शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

पशुधन वाचविणे झाले मुश्कील

By admin | Updated: May 3, 2016 23:38 IST

इगतपुरी : जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर; दुग्ध व्यावसायिक संकटात

 बेलगाव कुऱ्हे : भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावली आहे. दुष्काळाने शेती वाचविणे शेतकऱ्यापुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. सूर्य आग ओकत आहे. अनेक ठिकाणी शेतपिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे; मात्र त्यांना अपयश येत आहे. साकूर परिसरातील काही शेतकऱ्यांनी नवीन प्रयोग करीत डाळींब बागा फुलवल्या आहेत.गेल्या वर्षी त्यांना चांगले उत्पादन मिळाले होते. त्यांचे डाळींब परदेशात विक्र ीसाठी गेले होते. मात्र यावर्षी पाण्याची कमतरता असल्याने फळे सुकून गेली आहेत. पाणी न मिळाल्याने डाळींब फळांची उगवण झालेली नाही. यावेळी त्यांना उत्पादन मिळणार नसल्याने ते हवालदिल झाले आहेत. पारंपरिक शेतकरी व्यावसायिक दुष्काळाच्या गर्तेत सापडले आहेत. दोन तीन वर्षांत पावसाने शेतकऱ्यांची हवी तशी साथ दिलेली नाही. कधी अवकाळी पाऊस तर कधी पाण्याच्या संकटामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. कर्जाचा डोंगर त्यांना स्वस्थही बसू देत नाही, अशा स्थितीत जगावे तरी कसे, असा सवाल शेतकऱ्यांना पडला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी मेहनतीने उभी केलेली शेती डोळ्यादेखत नष्ट झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी पाण्याचे टॅँकर विकत घेऊन शेती वाचविण्याचा प्रयत्न केला; मात्र सूर्यनारायणाने आग ओकण्यास सुरु वात केली असल्याने सर्वच ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. वातावरणात प्रचंड उष्णता आहे. सकाळी १० वाजेनंतरच अनेक ठिकाणी रस्ते निर्मनुष्य होताना दिसत आहे. त्यामुळे छोट्या मोठ्या व्यवसायांवरदेखील याचा परिणाम झाला आहे. तालुक्याच्या पूर्व भागात शेतीला पूरक असा दुग्धव्यवसाय केला जातो. तोही संकटात येऊ पाहतोय. परिसरातून हजारो लिटर दुधाचे संकलन केले जाते. सद्यस्थितीत दुधामध्येही मोठी घट निर्माण झाली आहे. उन्हाचा चटका जसा माणसांना बसतो तसा मुक्या जनावरांनादेखील बसतो आहे. पिण्याचे पाणी व चारा नसल्याने जनावरे दूध देखील जास्त देत नाहीत. यामुळे दुग्धव्यवसायिक मोठ्या संकटात सापडले आहेत. इगतपुरी तालुक्याची दुष्काळाची दाहकता दिवसागणिक वाढतच आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील छोटी, मोठी धरणे, नदीपात्र कोरडी पडली आहेत. धरणांच्या तालुक्याला आता भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातील जवळपास सर्वच गावांमध्ये दुपारच्या वेळी अघोषित संचारबंदीचेच चित्र निर्माण झाले आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांची पाण्याची परिस्थिती चिंताजनक आहे. अशा परिस्थितीत गोधन वाचविणे कठीण होऊन बसले आहे. (वार्ताहर)