शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
2
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
4
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
5
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
6
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
7
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
8
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
9
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
10
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
11
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
12
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
13
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
14
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
15
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
16
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
17
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
18
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
19
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
20
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाउनमुळे चविष्ट रानमेवा झाला बेचव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 00:04 IST

एप्रिल-मे महिना म्हटला की, ग्रामीण व विशेषकरून आदिवासी भागातील दऱ्याखोऱ्यांत सहजपणे उपलब्ध होणाºया विविध प्रकारच्या रानमेव्याची सर्वांनाच प्रतीक्षा असते. मात्र यावर्षी कोविड -१९ लॉकडाउनमुळे हा रानमेवाही काळवंडला असून, नकळत याचा फटका आदिवासी मजुरांना बसला आहे.

ठळक मुद्देखवय्यांचा भ्रमनिरास : पेठ, सुरगाणा, त्र्यंबक तालुक्यातील आदिवासींचा रोजगार बुडाला

रामदास शिंदे।  लोकमत न्यूज नेटवर्कपेठ : एप्रिल-मे महिना म्हटला की, ग्रामीण व विशेषकरून आदिवासी भागातील दऱ्याखोऱ्यांत सहजपणे उपलब्ध होणाºया विविध प्रकारच्या रानमेव्याची सर्वांनाच प्रतीक्षा असते. मात्र यावर्षी कोविड -१९ लॉकडाउनमुळे हा रानमेवाही काळवंडला असून, नकळत याचा फटका आदिवासी मजुरांना बसला आहे.नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेकडील पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, कळवण, इगतपुरी या तालुक्यांत मे महिन्याच्या तळपत्या उन्हाबरोबर करवंद, आवळा, आंबे, तोरणे, टेंभूर आदी जंगली रानमेव्याचे आगमन होत असते. मोठ्या प्रमाणात व सहज उपलब्ध होणाºया या रानमेव्यापासून मजुरांना ऐन उन्हाळ्यात चार पैसे गाठीशी बांधण्याची संधीही मिळत असते. शहरी भागातून खवय्ये खास या रानमेव्याची चव चाखण्यासाठी गावाकडे फेरफटका मारतात. मात्र यावर्षी सर्वत्र लॉकडाउनची स्थिती असल्याने दळणवळणाची सर्व साधने बंद आहे. शिवाय गाव-शहरात संचारबंदी लागू असल्याने यावर्षीचा रानमेवा झाडावरच राहिला.जळगावकरांना करवंदाची प्रतीक्षापेठ तालुक्यातून दरवर्षी जळगावपर्यंत करवंद पोहोच होत असल्याने यावर्षी वाहतूक व्यवस्था व जिल्हा बंदी असल्याने कोणीही मजूर करवंद तोडायला गेली नसल्याने करवंदाची निर्यात पूर्णपणे थांबली. यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जळगावकरांना पेठच्या करवंदाच्या चवीला मुकावे लागल्याचे दिसून येते. नाशिकसह जळगाव, चाळीसगाव, धुळे, मालेगाव आदी ठिकाणी पेठच्या करवंदांना दरवर्षी मोठी मागणीअसते.झाडावरच वाळली करवंदे !यावर्षी रानफळांना पोषक वातावरण असल्यामुळे व मागील वर्षी पाऊसही चांगला झाल्याने करवंद, आंबे, आवळा, तोरणे जास्त प्रमाणात आली. मात्र कोणीही जंगलाकडे फिरकले नसल्याने झाडावरच पिकून फळे वाळून गळून खराब होऊ लागली आहेत. आदिवासी भागात जास्त प्रमाणात येणाºया रानमेव्यावर प्रक्रि या करून त्याचे व्यावसायिकरण करण्याची मागणी करण्यात येत असून, यासाठी आदिवासी भागात प्रक्रि याउद्योग सुरू करावेत अशी मागणी करण्यात येत आहे. यामुळे स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळेल व वनसंपदेचा योग्य उपयोग करून घेता येईल.

टॅग्स :NashikनाशिकMONEYपैसा