शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

पशुधन वाचविणे झाले मुश्कील

By admin | Updated: May 3, 2016 23:38 IST

इगतपुरी : जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर; दुग्ध व्यावसायिक संकटात

 बेलगाव कुऱ्हे : भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावली आहे. दुष्काळाने शेती वाचविणे शेतकऱ्यापुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. सूर्य आग ओकत आहे. अनेक ठिकाणी शेतपिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे; मात्र त्यांना अपयश येत आहे. साकूर परिसरातील काही शेतकऱ्यांनी नवीन प्रयोग करीत डाळींब बागा फुलवल्या आहेत.गेल्या वर्षी त्यांना चांगले उत्पादन मिळाले होते. त्यांचे डाळींब परदेशात विक्र ीसाठी गेले होते. मात्र यावर्षी पाण्याची कमतरता असल्याने फळे सुकून गेली आहेत. पाणी न मिळाल्याने डाळींब फळांची उगवण झालेली नाही. यावेळी त्यांना उत्पादन मिळणार नसल्याने ते हवालदिल झाले आहेत. पारंपरिक शेतकरी व्यावसायिक दुष्काळाच्या गर्तेत सापडले आहेत. दोन तीन वर्षांत पावसाने शेतकऱ्यांची हवी तशी साथ दिलेली नाही. कधी अवकाळी पाऊस तर कधी पाण्याच्या संकटामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. कर्जाचा डोंगर त्यांना स्वस्थही बसू देत नाही, अशा स्थितीत जगावे तरी कसे, असा सवाल शेतकऱ्यांना पडला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी मेहनतीने उभी केलेली शेती डोळ्यादेखत नष्ट झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी पाण्याचे टॅँकर विकत घेऊन शेती वाचविण्याचा प्रयत्न केला; मात्र सूर्यनारायणाने आग ओकण्यास सुरु वात केली असल्याने सर्वच ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. वातावरणात प्रचंड उष्णता आहे. सकाळी १० वाजेनंतरच अनेक ठिकाणी रस्ते निर्मनुष्य होताना दिसत आहे. त्यामुळे छोट्या मोठ्या व्यवसायांवरदेखील याचा परिणाम झाला आहे. तालुक्याच्या पूर्व भागात शेतीला पूरक असा दुग्धव्यवसाय केला जातो. तोही संकटात येऊ पाहतोय. परिसरातून हजारो लिटर दुधाचे संकलन केले जाते. सद्यस्थितीत दुधामध्येही मोठी घट निर्माण झाली आहे. उन्हाचा चटका जसा माणसांना बसतो तसा मुक्या जनावरांनादेखील बसतो आहे. पिण्याचे पाणी व चारा नसल्याने जनावरे दूध देखील जास्त देत नाहीत. यामुळे दुग्धव्यवसायिक मोठ्या संकटात सापडले आहेत. इगतपुरी तालुक्याची दुष्काळाची दाहकता दिवसागणिक वाढतच आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील छोटी, मोठी धरणे, नदीपात्र कोरडी पडली आहेत. धरणांच्या तालुक्याला आता भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातील जवळपास सर्वच गावांमध्ये दुपारच्या वेळी अघोषित संचारबंदीचेच चित्र निर्माण झाले आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांची पाण्याची परिस्थिती चिंताजनक आहे. अशा परिस्थितीत गोधन वाचविणे कठीण होऊन बसले आहे. (वार्ताहर)