यक्त केले आहे.निवडणूकांच्या तारखा रमजानकाळात जाहीर झाल्याने बोटावर मोजण्याइतक्या काही धार्मिक संघटनांनी आक्षेप नोंदविला होता. यामुळे नवा वाद उभा राहिला; मात्र निवडणूक आयोगाने या आक्षेपावर स्पष्टीकरण देत पडदा टाकला. यासंदर्भात नाशिकमधील काही धर्मगुरूंशी चर्चा केली असता त्यांनीदेखील मतदानप्रक्रिया आणि रमजान पर्वचा कुठलाही संबंध नसल्याचे सांगितले. नाशिक, मुंबईसह राज्यात रमजान पर्वच्या आठवडाभर अगोदर मतदानप्रक्रिया पूर्ण होत आहे. त्यामुळे वाद उद्भवण्याचा किंवा कुठलाही अडसर निर्माण होण्याचा प्रश्नच येत नसल्याचे सांगितले.रमजान पर्व काळात देशातील काही राज्यांत मतदान होणार असले तरीदेखील त्याचा कुठलाही नकारात्मक प्रभाव मतदान किंवा निवडणूक प्रक्रीयेवर होणार नाही तर मुस्लीम मतदानाचा टक्का वाढलेला दिसून येईल, असे मत स्थानिक धर्मगुरू व उलेमांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले आहे.---या जिल्ह्यांत या तारखांना लोकसभेचे मतदानपहिला टप्पा- ११ एप्रिल- ७ मतदारसंघवर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमुर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशीमदुसरा टप्पा- १८ एप्रिल- १० मतदारसंघबुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर.तिसरा टप्पा- २३ एप्रिल- १४ मतदारसंघजळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले.चौथा टप्पा- २९ एप्रिल- १७ मतदारसंघनंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, दक्षिण मुंबई, मावळ, शिरुर, शिर्डी.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग